शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

कराराच्या मागणीसाठी रापमचे कामगार संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 22:25 IST

रा.प.म.च्या कामगारांनी वेतन कराराच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपात मोठ्या संख्येने वाहक व चालक सहभागी झाल्याने रापमच्यावतीने देण्यात येणारी प्रवासी वाहतूक सेवा शुक्रवारी सकाळी खोळंबली होती.

ठळक मुद्देवाहतूक सेवा खोळंबली : लाखोंचा आर्थिक फटका

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : रा.प.म.च्या कामगारांनी वेतन कराराच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपात मोठ्या संख्येने वाहक व चालक सहभागी झाल्याने रापमच्यावतीने देण्यात येणारी प्रवासी वाहतूक सेवा शुक्रवारी सकाळी खोळंबली होती. या संपात सर्वच संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले नसले तरी अपुऱ्या मनुष्यबळामुळे रापमच्या वर्धा विभागातील पाचही आगारातून अनेक बस फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. परिणामी, रापमला लाखांचा आर्थिक फटकाच बसला.रापमच्या वर्धा विभागाच्या अंतर्गत पाच आगार आहेत. या पाचही आगारातून दररोज ३५९ बस फेºयांचे नियोजन केले जाते. रापमच्या कामगारांनी आपल्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारल्याने शुक्रवारी दुपारी १२ वाजेपर्यंत ७६ बस फेऱ्या रद्द झाल्या होत्या. जसजसा सूर्य मावळतीला गेला तसतशा बस फेऱ्याही रद्द होण्याच्या संख्येत वाढ झाल्याचे रापमच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. रापमच्या वाहक, चालक व कर्मचाऱ्यांकडून बेमुदत संप जाहीर होताच मध्यरात्री वर्धा आगारात कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.या आगारात एकूण ७९ बसेस असून त्यापैकी रात्रपाळीला ३० बसेस सोडण्यात आल्या होत्या. तर १४ बसेस परतीच्या प्रवासासाठी रवाना झाल्याचे सांगण्यात आले. सदर बेमुदत संपात कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह संपूर्ण कार्यकर्ते तसेच एमएमकेचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. संपात सहभागी रापमच्या वाहक, चालक व कर्मचाºयांनी वर्धा आगारासमोर दिवसभर ठिय्या देत सरकार विरोधी निदर्शने केली.अन् पोलीस बंदोबस्तात आगारातून बाहेर पडल्या बसेसफेºयांचे नियोजन केल्यानंतर जे रापमचे चालक व वाहक संपात सहभागी नाही त्यांच्याकडून आगारात उभी असलेली बस बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी संपात सहभागी वाहक, चालक व इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना आगाराच्या मुख्य द्वारावर अडविल्याने काही काळाकरिता तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या शांततापूर्ण तणावाच्या वातावरणात अखेर पोलिसांनी मध्यस्ती करून आगारात उभ्या असलेल्या बसेस आगाराबाहेर काढल्या.कामगारांसह कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारल्याने दुपारी १२ वाजेपर्यंत जिल्ह्यातील ७६ बस फेऱ्या रद्द झाल्या आहेत. अल्प मनुष्यबळामुळे बस फेऱ्या रद्द झाल्याने रापमच्या वर्धा विभागाचे मोठ्या प्रामाणात नुकसान झाले आहे. हे नुकसान लाखोंच्या घरात आहे.- चेतन हासबनीस, विभाग नियंत्रक, रा.प.म. वर्धा.

टॅग्स :ST Strikeएसटी संप