शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

पांढऱ्या सोन्याची बाजारपेठ ओस; व्यापारी दारोदारी, शेतकऱ्यांकडून कापूस मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2022 14:45 IST

भाववाढीची प्रतीक्षा

विजय माहुरे

सेलू (घोराड) (वर्धा) : दसऱ्यापासून फुलणारी पांढऱ्या सोन्याची बाजारपेठ नागदिवाळी आली तरी ओसच पडलेली दिसून येत आहे. आधीच अतिवृष्टीमुळे कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांना भाववाढीची प्रतीक्षा असल्याने खेडा खरेदीलाही प्रतिसाद नाही. व्यापारी कापसाकरिता गावोगावी जात असून, त्यांनाही शेतकरीकापूस देत नसल्याने रिकाम्या हातानेच परतावे लागत असल्याचे चित्र आहे.

कृषी विभागाच्या नियोजनानुसार यावर्षीच्या खरिपात ४ लाख ३७ हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले होते. सुमारे २ लाख १५ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली होती. सुरुवातीला पावसाअभावी आणि नंतर अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कपाशीच्या उत्पादनात घट होणार असल्याने भाव वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

दरवर्षी दसऱ्यापर्यंत कापूस निघायला सुरुवात व्हायची. गावात येणाऱ्या व्यापाऱ्याला थोडाफार कापूस विकून शेतकरी दिवाळी सण साजरा करायचे. परंतु, यावर्षी दिवाळी झाल्यानंतर कापूस निघायला सुरुवात झाली. बऱ्याच शेतकऱ्यांचा कापूस अद्यापही निघाला नाही. हल्ली कापसाला ९ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळायला लागला असून, बाजारपेठेत आवकच नाही. व्यापारीही आता गावागावांत जाऊन कापसाचा शोध घेत असून, शेतकरीही प्रतिसाद देत नसल्याने या व्यापाऱ्यांचा काटा बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कापूस वेचणीलाही वेग नाही...

आधी अतिवृष्टी, तर आता लाल्या रोगामुळे कापसाचे उत्पादन घटले आहे. अजूनही शेतकऱ्यांच्या घरी अपेक्षेप्रमाणे कापूस आलेला नाही. मागील वर्षी कापसाने जो भाव खाल्ला होता, तोच यावर्षीही मिळण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने कापसाला ब्रेक लागला असल्याचे बोलले जात आहे. कापूस निघायला उशिराने सुरुवात झाली असून, अजूनही वेचणीस गती मिळाली नाही. याचाही परिणाम बाजारपेठेतील आवकेवर झाला आहे.

अतिवृष्टीमुळे कापूस वेचणीस विलंब झाला. अन्य उत्पादनही कमी होत आहे; पण वर्तमानपत्रातील बातम्या आणि कापूस तज्ज्ञांनी भाववाढीचा वर्तविलेला अंदाज यामुळे कापूस उत्पादक भाववाढीच्या प्रतीक्षेत असावेत. यामुळेच व्यापारी लिलावात अजूनपर्यंत आले नाही. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापसाची आवक बाजारपेठ मंदावली आहे.

महेंद्र भांडारकर, प्रभारी सचिव, सिंदी कृषी उत्पन्न बाजार समिती, ता. सेलू

सोयाबीनचे पीक हातातून गेल्यामुळे आता कपाशीवर भिस्त आहे. भविष्यात कापसाचे भाव बारा ते चौदा हजारावर जातील, अशी आशा आहे. त्यामुळे गावखेड्यात कापूस खरेदी करणाऱ्यांना कापूस विकणे टाळत आहे. दिवाळीत खरी आर्थिक तंगी असते; पण आता सोयाबीन आणि कापूस दिवाळी झाल्यावर घरी आला आहे. आता शेतमाल वाढण्याची अपेक्षा आहे.

प्रवीण खोपडे, शेतकरी, घोराड

टॅग्स :cottonकापूसagricultureशेतीwardha-acवर्धाFarmerशेतकरी