शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

झोपडपट्टीवासीयांच्या जागेकरिता रिपाइं रस्त्यावर

By admin | Updated: September 1, 2015 02:53 IST

महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार शासकीय जागेवर अतिक्रमण करून झोपडी बांधून राहात असलेल्यांना स्थायी पट्टे

वर्धा : महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार शासकीय जागेवर अतिक्रमण करून झोपडी बांधून राहात असलेल्यांना स्थायी पट्टे देण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वर्धेत मात्र या निर्णयास बगल देण्यात येत असल्याचा आरोप करीत सोमवारी रिपाइं (आठवले)च्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांना मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनानुसार, जिल्ह्यातील ग्रामीण भागात व शहरी भागात गरजू गरीब नागरिक शासकीय जागेवर झोपडी बांधून राहत आहे. त्यांचे अतिक्रमण हे २००० पूर्वीचे आहे. त्यांच्या जवळ दुसरे घर नाही. जास्तीत जास्त अतिक्रमण केलेली दारिद्र्य रेषेखालील व भटक्या विमुक्त जातीचे आदिवासी व मागासलोक आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाचे घरकुल योजनेतून घर मंजूर झाले; परंतु त्यांच्याजवळ स्थायी पट्टे नसल्यामुळे ते या योजनेपासून वंचित राहत आहेत. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात शासनातर्फे भूसंपादन करून गरजूंना प्लॉट वाटप केले. त्यापैकी बरेच प्लॉटचे वाटप न झाल्यामुळे गरजुंनी त्यावर घरे बांधली आहे. त्याचे रितसर अर्ज जिल्हाधिकारी यांना सादर केली. काही लोकांनी दंड सुद्धा भरला आहे; परंतु या संदर्भात कोणतीही कार्यवाही झाली नाही. झोपडपट्टीवासीयांना स्थायी पट्टे देण्यात यावे याकरिता अनेकवार आंदोलने झाली मात्र कारवाई शुन्यच आरोप यावेळी केला. निवेदन देतेवेळी विजय आगलावे, प्रकाश पाटील, अजय मेहरा, अ‍ॅड. राजेश थुल, सुरेंद्र पुनवटकर, सुभाष कांबळे, मोहन वनकर, राजू वासेकर, विजय चन्ने, सत्तार पठाण, मुन्ना पठाण, व्यंकट येधानी, देवानंद तेलतुमडे, धर्मपाल शंभरकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.(प्रतिनिधी)