शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षांपासून रखडले पुनर्वसन केंद्र

By admin | Updated: December 3, 2015 02:23 IST

अपंगांकरिता केंद्र व राज्य शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात. अपंगांच्या सक्षमीकरणासह त्यांच्या पुनर्वसनासाठी यात प्रयत्न होतात;

जागतिक अपंग दिन : केंद्र शासनाकडून निधी अप्राप्त, योजनांपासून अपंग वंचितश्रेया केने वर्धाअपंगांकरिता केंद्र व राज्य शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात. अपंगांच्या सक्षमीकरणासह त्यांच्या पुनर्वसनासाठी यात प्रयत्न होतात; पण तीन वर्षांपासून अपंग पुनर्वसन केंद्रच होऊ शकले नाही. केंद्र शासनाच्या निधीतून तरतूद असलेल्या या केंद्राकरिता निधीच पुरविला नसल्याने ते प्रत्यक्षात साकार होऊ शकले नाही. यामुळे अपंगांना योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. अपंगांकरिता शासनाच्या अनेक योजना आहेत. या योजना समाज कल्याण विभाग, अपंग वित्त विकास महामंडळ व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून राबविल्या जातात. यासाठी शासनाकडून निधीचा पुरवठा केला जातो. वर्धा जिल्ह्यात अपंगांच्या पुनर्वसनाकरिता जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्राची तरतूद करण्यात आली होती. या केंद्राकरिता केंद्र शासनाकडून निधी दिला जाणे अपेक्षित होते. सामाजिक संस्था (एनजीओ), समाज कल्याण विभाग आणि अपंग वित्त विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सदर केंद्र संचालित होणार होते. गत तीन वर्षांपासून तरतूद असली तरी केंद्र शासनाकडून निधी न मिळाल्याने हे केंद्र अद्याप संचालितच होऊ शकलेले नाही. या केंद्राच्या माध्यमातून अपंगांना सहायक उपकरणे वितरित केली जातात. केंद्र कार्यान्वित झाल्यास ट्रायसिकल, व्हीलचेअर यासह अन्य साहित्य सहज उपलब्ध होऊ शकते; पण केंद्राअभावी अपंगांना या साहित्यासाठी अनेक कार्यालयांत चकरा माराव्या लागतात.अपंगांकरिता असलेल्या अपंग व वित्त विकास महामंडळाची स्थापना २००२ मध्ये झाली. मुंबई मुख्यालय असलेल्या या महामंडळाचे येथील सामाजिक न्याय भवनात जिल्हा कार्यालय आहे. बेरोजगार अपंग सक्षम व्हावे, ते सक्षम व्हावे, उदरनिर्वाह तसेच त्यांचे पुनर्वसन व्हावे यासाठी महामंडळाकडून प्रयत्न केले जातात; पण जिल्हा कार्यालयात कर्मचाऱ्यांचाही अभाव आहे. चार पदे मंजूर असताना दोन पदे रिक्तच आहेत. यामुळे अपंगांच्या योजना प्रभावीपणे राबविणे शक्य होत नाही. परिणामी, अपंगांना योजनांपासून वंचित राहावे लागते. साहित्य प्राप्तीसाठीही अपंगांना त्रास सहन करावा लागत असून हा त्रास दूर करणे गरजेचे आहे. यासाठी शासनाने लक्ष देत महामंडळ सक्षम करणे आणि जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र सुरू करणे गरजेचे आहे.अपंगांकरिता राबविण्यात येत असलेल्या कर्ज योजनाअपंग बेरोजगारांकरिता वैयक्तिक थेट कर्ज योजना, मुदत कर्ज योजना, महिला समुद्धी, सुक्ष्म पतपुरवठा, शैक्षणिक कर्ज, व्यवसाय, शिक्षण व प्रशिक्षणासाठी कर्ज, मानसिक विकलांग अपंगांच्या पालकांसाठी स्वयंरोजगार योजना, अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारांतर्गत बांधकामाकरिता कर्ज, अपंग व्यक्तींना सहायक साधनांकरिता कर्ज, अपंग क्षेत्रात कार्यरत अशासकीय संस्थांना कर्ज आदी योजना राबविल्या जातात. विविध व्याज दर व कर्ज मर्यादेच्या माध्यमातून वित्तपुरवठा केला जातो. वैयक्तिक कर्ज योजना वगळता उर्वरित सर्व योजनांमध्ये महिलांना एक टक्का सुट देण्यात येते.