जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : खासदार व आमदारांनाही साकडे वर्धा : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती संपूर्ण देशभर साजरा होत आहे. हेच औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याजवळ येऊन सामाजिक संघटनांचे पदाधिकारी त्यांना नमन करतात. यामुळे येथे एक मंच बांधावा, या मागणीचे निवेदन खा. रामदास तडस, आ. डॉ. पंकज भोयर यांना पोहोचविण्याकरिता जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांना रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्यावतीने देण्यात आले. प्रबोधनात्मक किंवा सांस्कृतिक कार्यक्रम अथवा अन्य बाबीसंबंधी सभा, मोर्चा असला की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास नमन करूनच कार्यक्रमाला प्रारंभ होतो. त्याचप्रमाणे सदर ठिकाणीच उपरोक्त समारंभ नेहमीच होत असतात. या संपूर्ण बाबींचा अभ्यास करून आपल्या निधीमार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या मागे पाटबंधारे कार्यालयालगत शासनाची मोकळी जागा उपलब्ध आहे. त्या ठिकाणी १५-२० लोकं बसतील असा एक मंच, तसेच पाण्याकरिता एक हातपंप द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यामुळे डॉ. आंबेडकर यांच्या अनगिनत अनुयायी तसेच सर्व स्तरातील जनतेला त्याचा लाभ होईल, सादर करण्यात आलेल्या असे निवेदनात नमुद आहे. निवेदन देताना आरपीआयचे जिल्हाध्यक्ष गोकुल पांडे, जनरल सेके्रटरी अॅड. नरेंद्र पाटील, उपाध्यक्ष अॅड. अनिल ओरके, अॅड. प्रताप माळोदे, गणेश चौधरी, अॅड. आशिष मेश्राम यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.(प्रतिनिधी) मंच उभारल्यास कार्यक्रम करणे सोईचे होईलया पुतळ्याजवळ मंच तयार करण्यात आल्यास त्याचा लाभ येथे एकत्र येणार असलेल्या नागरिकांना होईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या पुतळ्याजवळ जयंती वा इतर कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. आता येथे होणाऱ्या कार्यक्रमाची संख्याही वाढली आहे. त्यामुळे येथे मंच बाधण्याची मागणी आहे.
डॉ.आंबेडकर पुतळ्याजवळ सभामंच उभारा
By admin | Updated: February 13, 2016 01:32 IST