शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

पांढऱ्या सोन्याची बाजारपेठ ओस; व्यापारी दारोदारी, शेतकऱ्यांकडून कापूस मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2022 14:45 IST

भाववाढीची प्रतीक्षा

विजय माहुरे

सेलू (घोराड) (वर्धा) : दसऱ्यापासून फुलणारी पांढऱ्या सोन्याची बाजारपेठ नागदिवाळी आली तरी ओसच पडलेली दिसून येत आहे. आधीच अतिवृष्टीमुळे कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांना भाववाढीची प्रतीक्षा असल्याने खेडा खरेदीलाही प्रतिसाद नाही. व्यापारी कापसाकरिता गावोगावी जात असून, त्यांनाही शेतकरीकापूस देत नसल्याने रिकाम्या हातानेच परतावे लागत असल्याचे चित्र आहे.

कृषी विभागाच्या नियोजनानुसार यावर्षीच्या खरिपात ४ लाख ३७ हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले होते. सुमारे २ लाख १५ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली होती. सुरुवातीला पावसाअभावी आणि नंतर अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कपाशीच्या उत्पादनात घट होणार असल्याने भाव वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

दरवर्षी दसऱ्यापर्यंत कापूस निघायला सुरुवात व्हायची. गावात येणाऱ्या व्यापाऱ्याला थोडाफार कापूस विकून शेतकरी दिवाळी सण साजरा करायचे. परंतु, यावर्षी दिवाळी झाल्यानंतर कापूस निघायला सुरुवात झाली. बऱ्याच शेतकऱ्यांचा कापूस अद्यापही निघाला नाही. हल्ली कापसाला ९ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळायला लागला असून, बाजारपेठेत आवकच नाही. व्यापारीही आता गावागावांत जाऊन कापसाचा शोध घेत असून, शेतकरीही प्रतिसाद देत नसल्याने या व्यापाऱ्यांचा काटा बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कापूस वेचणीलाही वेग नाही...

आधी अतिवृष्टी, तर आता लाल्या रोगामुळे कापसाचे उत्पादन घटले आहे. अजूनही शेतकऱ्यांच्या घरी अपेक्षेप्रमाणे कापूस आलेला नाही. मागील वर्षी कापसाने जो भाव खाल्ला होता, तोच यावर्षीही मिळण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने कापसाला ब्रेक लागला असल्याचे बोलले जात आहे. कापूस निघायला उशिराने सुरुवात झाली असून, अजूनही वेचणीस गती मिळाली नाही. याचाही परिणाम बाजारपेठेतील आवकेवर झाला आहे.

अतिवृष्टीमुळे कापूस वेचणीस विलंब झाला. अन्य उत्पादनही कमी होत आहे; पण वर्तमानपत्रातील बातम्या आणि कापूस तज्ज्ञांनी भाववाढीचा वर्तविलेला अंदाज यामुळे कापूस उत्पादक भाववाढीच्या प्रतीक्षेत असावेत. यामुळेच व्यापारी लिलावात अजूनपर्यंत आले नाही. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापसाची आवक बाजारपेठ मंदावली आहे.

महेंद्र भांडारकर, प्रभारी सचिव, सिंदी कृषी उत्पन्न बाजार समिती, ता. सेलू

सोयाबीनचे पीक हातातून गेल्यामुळे आता कपाशीवर भिस्त आहे. भविष्यात कापसाचे भाव बारा ते चौदा हजारावर जातील, अशी आशा आहे. त्यामुळे गावखेड्यात कापूस खरेदी करणाऱ्यांना कापूस विकणे टाळत आहे. दिवाळीत खरी आर्थिक तंगी असते; पण आता सोयाबीन आणि कापूस दिवाळी झाल्यावर घरी आला आहे. आता शेतमाल वाढण्याची अपेक्षा आहे.

प्रवीण खोपडे, शेतकरी, घोराड

टॅग्स :cottonकापूसagricultureशेतीwardha-acवर्धाFarmerशेतकरी