शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पुनर्वसन; येणी दोडकावासीयांंचे ७ च्या आत घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 06:00 IST

बोर व्याघ्र प्रकल्पात छोटे-मोठे असे एकूण सुमारे आठ वाघ असल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे. त्यांना बीटीआर-१, बीटीआर-२ असे नावही देण्यात आली आहेत. कॅटरीना व अंबिका या दोन वाघिणींनी वेळोवेळी दिलेल्या बछड्यांमुळे बोर व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या संख्येत बऱ्यापैकी वाढ झाली. त्यामुळे बोर व्याघ्र प्रकल्पाच्या संरक्षित जमिनीत वाढ गरजेचे आहे.

ठळक मुद्देप्रशासनाची अनास्था कायम : बीटीआर-७ सह बीटीआर-९ वाघांमुळे येणी दोडका शिवारात दहशत

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कारंजा तालुक्यातील काही शेतशिवारात सध्या बीटीआर-७ आणि बीटीआर-९ या वाघांचा वावर आहे. त्यांच्याकडून पाळीव प्राण्यांची शिकार केली जाते. शिवाय सदर वाघ मनुष्यावरही हल्ला करू पाहात असल्याने येणी दोडका परिसरातील नागरिकांमध्ये वाघाबाबत कमालीची दहशत निर्माण झाली आहे. सदर गावाचे पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे येणी दोडकावासीयांना ७ च्या आत घरात यावे लागत आहे. ग्रामस्थांची समस्या लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने योग्य पाऊल उचलण्याची मागणी आहे.बोर व्याघ्र प्रकल्पात छोटे-मोठे असे एकूण सुमारे आठ वाघ असल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे. त्यांना बीटीआर-१, बीटीआर-२ असे नावही देण्यात आली आहेत. कॅटरीना व अंबिका या दोन वाघिणींनी वेळोवेळी दिलेल्या बछड्यांमुळे बोर व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या संख्येत बऱ्यापैकी वाढ झाली. त्यामुळे बोर व्याघ्र प्रकल्पाच्या संरक्षित जमिनीत वाढ गरजेचे आहे. मुक्तसंचारासाठी जागा कमी पडत असल्याने अनेकदा बोर व्याघ्र प्रकल्पातील वाघ येणी दोडका शेत शिवारांपर्यंत येतात. अशातच ते वन्यप्राण्यांची शिकारही करतात. बहुतांशवेळा शेतात काम करणाºया मनुष्यावरही ते हल्ला चढवितात. त्यामुळे या भागातील नागरिकांना नेहमीच दहशतीत जीवन जगावे लागत आहे. इतकेच नव्हे, तर सध्या या परिसरात बीटीआर-७ आणि बीटीआर-९ या वाघांचा वावर असल्याने नागरिकही सायंकाळी काळोख पसरण्यापूर्वीच घर गाठतात. शिवाय रात्री घराबाहेर पडण्याचेही टाळतात. येणी दोडका हे गाव जंगलव्याप्त परिसरात असून या भागातील शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकाची नासाडी वन्यप्राण्यांकडून केली जाते. नुकसानीपोटी वनविभागाकडून शासकीय मदत मिळत असली तरी ती झालेल्या नुकसानीच्या तुलनेत तो अल्प राहत असल्याने शेतकरीही मेटाकुटीस आला आहे. एखाद्यावेळी रात्रीच्या सुमारास गावातील कुणीची प्रकृती बिघडल्यास जीव धोक्यात टाकूनच रुग्णालय गाठावे लागते. नागरिकांची समस्या लक्षात घेता येणी दोडका या गावाचे पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी आहे.आवश्यक वस्तूंकरिता ओलांडावी लागते गावाची सीमागावात साधे जीवनावश्यक साहित्याचे दुकान नाही. चक्की नाही त्यामुळे मूलभूत गरजांच्या पूर्ततेसाठी गावकºयांना गावाची सीमा ओलांडावी लागते. काहींनी रोजगार आणि शिक्षणासाठी गावही सोडले. हिच अवस्था व्याघ्र प्रकल्पाच्या सिमेलगत असलेल्या गरमसूर, मरकसूर, मेठहिरजी आणि उमराविहिरी या गावांची आहे.

टॅग्स :Tigerवाघ