शहरं
Join us  
Trending Stories
1
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
2
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
3
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
4
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
5
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
6
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
7
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
8
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
9
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
10
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
11
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
12
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
13
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
14
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
15
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
16
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
17
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
18
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
19
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
20
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!

भूतदया, करुणा, अहिंसेतून परमेश्वराची प्राप्ती करा

By admin | Updated: February 8, 2015 23:38 IST

मानवदेह मिळाल्यानंतर दुसऱ्याच्या कल्याणासाठी आपण झिजलो पाहिजे. आपल्या सदाचार सत्कर्मातून इतरांना मदत करा. जात, धर्म पंथाच्या भिंती पाडून एकमेकांवर करूणा,

मुनीश्री सुवीरसागर यांचे आवाहन पुलगाव : मानवदेह मिळाल्यानंतर दुसऱ्याच्या कल्याणासाठी आपण झिजलो पाहिजे. आपल्या सदाचार सत्कर्मातून इतरांना मदत करा. जात, धर्म पंथाच्या भिंती पाडून एकमेकांवर करूणा, पे्रमाचे अमृतसिंचन करा. जगा व दुसऱ्यांना जगू द्या या तत्वाचा अंगीकार करून अहिंसेच्या सुंदर मार्गाने आपल्या जीवनाचे सार्थक करा. देवालये, प्रार्थनामंदिरांमधील दगडांच्या देवाचा शोध घेणाऱ्यांनो परमेश्वर हा भूतदया करूणा, पे्रम, अहिंसा, बंधूभावातून प्राप्त होत असतो असे रोखठोक विचार बोधामृत कथामालेचे समारोपीय प्रवचनपुष्प गुंफताना मुनीश्री सुवीरसागरजी महाराज यांनी व्यक्त केले.महाराज म्हणाले, कुंभाराकडील मातीच्या गोळयास सुवासिनीच्या डोक्यावर मंगलकलश म्हणून स्थान मिळविण्यासाठी माती पायदळी तुडविण्यापासून भट्टीत भाजण्यापर्यंत अग्नी दिव्यातून जावे लागते. पाषाणाला देवत्वाची प्राप्ती होण्यासाठी लोहाराच्या घणाचे घाव सहन करावे लागतात. सुंदर आभुषण होण्यासाठी सुवर्णाला सोनाराच्या मुशीतून जावे लागते. तसेच मानवी जीवनाचेही आहे. सदाचार सहनशीलता व फळाची अपेक्षा न करता केलेले कर्तव्य व संकटाशी सामना करण्याची तयारी तसेच अग्नीदिव्यातून संघर्ष केला तर तुमच्या आयुष्याचे सोने झाल्याशिवाय राहणार नाही असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. सुवीरसागर पुढे म्हणाले, काही लोक नावासाठी कार्य करतात. रस्त्यावर चौकात, मंदिरात नावे लिहितात. पण व्यक्तीने कामच असे करावे की त्याचे नाव फलकावर नाही तर लोकांच्या हृदयात कोरले जाईल. परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने, होते. पुष्करणीच्या अस्तित्वाने कमळ फुलते तसेच शुद्ध भाव, लीनता, सहनशीलता आणि भक्तीमध्येच परमेश्वर सदैव तुमच्या पाठीशी असतो.दुख मे सुमीरन सब करे सुख मे ना करे कोय, सुख मे सुमीरन करे तो दुख काहे को आय’ या संत कबिराच्या दोह्याचा संदर्भ, संतश्रेष्ठ तुकोबारायांची ईश्वरभक्ती, दिल्लीचा लालकिल्ला व अकबर बिरबलचा किस्सा, गौतमबुद्ध राजहंस, भगवान महावीर व गौतम स्वामी यांच्या अनेक संदर्भकथेचे दाखले देवून मुनीश्रींनी परमेश्वराची भक्ताकडून अपेक्षा हा विषय भाविकांसमोर आपल्या बोधामृत रसपानातून मांडला. या कथामालेसाठी सतत तीन दिवस शहर व पंचकोशीतून समाजाच्या सर्व स्तरातील नागरिकांनी भरगच्च उपस्थिती दर्शवून अहिंसा व गोरक्षण चळवळीला बळकटी दिली. श्रोत्यांची दोन दिवस अल्पोपहाराची व्यवस्था सुभाष वंजारी यांनी केली होती. यशस्वीतेकरिता मुनी सेवा समिती, महिलामंच, जैन युवा मंच व सकल जैन समाज बांधवांनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)