शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

दुसऱ्यांच्या दु:खाने डोळ्यांत पाणी येणारा खरा श्रीमंत

By admin | Updated: February 1, 2017 01:20 IST

जलसंधारण करून बाहेरच्या पाण्याचा दुष्काळ संपविता येईल; पण डोळ्यातील पाण्याचा दुष्काळ

अविनाश सावजी : माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने निर्मित स्पंदन वसतिगृहातील कार्यक्रम हिंगणघाट : जलसंधारण करून बाहेरच्या पाण्याचा दुष्काळ संपविता येईल; पण डोळ्यातील पाण्याचा दुष्काळ संपविण्याची आज खरी गरज आहे. दुसऱ्यांच्या दु:खाने ज्या डोळ्यांत पाणी येते, तो खरा श्रीमंत असतो. अशाच व्यक्ती खऱ्या अर्थाने समाज घडवू शकतात, असे मत प्रयास सेवांकुरचे संस्थापक डॉ. अविनाश सावजी यांनी व्यक्त केले. विद्यार्थी सहायक समिती वरोराच्या हिंगणघाट परिवारातर्फे उभारलेल्या स्पंदन वसतिगृहाद्वारे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी तर अतिथी म्हणून आ. समीर कुणावार, विचारवंत डॉ. ब्रह्मदत्त पांडेय, पी.व्ही. टेक्सटाईल्सचे जामचे उपाध्यक्ष पारस मुणोत उपस्थित होते. डॉ. सावजी पूढे म्हणाले की, आज संवेदना ही बोथट होत चालली आहे. साने गुरूजी सारखे मातृहृदयी मन आज निर्माण होण्याची नितांत गरज आहे. यामुळे समाजमन अधिक निकोप होईल. मुलांवर शिक्षणाचे ओझे न टाकता त्यांना मुक्तपणे उमलू द्या व वेडी स्वप्ने त्यांना बघू द्या. नाही तर ती त्यांना पाहायला शिकवा. कारण, वेडी माणसेच इतिहास निर्माण करतात. त्यातूनच क्रांतीची बीजे तयार होत असतात, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अमृत लोणारे यांनी केले. हिंगणघाट येथील माजी शालेय विद्यार्थ्यांनी दिलेल्या आर्थिक मदतीच्या भरवशावर स्पंदन जीवन विकास केंद्र हिंगणघाटकरिता ४००० चौरस फुट जागेवर तीन मजली प्रशस्त इमारत निर्माण करण्यात आली आहे. याच इमारतीमध्ये तिसऱ्या माळ्यावर पी.व्ही. टेक्सटाईल्स जामच्या सहकार्याने ३००० चौरस फुटाचे प्रशस्त सभागृह पुर्णत्वास नेण्यात आल्याची माहितीही याप्रसंगी देण्यात आली. कार्यक्रमात विद्यार्थी सहाय्य समिती वरोराचे अध्यक्ष तथा संस्थापक सचिव प्रा. मधुकर उपलेंचवार यांच्या सेवाकार्याचा विशेष रूपाने उल्लेख करण्यात आला. याप्रसंगी आ. कुणावार, डॉ. पांडेय, नगराध्यक्ष बसंतानी यांनीही मार्गदर्शन केले. समितीचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी) पर्यावरण संवर्धन संस्थेच्या उपक्रमांचे कौतुक ४हिंगणघाट - शहरातील पर्यावरण संवर्धन संस्थेच्या कार्यकर्त्यांनी डॉ. अविनाश सावजी यांची भेट घेतली. शहरात पर्यावरण संवर्धन संस्थेने अनेक पर्यावरणपूरक उपक्रम राबविले आहेत. त्या उपक्रमांची माहिती जाणून घेत डॉ. सावजी यांनी संस्थेचे कौतुक केले. शिवाय पर्यावरणावर आधारित कार्यशाळेला उपस्थित राहण्याची ग्वाहीदेखील त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिली. ४आपण स्वत:वर आधी प्रेम करू लागलो की, इतरांवर प्रेम करता येऊ शकते. सर्वात आधी आपल्या मनात सेवेचा भाव जागृत झाला पाहिजे, तेव्हाच आपण माणसावर प्रेम करू लागतो, असे मतही डॉ. सावजी यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले. शहरात आणि ग्रामीण भागात प्लास्टिक वाढत आहे. यावर त्यांनी चिंता व्यक्त केली. त्यासाठी संस्थेने ठोस कार्य करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्यात. यावेळी संस्थेचे आशिष भोयर, अभिजीत डाखोरे, राजेंद्र कोंडावार, प्रदीप गिरडे, रमेश झाडे यांच्यासह मार्गदर्शक प्रा अमृत लोणारे, प्रा.डॉ. शरद कुहिकर, शरद कारामोरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.