शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

पांढऱ्या सोन्याची बाजारपेठ ओस; व्यापारी दारोदारी, शेतकऱ्यांकडून कापूस मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2022 14:45 IST

भाववाढीची प्रतीक्षा

विजय माहुरे

सेलू (घोराड) (वर्धा) : दसऱ्यापासून फुलणारी पांढऱ्या सोन्याची बाजारपेठ नागदिवाळी आली तरी ओसच पडलेली दिसून येत आहे. आधीच अतिवृष्टीमुळे कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांना भाववाढीची प्रतीक्षा असल्याने खेडा खरेदीलाही प्रतिसाद नाही. व्यापारी कापसाकरिता गावोगावी जात असून, त्यांनाही शेतकरीकापूस देत नसल्याने रिकाम्या हातानेच परतावे लागत असल्याचे चित्र आहे.

कृषी विभागाच्या नियोजनानुसार यावर्षीच्या खरिपात ४ लाख ३७ हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले होते. सुमारे २ लाख १५ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली होती. सुरुवातीला पावसाअभावी आणि नंतर अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कपाशीच्या उत्पादनात घट होणार असल्याने भाव वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

दरवर्षी दसऱ्यापर्यंत कापूस निघायला सुरुवात व्हायची. गावात येणाऱ्या व्यापाऱ्याला थोडाफार कापूस विकून शेतकरी दिवाळी सण साजरा करायचे. परंतु, यावर्षी दिवाळी झाल्यानंतर कापूस निघायला सुरुवात झाली. बऱ्याच शेतकऱ्यांचा कापूस अद्यापही निघाला नाही. हल्ली कापसाला ९ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळायला लागला असून, बाजारपेठेत आवकच नाही. व्यापारीही आता गावागावांत जाऊन कापसाचा शोध घेत असून, शेतकरीही प्रतिसाद देत नसल्याने या व्यापाऱ्यांचा काटा बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कापूस वेचणीलाही वेग नाही...

आधी अतिवृष्टी, तर आता लाल्या रोगामुळे कापसाचे उत्पादन घटले आहे. अजूनही शेतकऱ्यांच्या घरी अपेक्षेप्रमाणे कापूस आलेला नाही. मागील वर्षी कापसाने जो भाव खाल्ला होता, तोच यावर्षीही मिळण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने कापसाला ब्रेक लागला असल्याचे बोलले जात आहे. कापूस निघायला उशिराने सुरुवात झाली असून, अजूनही वेचणीस गती मिळाली नाही. याचाही परिणाम बाजारपेठेतील आवकेवर झाला आहे.

अतिवृष्टीमुळे कापूस वेचणीस विलंब झाला. अन्य उत्पादनही कमी होत आहे; पण वर्तमानपत्रातील बातम्या आणि कापूस तज्ज्ञांनी भाववाढीचा वर्तविलेला अंदाज यामुळे कापूस उत्पादक भाववाढीच्या प्रतीक्षेत असावेत. यामुळेच व्यापारी लिलावात अजूनपर्यंत आले नाही. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापसाची आवक बाजारपेठ मंदावली आहे.

महेंद्र भांडारकर, प्रभारी सचिव, सिंदी कृषी उत्पन्न बाजार समिती, ता. सेलू

सोयाबीनचे पीक हातातून गेल्यामुळे आता कपाशीवर भिस्त आहे. भविष्यात कापसाचे भाव बारा ते चौदा हजारावर जातील, अशी आशा आहे. त्यामुळे गावखेड्यात कापूस खरेदी करणाऱ्यांना कापूस विकणे टाळत आहे. दिवाळीत खरी आर्थिक तंगी असते; पण आता सोयाबीन आणि कापूस दिवाळी झाल्यावर घरी आला आहे. आता शेतमाल वाढण्याची अपेक्षा आहे.

प्रवीण खोपडे, शेतकरी, घोराड

टॅग्स :cottonकापूसagricultureशेतीwardha-acवर्धाFarmerशेतकरी