शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र! दररोज ४० मिनिटे जिहाद ट्रेनिंग; मसूद अजहरनं बहिणीवर सोपवली जबाबदारी
2
'पीएम मोदी गोष्टी लपवतात; ट्रम्प त्या उघड करतात', रशियन तेल खरेदीवरुन काँग्रेसचे टीकास्त्र
3
फरार मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा; बेल्जियम कोर्टाची प्रत्यर्पणास मंजुरी
4
‘निवडणुका जवळ आल्याने सत्ताधारी आमदारांना निधीच्या रूपात वाटली जातेय खैरात’, काँग्रेसचा आरोप
5
मारुतीच्या पहिल्या इलेक्ट्रिक SUV ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये होणार लाँच, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
6
हृदयस्पर्शी! आधी लेक गमावली, मुलालाही झाला तोच आजार; आईने लिव्हर देऊन वाचवला जीव
7
काय सांगता? स्मृती इराणींच्या 'या' मालिकेत झळकणार बिल गेट्स; कोणतं पात्र साकारणार?
8
अवघी ४० हजार लोकसंख्या, एकही विमानतळ नाही! तरीही जगातील श्रीमंत देशांच्या यादीत 'हा' देश कसा?
9
दिवाळीला रितेश देशमुख कुटुंबापासून दूर, मुलांनी लिहिलेलं पत्र वाचून म्हणाला, "और जीने को..."
10
फ्रान्सच्या संग्रहालयात 'धूम' स्टाईल चोरी; ८०० कोटींचे दागिने घेऊन चोर फरार; ७ मिनिटांत झाला 'गेम'
11
आघाडीबाबत भाई जगताप यांच्या विधानामुळे मविआत फटाके, नंतर स्पष्टीकरण देत म्हणाले...
12
Neeraj Chopra Lieutenant Colonel : राजनाथ सिंह अन् सेनाप्रमुखांकडून 'गोल्डन बॉय'चा सन्मान (VIDEO)
13
अंतर्गत मतभेदांदरम्यान टाटा ट्रस्ट्सनं वेणू श्रीनिवासन यांची आजीवन विश्वस्त म्हणून केली नियुक्ती; आता मेहली मिस्त्री यांच्यावर नजर
14
मोठी बातमी! सोन्या-चांदीचा बुडबुडा फुटला....! एकच झटक्यात सोनं 3725 तर चांदी 10549 रुपयांनी स्वस्त! जाणून घ्या कारण
15
भारी! WhatsApp, Instagram चॅटिंग होणार सुरक्षित; स्कॅम रोखण्यासाठी मेटाने आणलं नवीन टूल
16
कोट्यवधींचं घबाड! १ कोटी कॅश, लाखोंचे दागिने, ८५ ATM; चहावाल्याचा पर्दाफाश, पोलीस हैराण
17
फ्लॅटमध्ये लिव्ह-इनमध्ये राहत होतं जोडपं, दिवाळीच्या दिवशी दुर्गंधी आल्यानं उघडला तर...; दृश्य पाहून सगळेच हादरले
18
हिऱ्याच्या खरेदीपूर्वी ‘हे’ चार नियम माहीत करून घ्या! कट, क्लॅरिटी, कलर, कॅरेटचा फॉर्म्युला काय सांगतो?
19
भारताच्या 'या' स्कीममुळे शेजारी चीनला लागली मिरची; तक्रार घेऊन पोहोचला WTO च्या दरबारी
20
बदल्याची आग! "माझ्यासोबत तुझी बहीण पळून..."; टोमण्यांना कंटाळला, घेतला तरुणाचा जीव

निवडणुकीच्या नावावर तहसील कार्यालय रामभरोसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 00:02 IST

येथील तहसील कार्यालयात दररोज नागरिकांची गर्दी असते. कार्यालयात आलेल्यांना अधिकारी व कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचे कारण सांगतात. त्यामुळे अनेकांना कार्यालयातील रिकाम्या खुर्च्या पाहूनच परतावे लागतात. त्यामुळे तीव्र रोष व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देनागरिकांना हेलपाटे : कार्यालयाची सुरक्षाही वाऱ्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : येथील तहसील कार्यालयात दररोज नागरिकांची गर्दी असते. कार्यालयात आलेल्यांना अधिकारी व कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचे कारण सांगतात. त्यामुळे अनेकांना कार्यालयातील रिकाम्या खुर्च्या पाहूनच परतावे लागतात. त्यामुळे तीव्र रोष व्यक्त होत आहे.तालुक्यातील विद्यार्थी व नागरिकांना शिधा पत्रिका, उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र आदीची गरज असल्याने ग्रामीण भागातील नागरिक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात या कार्यालयात येतात. विशेषत: २५ पायऱ्या चढून या कार्यालयात जावे लागत असल्याने याचा वयोवृद्धांना मोठा त्रास होत आहे. त्यातही कार्यालयात गेल्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रिकाम्या खुर्च्यांचे दर्शन घ्यावे लागत आहे. बोटावर मोजण्याइतकेच कर्मचारी कार्यालयात राहत असून त्यांना विचारणा केल्यावर तेही उडवाउडवीचे उत्तर देत निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचे सांगतात. काही कर्मचारी तर आलेल्यांना दमदाटी करीत कुणाला तक्रार करायची असेल त्यांच्याकडे तक्रार करा, असा उपराटा सल्लाही देत असल्याने नागरिकांचा पारा चढत आहे.शुक्रवारी आमगाव (खडकी) येथील वृद्ध नागरिक नामदेव रामाजी नेहारे हे सकाळी ११ वाजता स्टॅम्प अपेडेव्हीट करण्यासाठी तहसील कार्यालयात आले होते. त्यांनी तहसील कार्यालयातील सर्व टेबलवर चौकशी केली पण कुणीही माहिती दिली नाही. कामाच्या प्रतीक्षेत इतक्या उन्हाच्या तीव्रतेत दुपारी अडीच वाजतापर्यंत ताटकाळत राहीले. परंतू एकही अधिकारी व कर्मचारी उपलब्ध झाला नाही. हाच अनुभव इतरही नागरिकांना आला.तहसील कार्यालय सकाळी १० वाजता उघडले असले तरी १०.३० वाजतापर्यंत एकही कर्मचारी या कार्यालयात उपस्थित नव्हता.त्यामुळे कार्यालयातील वस्तू व दस्तऐवजाची सुरुक्षा वाºयावरच असल्याचे दिसून आले. मागील आठवड्यात आल्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकीचे कारण सांगितले जात होते तर आता लोकसभा निवडणुकीचे कारण दिले जात असल्याने नागरिकांनी किती दिवस प्रतीक्षा करावी, असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे....तर कार्यालय कुलूप बंद ठेवावेकार्यालयात कामानिमित्त आलेल्यांना सध्या निवडणुकीच्या कामांचा व्यस्त असल्याचे कारण दिले जात आहे. त्यामुळे नागरिकांना आल्यापावलीच परतावे लागत असल्याने कारण देण्यापेक्षा कार्यालयच कुलूप बंद करुन ठेवा, असा संताप व्यक्त होत आहे. 

टॅग्स :TahasildarतहसीलदारElectionनिवडणूक