शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

डाटा एन्ट्री आॅपरेटरला नियमित मानधन द्या

By admin | Updated: November 8, 2014 22:43 IST

केंद्र शासनाच्या पंचायत राज मंत्रालयांतर्गत ई.पी.आर.आय. हा प्रकल्प सर्व राज्यामध्ये राबविला जात आहे. महाआॅनलाईन अंतर्गत ग्रामपंचायतींमध्ये सर्व कामे संगणकीकृत करण्यासाठी डाटा एट्री

वर्धा : केंद्र शासनाच्या पंचायत राज मंत्रालयांतर्गत ई.पी.आर.आय. हा प्रकल्प सर्व राज्यामध्ये राबविला जात आहे. महाआॅनलाईन अंतर्गत ग्रामपंचायतींमध्ये सर्व कामे संगणकीकृत करण्यासाठी डाटा एट्री आॅपरेटर मार्फत केली जातात. परंतु त्यांचे मानधन महाआॅनलाईनमार्फत नियमित केले जात नसल्याने ते नियमित करण्याची मागणी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना डाटा एंट्री आॅपरेटर युनियनच्या वतीने करण्यात आली. महाआॅनलाईन ही ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद स्तरावर कार्यतर आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार कंपनीद्वारे जि.प. स्तरावर १ संगणक प्रोग्रामर, ४ संगणक आॅपरेटर पं. स. स्तरावर १ संगणक प्रोगामर आणि २ आॅपरेटर व हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या ग्रा.पं. मध्ये प्रत्येकी १ डाटा एन्ट्री आॅपरेटरची नेमणूक केली आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार वरील सर्व पदांना ठरवून दिल्याप्रमाणे मानधन देण्यात येते. परंतु ग्रा. पं. स्तरावर असणाऱ्या डाटा एन्ट्री आॅपरेटर यांना ठरवून दिल्याप्रमाणे ८ हजार मानधन देण्याचा निर्णय आहे. तरीही आतापर्यंत ३५०० ते ४१०० प्रमाणे प्रत्येक आॅपरेटरला मानधन अदा केले जाते. त्यामुळे सदर कंपनी ग्रा.पं. आॅपरेटरचे आर्थिक शोषण करीत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. त्यातच आता नव्याने कोणतेही शासन परिपत्रक नसताना कंपनीनुसार महिन्याकाठी ४५० डाटा एन्ट्री करणे सक्तीचे असून ते न केल्यास काहीच मानधन देणार नाही असे जाहीर करून तालुका व जिल्हा समन्वयक यांच्यामार्फत सक्तीचे केले आहे. अनेकांना चार ते पाच महिनापासून मानधन नाही. दर दिवसाची हजेरी युनिटी आय.टी. ह्या सॉफ्टवेअरमध्ये लावली जाते. तरी मानधन मात्र अदा केल्या जात नाही. एकाच शासनाच्या परिपत्रकानुसार सर्वांना मानधन ठरवून दिले असतानाही आर्थिक शोषण होत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे वर्धा तालुक्यातील प्रत्येक ग्रा.पं. मधील डाटा एन्ट्री आॅपरेटरच्या वतीने कंपनीमार्फत आमचे आर्थिक व मानसिक शोषण करीत असल्याचा आरोप करीत निषेध व्यक्त केला आहे. तसेच वर्धा तालुका डाटा एन्ट्री आॅपरेटर युनियनमार्फत काम बंद करण्याचाही निर्णय घेतलेला आहे. तसेच कंपनी विरोधात सोमवारी १० नोव्हेंबर रोजी बजाज चौक ते जि. प. वर्धा पर्यंत रॅली काढण्यात येणार आहे. शिष्टमंडळात बिट्टू रावेकर, तुषार राऊत, निलेश वैरागडे, निखिल कहाथे, विपूल शिंदे, विवेक दुधकोहळे, काळे, धमाने, बावणे, शेंडे, टेकाम आदींचा सहभाग होता.(शहर प्रतिनिधी)