शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाहेर ये तुला दाखवतो, तू तर बूट..." अनिल परबांनी 'गद्दार' म्हणताच शंभूराज देसाई भडकले, विधान परिषदेतच जुंपली
2
IND vs ENG: लॉर्ड्स कसोटीपूर्वी इंग्लंडचा मोठा डाव, खेळपट्टीच बदलून टाकली, कुणाला मिळणार मदत?
3
Glen Industries IPO च्या GMP मध्ये तुफान तेजी; आतापर्यंत ४३ पट झाला सबक्राइब, पाहा डिटेल्स
4
संजय शिरसाट यांना आयकर नोटीस; विट्स हॉटेल लिलावाच्या चौकशी आदेशानंतर दुसरा धक्का
5
जुना मित्र पुन्हा कामाला आला! रशिया १० लाख भारतीयांना रोजगार देणार, कधीपर्यंत अर्ज करता येणार?
6
"मुंबई, महाराष्ट्रात मराठी माणसाला घर नाकारलं तर..."; मंत्री शंभूराज देसाईंची महत्त्वाची घोषणा
7
उत्तरेत सुरू झाला, महाराष्ट्रात श्रावण कधीपासून? पाहा, यंदा किती श्रावणी सोमवार अन् महत्त्व
8
परदेशातून आल्यावर थरूर यांचा काँग्रेसवरच आणीबाणी बॉम्ब; लेखात इंदिरा गांधींवर जबर टीका, म्हणाले... 
9
Sindoor Bridge: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंदूर उड्डाणपुलाचे उद्घाटन
10
एका शब्दावरून निवडणूक आयोग अडकला, सर्वोच्च न्यायालयात मतदार पुनरावलोकनावरील सुनावणीवेळी झाली कोंडी
11
Airtel Recharge Plan: २०० रुपयांपेक्षा स्वस्तातील एअरटेलचे हे प्लान्स आहेत बेस्ट, WiFi असलेल्या लोकांना होणार मोठा फायदा
12
YouTube'ने नियम बदलले! आता अशा कंटेंटसाठी पैसे मिळणार नाहीत, जाणून घ्या संपूर्ण माहिती
13
सेबीने जेन स्ट्रीट प्रकरण जाणूनबुजून लांबवले? माधवी बुच यांचा 'स्फोटक' खुलासा, आता सत्य काय?
14
चिंताजनक! ४० दिवसांत हार्ट अटॅकने २३ जणांचा मृत्यू; 'या' राज्यात खळबळ, रुग्णालयात प्रचंड गर्दी
15
सोनम-राजाला विसरलास का? घरमालकाच्या प्रेमात वेड्या झालेल्या पत्नीने थेट पतीलाच दिली धमकी
16
बीकेसीच्या रिक्षावाल्यानंतर आता कारवाली; कारमध्ये बसून कमावतेय तासाला ₹३५००...
17
Food Recipe: जेवणात तोंडी लावायला नसेल काही, तेव्हा करा ही चटपटीत दही तिखारी!
18
Smart Coworking IPO सबस्क्रिप्शनसाठी खुला; गुंतवणूकीपूर्वी इश्यू प्राईज, GMP सह जाणून घ्या डिटेल्स
19
सारा तेंडुलकर अन् शुबमन गिल पुन्हा एकत्र; कार्यक्रमाचा VIDEO झाला व्हायरल; चर्चांना उधाण
20
२७ नोव्हेंबरपर्यंत शनि वक्री: ९ राशींना १३८ दिवस लाभ, पद-पैसा; भरघोस भरभराट, भाग्योदय काळ!

झोपडपट्टीवासीयांच्या जागेकरिता रिपाइं रस्त्यावर

By admin | Updated: September 1, 2015 02:53 IST

महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार शासकीय जागेवर अतिक्रमण करून झोपडी बांधून राहात असलेल्यांना स्थायी पट्टे

वर्धा : महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार शासकीय जागेवर अतिक्रमण करून झोपडी बांधून राहात असलेल्यांना स्थायी पट्टे देण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वर्धेत मात्र या निर्णयास बगल देण्यात येत असल्याचा आरोप करीत सोमवारी रिपाइं (आठवले)च्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांना मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनानुसार, जिल्ह्यातील ग्रामीण भागात व शहरी भागात गरजू गरीब नागरिक शासकीय जागेवर झोपडी बांधून राहत आहे. त्यांचे अतिक्रमण हे २००० पूर्वीचे आहे. त्यांच्या जवळ दुसरे घर नाही. जास्तीत जास्त अतिक्रमण केलेली दारिद्र्य रेषेखालील व भटक्या विमुक्त जातीचे आदिवासी व मागासलोक आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाचे घरकुल योजनेतून घर मंजूर झाले; परंतु त्यांच्याजवळ स्थायी पट्टे नसल्यामुळे ते या योजनेपासून वंचित राहत आहेत. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात शासनातर्फे भूसंपादन करून गरजूंना प्लॉट वाटप केले. त्यापैकी बरेच प्लॉटचे वाटप न झाल्यामुळे गरजुंनी त्यावर घरे बांधली आहे. त्याचे रितसर अर्ज जिल्हाधिकारी यांना सादर केली. काही लोकांनी दंड सुद्धा भरला आहे; परंतु या संदर्भात कोणतीही कार्यवाही झाली नाही. झोपडपट्टीवासीयांना स्थायी पट्टे देण्यात यावे याकरिता अनेकवार आंदोलने झाली मात्र कारवाई शुन्यच आरोप यावेळी केला. निवेदन देतेवेळी विजय आगलावे, प्रकाश पाटील, अजय मेहरा, अ‍ॅड. राजेश थुल, सुरेंद्र पुनवटकर, सुभाष कांबळे, मोहन वनकर, राजू वासेकर, विजय चन्ने, सत्तार पठाण, मुन्ना पठाण, व्यंकट येधानी, देवानंद तेलतुमडे, धर्मपाल शंभरकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.(प्रतिनिधी)