शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

सोयाबीनच्या दराला उतरती कळा; शेतकऱ्यांचे १० हजारांचे स्वप्न भंगले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 14:49 IST

जिल्ह्यात महत्त्वाचे पीक म्हणून सोयाबीनकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. सोयाबीनला चांगला दर मिळेल म्हणून आशा निर्माण झाली असताना सोयाबीनचे भाव पडत आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी मोठ्या प्रमाणात निराशाच पडली आहे.

ठळक मुद्देसवंगणीची लगबग, पावसाचा व्यत्यय, शेतकरी अडचणीत

वर्धा: पंधरवड्यापूर्वी सोयाबीनचा विक्रमी भाव दहा हजार रुपये प्रतिक्विंटल होता. मात्र, याचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना कवडीचाही फायदा झाला नाही. अचानक दर घसरल्यानं शेतकरी चिंतातूर झाला आहे. 

मागील वर्षी सोयाबीनच्या उत्पादनात कमालीची घट आली होती. यामुळे शेतकऱ्यांकडे सोयाबीनच शिल्लक नव्हते. ज्यांच्याकडे होते ते विकून मोकळे झाले होते. तसेच व्यापाऱ्यांजवळही सोयाबीन नव्हते. यामुळे कधी न मिळालेला सोयाबीनला विक्रमी भाव जुलै - आगस्ट महिन्यात मिळाला. यामुळेच यंदा सोयाबीनला दहा हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळेल, असे स्वप्न उराशी बाळगून शेतकरी सोयाबीनची सवंगणी व काढणीला गती देत आहेत. पण, दिवसेंदिवस सोयाबीनचे दर पडत असल्याने शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाल्याचे चित्र दिसून येते. तसेच पाऊसही शेतकऱ्यांचा पिच्छा सोडेना, पावसाच्या व्यत्ययामुळे सोयाबीनच्या सवंगणीला विलंब होत असल्याचे शेतकरी सांगतात.

सोयाबीन निघण्याच्या अगदी तोंडावरच सोयाबीनचे भाव पडले. साधारणपणे १० हजार प्रतिक्विंटल सोयाबीनचा दर होता. दोन दिवसांपूर्वीच तो ८,२०० झाला. काल त्यात मोठी घसरण होऊन प्रतिक्विंटल ५,५०० ते ५,७०० दर आहे. म्हणजे तब्बल ४० ते ५० टक्के दर पडले आहेत. सोयाबीनचे दर पडणारच होते. गेल्याच आठवड्यात १५ लाख मेट्रिक टन सोयाबीन आयात केले आहे. याला महाराष्ट्र सरकारने लेखी विरोध केला आहे. त्यातच खाद्यतेल आयात शुल्क कमी केले आहे. त्याचबरोबर सोयापेंड १२ लाख टन आयात केली आहे. मग सोयाबीनचे भाव पडणारच, असे जाणकार शेतकरी सांगतात.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी