शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
5
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
6
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
7
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
8
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
9
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
10
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
11
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
12
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
13
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
14
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
15
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
16
जर्मनी दौऱ्यात राहुल गांधींना Rolls-Royce ची भुरळ; भारतात 'ही' लक्झरी कार कितीला मिळते?
17
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
18
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
19
"उंच भरारी, पण पाय जमिनीवर!" आजारी असताना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी केली मदत; अमृता खानविलकर भारावली
20
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसन; येणी दोडकावासीयांंचे ७ च्या आत घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 06:00 IST

बोर व्याघ्र प्रकल्पात छोटे-मोठे असे एकूण सुमारे आठ वाघ असल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे. त्यांना बीटीआर-१, बीटीआर-२ असे नावही देण्यात आली आहेत. कॅटरीना व अंबिका या दोन वाघिणींनी वेळोवेळी दिलेल्या बछड्यांमुळे बोर व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या संख्येत बऱ्यापैकी वाढ झाली. त्यामुळे बोर व्याघ्र प्रकल्पाच्या संरक्षित जमिनीत वाढ गरजेचे आहे.

ठळक मुद्देप्रशासनाची अनास्था कायम : बीटीआर-७ सह बीटीआर-९ वाघांमुळे येणी दोडका शिवारात दहशत

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कारंजा तालुक्यातील काही शेतशिवारात सध्या बीटीआर-७ आणि बीटीआर-९ या वाघांचा वावर आहे. त्यांच्याकडून पाळीव प्राण्यांची शिकार केली जाते. शिवाय सदर वाघ मनुष्यावरही हल्ला करू पाहात असल्याने येणी दोडका परिसरातील नागरिकांमध्ये वाघाबाबत कमालीची दहशत निर्माण झाली आहे. सदर गावाचे पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे येणी दोडकावासीयांना ७ च्या आत घरात यावे लागत आहे. ग्रामस्थांची समस्या लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने योग्य पाऊल उचलण्याची मागणी आहे.बोर व्याघ्र प्रकल्पात छोटे-मोठे असे एकूण सुमारे आठ वाघ असल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे. त्यांना बीटीआर-१, बीटीआर-२ असे नावही देण्यात आली आहेत. कॅटरीना व अंबिका या दोन वाघिणींनी वेळोवेळी दिलेल्या बछड्यांमुळे बोर व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या संख्येत बऱ्यापैकी वाढ झाली. त्यामुळे बोर व्याघ्र प्रकल्पाच्या संरक्षित जमिनीत वाढ गरजेचे आहे. मुक्तसंचारासाठी जागा कमी पडत असल्याने अनेकदा बोर व्याघ्र प्रकल्पातील वाघ येणी दोडका शेत शिवारांपर्यंत येतात. अशातच ते वन्यप्राण्यांची शिकारही करतात. बहुतांशवेळा शेतात काम करणाºया मनुष्यावरही ते हल्ला चढवितात. त्यामुळे या भागातील नागरिकांना नेहमीच दहशतीत जीवन जगावे लागत आहे. इतकेच नव्हे, तर सध्या या परिसरात बीटीआर-७ आणि बीटीआर-९ या वाघांचा वावर असल्याने नागरिकही सायंकाळी काळोख पसरण्यापूर्वीच घर गाठतात. शिवाय रात्री घराबाहेर पडण्याचेही टाळतात. येणी दोडका हे गाव जंगलव्याप्त परिसरात असून या भागातील शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकाची नासाडी वन्यप्राण्यांकडून केली जाते. नुकसानीपोटी वनविभागाकडून शासकीय मदत मिळत असली तरी ती झालेल्या नुकसानीच्या तुलनेत तो अल्प राहत असल्याने शेतकरीही मेटाकुटीस आला आहे. एखाद्यावेळी रात्रीच्या सुमारास गावातील कुणीची प्रकृती बिघडल्यास जीव धोक्यात टाकूनच रुग्णालय गाठावे लागते. नागरिकांची समस्या लक्षात घेता येणी दोडका या गावाचे पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी आहे.आवश्यक वस्तूंकरिता ओलांडावी लागते गावाची सीमागावात साधे जीवनावश्यक साहित्याचे दुकान नाही. चक्की नाही त्यामुळे मूलभूत गरजांच्या पूर्ततेसाठी गावकºयांना गावाची सीमा ओलांडावी लागते. काहींनी रोजगार आणि शिक्षणासाठी गावही सोडले. हिच अवस्था व्याघ्र प्रकल्पाच्या सिमेलगत असलेल्या गरमसूर, मरकसूर, मेठहिरजी आणि उमराविहिरी या गावांची आहे.

टॅग्स :Tigerवाघ