शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

पुनर्वसनाचे नाव दिले; समस्यांचे गाव दिले

By admin | Updated: December 9, 2014 22:54 IST

कोणत्याही गावाचे पुनर्वसन करायचे असेल, तर त्या ठिकाणी मुलभूत १८ नागरी सुविधा असायला पाहिजे. मात्र एकही सुविधा पूर्णत्वास न जाता आणि हस्तांतरणाला तीन वर्षांचा कालावधी असताना लघू

लघू पाटबंधारे विभागाकडून नटाळाचे परस्पर हस्तांतरण राजेश भोजेकर - वर्धाकोणत्याही गावाचे पुनर्वसन करायचे असेल, तर त्या ठिकाणी मुलभूत १८ नागरी सुविधा असायला पाहिजे. मात्र एकही सुविधा पूर्णत्वास न जाता आणि हस्तांतरणाला तीन वर्षांचा कालावधी असताना लघू पाटबंधारे विभागाने सुविधा पूर्ण झाल्याचे प्रमाणित करून कारला रोडवर पिपरी(मेघे) येथे नटाळा या गावाचे परस्पर हस्तांतरण केले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, हा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असताना त्यांनाही याबाबत अंधारात ठेवल्याची खळबळजनक बाब पुढे आली आहे.प्रकल्पग्रस्त प्रज्वल चोरे यांनी पुनर्वसन गावात एकही नागरी सुविधा झाल्या नसल्याची बाब निदर्शनास आणून देण्यासाठी प्रकल्पग्रस्तांसह जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतली असता ही धक्कादायक बाब त्यांच्या निदर्शनास आली.सुकळी येथील लघू पाटबंधारे प्रकल्पांतर्गत नटाळा हे गाव येत होते. यामुळे २००७ पासून या गावाचे पुनर्वसन पिपरी(मेघे) येथे करण्यात आले. १५ आॅगस्ट २०११ रोजी गावात मुलभूत सुविधा अपूर्ण असताना लघू पाटबंधारे विभागाने परस्पर या गावाचे ग्रामपंचायतीला हस्तांरण केले आहे. याबाबत प्रकल्पग्रस्तांनी जिल्हाधिकारी, पुनर्वसन विभाग व जिल्हा परिषदेला माहिती मागितली असता नटाळा गावाचे हस्तांतरण अद्याप करण्यात आले नसल्याची माहिती देण्यात आली. वास्तविक, शासन परिपत्रकाप्रमाणे कमिटी गठित करून स्थळ पाहणी, अहवाल व जिल्हाधिकाऱ्यांची मोहर व स्वाक्षरी असलेले प्रमाणपत्र दिल्यानंतरच हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण होऊ शकते. ही कोणतीही प्रक्रिया पूर्ण न करता लघू पाटबंधारे विभागाने हा खटाटोप करण्यामागे मोठा घोटाळा दडला असल्याचा प्रकल्पग्रस्तांचा आरोप आहे.