शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
4
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
5
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
6
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
7
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
8
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
9
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
10
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
11
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
12
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
13
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
14
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
15
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
16
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
17
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
18
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
20
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या

जिल्ह्यात सिकलसेलच्या ९०१ रुग्णांची नोंद

By admin | Updated: June 21, 2017 00:50 IST

महाराष्ट्र राज्यात सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम २००८ पासून सुरू झाला आहे.

राज गहलोत : वाहकांची संख्या तब्बल ११ हजार ८२१ लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : महाराष्ट्र राज्यात सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम २००८ पासून सुरू झाला आहे. वर्धा जिल्ह्यात सिकलसेलचे ९०१ रुग्ण आणि ११ हजार ८२१ वाहक आहेत. ही अतिशय गंभीर बाब आहे. सिकलसेल वाहकाने निरोगी व्यक्तीशी विवाह केल्यास येणारे अपत्य निरोगी जन्माला येण्याची शक्यता अधिक असते. यासाठी लग्नापूर्वी उपवर मुला-मुलींच्या रक्ताची तपासणी व समाजात याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे, असे मत डॉ. राज गहलोत यांनी व्यक्त केले. १९ जून रोजी जागतिक सिकलसेल दिनाचा कार्यक्रम जिल्हा सामान्य रुग्णालयात आरोग्य विभाग व नामदेव महाराज बहुउद्देशीय शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते. कार्यक्रमाला अतिथी म्हणून निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य संपर्क विभाग) डॉ. विनोद वाघमारे, वैद्यकीय अधिकारी जिल्हा प्रशिक्षण पथक डॉ. मंगेश रेवतकर, डॉ. आंबेडकर कॉलेज आॅफ सोशल वर्कचे प्राचार्या डॉ. आनंदप्रकाश भेले, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. अनुजा बारापात्रे, मेट्रन पुनसे, आशा नगराळे आदी उपस्थित होते. सिकलसेल आजार हा आदिवासी भागात अधिक प्रमाणत आढळून येतो; पण जिल्ह्याची सिकलसेल रुगणांची संख्या पाहिल्यास या आजाराची गंभिरता लक्षात येते. पुढील पिढीला या आजारापासून वाचविण्याकरिता गर्भवती मातेने पहिल्या तीमाहित गर्भजल चाचणी परीक्षण करणे महत्त्वाचे आहे. याद्वारे बाळाला हा आजार आहे वा नाही, हे कळू शकते. योग्य औषधोपचाराने सिकलसेल रुग्णही साधारण व्यक्तीप्रमाणे आयुष्य जगू शकतो, असे डॉ. वाघमारे यांनी सांगितले. डॉ. रेवतकर यांनीही समयोचित मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. भेले यांनी आरोग्य विभाग व समाजकार्य विद्यार्थ्यांच्या माध्यमातून तळागाळातील व्यक्तींचे समूपदेशन करून जागृती करण्याकरिता सहकार्य करावे, असे आवाहन केले. शंकर तायडे यांनी रुग्णांना चांगले व दीर्घायुष्य जगण्याकरिता योगाचे महत्त्व काय, याबाबत माहिती दिली. नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थिनींनी पथनाट्य सादरीकरणातून संदेश दिला. संचालन सिकलसेल समुपदेशक देवांगण वाघमारे यांनी केले. प्रास्ताविक करीत आभार अन्नपूर्ण ढोबळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्रशांत कठाणे, अंकुश कांचणपुरे, प्रभाकर पाटील, जयश्री, जयमाला, हर्षद ढोबळे, राहुल बुचुंडे यांच्यासह रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.