शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनच्या दराला उतरती कळा; शेतकऱ्यांचे १० हजारांचे स्वप्न भंगले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 14:49 IST

जिल्ह्यात महत्त्वाचे पीक म्हणून सोयाबीनकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. सोयाबीनला चांगला दर मिळेल म्हणून आशा निर्माण झाली असताना सोयाबीनचे भाव पडत आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी मोठ्या प्रमाणात निराशाच पडली आहे.

ठळक मुद्देसवंगणीची लगबग, पावसाचा व्यत्यय, शेतकरी अडचणीत

वर्धा: पंधरवड्यापूर्वी सोयाबीनचा विक्रमी भाव दहा हजार रुपये प्रतिक्विंटल होता. मात्र, याचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना कवडीचाही फायदा झाला नाही. अचानक दर घसरल्यानं शेतकरी चिंतातूर झाला आहे. 

मागील वर्षी सोयाबीनच्या उत्पादनात कमालीची घट आली होती. यामुळे शेतकऱ्यांकडे सोयाबीनच शिल्लक नव्हते. ज्यांच्याकडे होते ते विकून मोकळे झाले होते. तसेच व्यापाऱ्यांजवळही सोयाबीन नव्हते. यामुळे कधी न मिळालेला सोयाबीनला विक्रमी भाव जुलै - आगस्ट महिन्यात मिळाला. यामुळेच यंदा सोयाबीनला दहा हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळेल, असे स्वप्न उराशी बाळगून शेतकरी सोयाबीनची सवंगणी व काढणीला गती देत आहेत. पण, दिवसेंदिवस सोयाबीनचे दर पडत असल्याने शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाल्याचे चित्र दिसून येते. तसेच पाऊसही शेतकऱ्यांचा पिच्छा सोडेना, पावसाच्या व्यत्ययामुळे सोयाबीनच्या सवंगणीला विलंब होत असल्याचे शेतकरी सांगतात.

सोयाबीन निघण्याच्या अगदी तोंडावरच सोयाबीनचे भाव पडले. साधारणपणे १० हजार प्रतिक्विंटल सोयाबीनचा दर होता. दोन दिवसांपूर्वीच तो ८,२०० झाला. काल त्यात मोठी घसरण होऊन प्रतिक्विंटल ५,५०० ते ५,७०० दर आहे. म्हणजे तब्बल ४० ते ५० टक्के दर पडले आहेत. सोयाबीनचे दर पडणारच होते. गेल्याच आठवड्यात १५ लाख मेट्रिक टन सोयाबीन आयात केले आहे. याला महाराष्ट्र सरकारने लेखी विरोध केला आहे. त्यातच खाद्यतेल आयात शुल्क कमी केले आहे. त्याचबरोबर सोयापेंड १२ लाख टन आयात केली आहे. मग सोयाबीनचे भाव पडणारच, असे जाणकार शेतकरी सांगतात.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी