शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

डाटा एन्ट्री आॅपरेटरला नियमित मानधन द्या

By admin | Updated: November 8, 2014 22:43 IST

केंद्र शासनाच्या पंचायत राज मंत्रालयांतर्गत ई.पी.आर.आय. हा प्रकल्प सर्व राज्यामध्ये राबविला जात आहे. महाआॅनलाईन अंतर्गत ग्रामपंचायतींमध्ये सर्व कामे संगणकीकृत करण्यासाठी डाटा एट्री

वर्धा : केंद्र शासनाच्या पंचायत राज मंत्रालयांतर्गत ई.पी.आर.आय. हा प्रकल्प सर्व राज्यामध्ये राबविला जात आहे. महाआॅनलाईन अंतर्गत ग्रामपंचायतींमध्ये सर्व कामे संगणकीकृत करण्यासाठी डाटा एट्री आॅपरेटर मार्फत केली जातात. परंतु त्यांचे मानधन महाआॅनलाईनमार्फत नियमित केले जात नसल्याने ते नियमित करण्याची मागणी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना डाटा एंट्री आॅपरेटर युनियनच्या वतीने करण्यात आली. महाआॅनलाईन ही ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद स्तरावर कार्यतर आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार कंपनीद्वारे जि.प. स्तरावर १ संगणक प्रोग्रामर, ४ संगणक आॅपरेटर पं. स. स्तरावर १ संगणक प्रोगामर आणि २ आॅपरेटर व हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या ग्रा.पं. मध्ये प्रत्येकी १ डाटा एन्ट्री आॅपरेटरची नेमणूक केली आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार वरील सर्व पदांना ठरवून दिल्याप्रमाणे मानधन देण्यात येते. परंतु ग्रा. पं. स्तरावर असणाऱ्या डाटा एन्ट्री आॅपरेटर यांना ठरवून दिल्याप्रमाणे ८ हजार मानधन देण्याचा निर्णय आहे. तरीही आतापर्यंत ३५०० ते ४१०० प्रमाणे प्रत्येक आॅपरेटरला मानधन अदा केले जाते. त्यामुळे सदर कंपनी ग्रा.पं. आॅपरेटरचे आर्थिक शोषण करीत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. त्यातच आता नव्याने कोणतेही शासन परिपत्रक नसताना कंपनीनुसार महिन्याकाठी ४५० डाटा एन्ट्री करणे सक्तीचे असून ते न केल्यास काहीच मानधन देणार नाही असे जाहीर करून तालुका व जिल्हा समन्वयक यांच्यामार्फत सक्तीचे केले आहे. अनेकांना चार ते पाच महिनापासून मानधन नाही. दर दिवसाची हजेरी युनिटी आय.टी. ह्या सॉफ्टवेअरमध्ये लावली जाते. तरी मानधन मात्र अदा केल्या जात नाही. एकाच शासनाच्या परिपत्रकानुसार सर्वांना मानधन ठरवून दिले असतानाही आर्थिक शोषण होत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे वर्धा तालुक्यातील प्रत्येक ग्रा.पं. मधील डाटा एन्ट्री आॅपरेटरच्या वतीने कंपनीमार्फत आमचे आर्थिक व मानसिक शोषण करीत असल्याचा आरोप करीत निषेध व्यक्त केला आहे. तसेच वर्धा तालुका डाटा एन्ट्री आॅपरेटर युनियनमार्फत काम बंद करण्याचाही निर्णय घेतलेला आहे. तसेच कंपनी विरोधात सोमवारी १० नोव्हेंबर रोजी बजाज चौक ते जि. प. वर्धा पर्यंत रॅली काढण्यात येणार आहे. शिष्टमंडळात बिट्टू रावेकर, तुषार राऊत, निलेश वैरागडे, निखिल कहाथे, विपूल शिंदे, विवेक दुधकोहळे, काळे, धमाने, बावणे, शेंडे, टेकाम आदींचा सहभाग होता.(शहर प्रतिनिधी)