शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसनाचे नाव दिले; समस्यांचे गाव दिले

By admin | Updated: December 9, 2014 22:54 IST

कोणत्याही गावाचे पुनर्वसन करायचे असेल, तर त्या ठिकाणी मुलभूत १८ नागरी सुविधा असायला पाहिजे. मात्र एकही सुविधा पूर्णत्वास न जाता आणि हस्तांतरणाला तीन वर्षांचा कालावधी असताना लघू

लघू पाटबंधारे विभागाकडून नटाळाचे परस्पर हस्तांतरण राजेश भोजेकर - वर्धाकोणत्याही गावाचे पुनर्वसन करायचे असेल, तर त्या ठिकाणी मुलभूत १८ नागरी सुविधा असायला पाहिजे. मात्र एकही सुविधा पूर्णत्वास न जाता आणि हस्तांतरणाला तीन वर्षांचा कालावधी असताना लघू पाटबंधारे विभागाने सुविधा पूर्ण झाल्याचे प्रमाणित करून कारला रोडवर पिपरी(मेघे) येथे नटाळा या गावाचे परस्पर हस्तांतरण केले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, हा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असताना त्यांनाही याबाबत अंधारात ठेवल्याची खळबळजनक बाब पुढे आली आहे.प्रकल्पग्रस्त प्रज्वल चोरे यांनी पुनर्वसन गावात एकही नागरी सुविधा झाल्या नसल्याची बाब निदर्शनास आणून देण्यासाठी प्रकल्पग्रस्तांसह जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतली असता ही धक्कादायक बाब त्यांच्या निदर्शनास आली.सुकळी येथील लघू पाटबंधारे प्रकल्पांतर्गत नटाळा हे गाव येत होते. यामुळे २००७ पासून या गावाचे पुनर्वसन पिपरी(मेघे) येथे करण्यात आले. १५ आॅगस्ट २०११ रोजी गावात मुलभूत सुविधा अपूर्ण असताना लघू पाटबंधारे विभागाने परस्पर या गावाचे ग्रामपंचायतीला हस्तांरण केले आहे. याबाबत प्रकल्पग्रस्तांनी जिल्हाधिकारी, पुनर्वसन विभाग व जिल्हा परिषदेला माहिती मागितली असता नटाळा गावाचे हस्तांतरण अद्याप करण्यात आले नसल्याची माहिती देण्यात आली. वास्तविक, शासन परिपत्रकाप्रमाणे कमिटी गठित करून स्थळ पाहणी, अहवाल व जिल्हाधिकाऱ्यांची मोहर व स्वाक्षरी असलेले प्रमाणपत्र दिल्यानंतरच हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण होऊ शकते. ही कोणतीही प्रक्रिया पूर्ण न करता लघू पाटबंधारे विभागाने हा खटाटोप करण्यामागे मोठा घोटाळा दडला असल्याचा प्रकल्पग्रस्तांचा आरोप आहे.