शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

कराराच्या मागणीसाठी रापमचे कामगार संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 22:25 IST

रा.प.म.च्या कामगारांनी वेतन कराराच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपात मोठ्या संख्येने वाहक व चालक सहभागी झाल्याने रापमच्यावतीने देण्यात येणारी प्रवासी वाहतूक सेवा शुक्रवारी सकाळी खोळंबली होती.

ठळक मुद्देवाहतूक सेवा खोळंबली : लाखोंचा आर्थिक फटका

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : रा.प.म.च्या कामगारांनी वेतन कराराच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपात मोठ्या संख्येने वाहक व चालक सहभागी झाल्याने रापमच्यावतीने देण्यात येणारी प्रवासी वाहतूक सेवा शुक्रवारी सकाळी खोळंबली होती. या संपात सर्वच संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले नसले तरी अपुऱ्या मनुष्यबळामुळे रापमच्या वर्धा विभागातील पाचही आगारातून अनेक बस फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. परिणामी, रापमला लाखांचा आर्थिक फटकाच बसला.रापमच्या वर्धा विभागाच्या अंतर्गत पाच आगार आहेत. या पाचही आगारातून दररोज ३५९ बस फेºयांचे नियोजन केले जाते. रापमच्या कामगारांनी आपल्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारल्याने शुक्रवारी दुपारी १२ वाजेपर्यंत ७६ बस फेऱ्या रद्द झाल्या होत्या. जसजसा सूर्य मावळतीला गेला तसतशा बस फेऱ्याही रद्द होण्याच्या संख्येत वाढ झाल्याचे रापमच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. रापमच्या वाहक, चालक व कर्मचाऱ्यांकडून बेमुदत संप जाहीर होताच मध्यरात्री वर्धा आगारात कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.या आगारात एकूण ७९ बसेस असून त्यापैकी रात्रपाळीला ३० बसेस सोडण्यात आल्या होत्या. तर १४ बसेस परतीच्या प्रवासासाठी रवाना झाल्याचे सांगण्यात आले. सदर बेमुदत संपात कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह संपूर्ण कार्यकर्ते तसेच एमएमकेचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. संपात सहभागी रापमच्या वाहक, चालक व कर्मचाºयांनी वर्धा आगारासमोर दिवसभर ठिय्या देत सरकार विरोधी निदर्शने केली.अन् पोलीस बंदोबस्तात आगारातून बाहेर पडल्या बसेसफेºयांचे नियोजन केल्यानंतर जे रापमचे चालक व वाहक संपात सहभागी नाही त्यांच्याकडून आगारात उभी असलेली बस बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी संपात सहभागी वाहक, चालक व इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना आगाराच्या मुख्य द्वारावर अडविल्याने काही काळाकरिता तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या शांततापूर्ण तणावाच्या वातावरणात अखेर पोलिसांनी मध्यस्ती करून आगारात उभ्या असलेल्या बसेस आगाराबाहेर काढल्या.कामगारांसह कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारल्याने दुपारी १२ वाजेपर्यंत जिल्ह्यातील ७६ बस फेऱ्या रद्द झाल्या आहेत. अल्प मनुष्यबळामुळे बस फेऱ्या रद्द झाल्याने रापमच्या वर्धा विभागाचे मोठ्या प्रामाणात नुकसान झाले आहे. हे नुकसान लाखोंच्या घरात आहे.- चेतन हासबनीस, विभाग नियंत्रक, रा.प.म. वर्धा.

टॅग्स :ST Strikeएसटी संप