शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

देशात राममंदिर बनलं, पण ‘साधराम’ असुरक्षितच! प्रवीण तोगडिया

By रवींद्र चांदेकर | Updated: March 21, 2024 19:29 IST

हिंदूंच्या प्रश्नावर पत्रकार परिषदेत साधला संवाद

आनंद इंगोले, वर्धा: देशामध्ये सातत्याने हिंदूंवर अन्याय होत आहे. छत्तीसगडमधील कवरझा येथील ‘साधराम’ नामक हिंदू व्यक्तीचा गळा कापण्यात आला. असाच प्रकार इतरही राज्यात सुरू असून, आजही देशात हिंदू असुरक्षितच आहे. एकीकडे देशामध्ये राममंदिर बांधण्यात आले, पण 'साधराम' असुरक्षित आहे, असे मत आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

एका बैठकीच्या निमित्ताने ते वर्धेत आले होते. उत्तर प्रदेश, छत्तीसगड, गुजरात यासह इतरही ठिकाणी हिंदूंची हत्या केली जात आहे. त्या रोखण्यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. देशात जिहादींची हिंमत वाढत असल्यामुळे हिंदूंना अन्यायाचा सामना करावा लागत आहे. सरकार कुणाचे आहे, हा प्रश्न नाही. भाजपाचे सरकार असो वा काँग्रेसचे सरकार असो, यात सरकार आपली भूमिका पार पाडत आहे. ते योग्य पावले उचलून कारवाई करीत आहे. या प्रकाराला केवळ जिहादी दोषी असून त्यांचा निपटारा करण्यासाठी हिंदू राष्ट्र निर्मितीची आवश्यकता असल्याचेही डॉ. प्रवीण तोगडिया म्हणाले.

ज्याप्रमाणे देशात विकासकामे करण्याकरिता शासनाची जिल्हा विकास यंत्रणा ‘डीडीओ’ कार्यरत असते, त्याचप्रमाणे हिंदूंच्या विकासाकरिता आमची ‘एचडीओ’ हनुमान चालिसा विकास यंत्रणा कार्यरत आहे. यातून गावापासून तर शहरापर्यंत प्रत्येक भागात कार्य करून हिंदूंना समृद्ध करण्याचे काम करीत आहे. देशभरात आतापर्यंत १२ हजार हनुमान चालिसा केंद्र स्थापन केले असून ते कार्यरत आहे. यामध्ये आणखी वाढ करण्याचे प्रयत्न असल्याचेही डॉ. प्रवीण तोगडिया यांनी सांगितले. पत्रपरिषदेला आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे विदर्भ प्रांत कार्याध्यक्ष मोतीलाल चौधरी, विदर्भ प्रांतमंत्री योगेश गायकवाड, राष्ट्रीय बजरंग दलाचे विदर्भ प्रांताध्यक्ष अनुप जयस्वाल आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :wardha-acवर्धा