शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

येनिदोडका, रायपूर, गरमसूरचे पुर्नवसन करा

By admin | Updated: June 10, 2017 01:25 IST

जंगलव्याप्त परिसर असलेल्या कारंजा (घा.) तालुक्यातील येनिदोडकासह सेलू तालुक्यातील गरमसूर व रायपूर येथील नागरिक

ग्रामस्थांचे धरणे : जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जंगलव्याप्त परिसर असलेल्या कारंजा (घा.) तालुक्यातील येनिदोडकासह सेलू तालुक्यातील गरमसूर व रायपूर येथील नागरिक वन्यप्राण्यांच्या हैदोसान त्रस्त झाले आहे. यामुळे या भागातील ८० टक्के शेती पडीक राहते. यामुळे या गावांचा बोर अभयारण्यात समावेश करून त्यांचे पुर्नवसन करावे, या मागणीसाठी ग्रामस्थांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. आंदोलनादरम्यान सदर मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले. कारंजा (घा.) तालुक्यातील धानोली ग्रामपंचायतींतर्गत येत असलेल्या येनिदोडका येथे १०० घरांची लोकवस्ती आहे. सेलू तालुक्यातील रायपूर येथे १७५ व गरमसुर येथे ४५० घरांची लोकवस्ती आहे. तिन्ही गावे जंगलव्याप्त असल्याने वन्यप्राणी गावाकडे येतात. त्यांच्या हल्ल्याने पाळीव प्राण्यांसह गावकऱ्यांचाही जीव धोक्यात आला आहे. वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे अनेकांनी शेती करणे सोडले आहे. यामुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे या गावांचे पुर्नवसन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. धरणे आंदोलनात अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष नामदेव मेश्राम, ग्राम पुर्नवसन समितीचे उदाराम मंडारी, रामचंद्र मसराम, विठ्ठल मडावी, गरमसूरचे सरपंच वनमाला चोपडे, उपसरपंच ज्ञानेश्वर वरखडे, रायपूरचे सरपंच सुरेश चावरे, उपसरपंच माया कोराम यांच्यासह तिन्ही गावातील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपंचायतीने घेतला होता ठराव येनिदोडका, गरमसूर व रायपूर या तिन्ही गावातील नागरिकांनी एकमताने आपल्या गावाचा बोर अभयारण्यात समावेश करण्याचा ठराव घेतला आहे. सदर ठरावाला एकमताने ग्रा.पं.त मंजुरी मिळताच पुढील कार्यवाहीसाठी तो संबंधीतांना पाठविण्यात आला. परंतु, त्यावर कुठलीही कार्यवाही झाली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला. नागरिकांची समस्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य पाऊल उचलण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.