शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

देशात राममंदिर बनलं, पण ‘साधराम’ असुरक्षितच! प्रवीण तोगडिया

By रवींद्र चांदेकर | Updated: March 21, 2024 19:29 IST

हिंदूंच्या प्रश्नावर पत्रकार परिषदेत साधला संवाद

आनंद इंगोले, वर्धा: देशामध्ये सातत्याने हिंदूंवर अन्याय होत आहे. छत्तीसगडमधील कवरझा येथील ‘साधराम’ नामक हिंदू व्यक्तीचा गळा कापण्यात आला. असाच प्रकार इतरही राज्यात सुरू असून, आजही देशात हिंदू असुरक्षितच आहे. एकीकडे देशामध्ये राममंदिर बांधण्यात आले, पण 'साधराम' असुरक्षित आहे, असे मत आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

एका बैठकीच्या निमित्ताने ते वर्धेत आले होते. उत्तर प्रदेश, छत्तीसगड, गुजरात यासह इतरही ठिकाणी हिंदूंची हत्या केली जात आहे. त्या रोखण्यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. देशात जिहादींची हिंमत वाढत असल्यामुळे हिंदूंना अन्यायाचा सामना करावा लागत आहे. सरकार कुणाचे आहे, हा प्रश्न नाही. भाजपाचे सरकार असो वा काँग्रेसचे सरकार असो, यात सरकार आपली भूमिका पार पाडत आहे. ते योग्य पावले उचलून कारवाई करीत आहे. या प्रकाराला केवळ जिहादी दोषी असून त्यांचा निपटारा करण्यासाठी हिंदू राष्ट्र निर्मितीची आवश्यकता असल्याचेही डॉ. प्रवीण तोगडिया म्हणाले.

ज्याप्रमाणे देशात विकासकामे करण्याकरिता शासनाची जिल्हा विकास यंत्रणा ‘डीडीओ’ कार्यरत असते, त्याचप्रमाणे हिंदूंच्या विकासाकरिता आमची ‘एचडीओ’ हनुमान चालिसा विकास यंत्रणा कार्यरत आहे. यातून गावापासून तर शहरापर्यंत प्रत्येक भागात कार्य करून हिंदूंना समृद्ध करण्याचे काम करीत आहे. देशभरात आतापर्यंत १२ हजार हनुमान चालिसा केंद्र स्थापन केले असून ते कार्यरत आहे. यामध्ये आणखी वाढ करण्याचे प्रयत्न असल्याचेही डॉ. प्रवीण तोगडिया यांनी सांगितले. पत्रपरिषदेला आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे विदर्भ प्रांत कार्याध्यक्ष मोतीलाल चौधरी, विदर्भ प्रांतमंत्री योगेश गायकवाड, राष्ट्रीय बजरंग दलाचे विदर्भ प्रांताध्यक्ष अनुप जयस्वाल आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :wardha-acवर्धा