शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

पांढऱ्या सोन्याची बाजारपेठ ओस; व्यापारी दारोदारी, शेतकऱ्यांकडून कापूस मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2022 14:45 IST

भाववाढीची प्रतीक्षा

विजय माहुरे

सेलू (घोराड) (वर्धा) : दसऱ्यापासून फुलणारी पांढऱ्या सोन्याची बाजारपेठ नागदिवाळी आली तरी ओसच पडलेली दिसून येत आहे. आधीच अतिवृष्टीमुळे कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांना भाववाढीची प्रतीक्षा असल्याने खेडा खरेदीलाही प्रतिसाद नाही. व्यापारी कापसाकरिता गावोगावी जात असून, त्यांनाही शेतकरीकापूस देत नसल्याने रिकाम्या हातानेच परतावे लागत असल्याचे चित्र आहे.

कृषी विभागाच्या नियोजनानुसार यावर्षीच्या खरिपात ४ लाख ३७ हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले होते. सुमारे २ लाख १५ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली होती. सुरुवातीला पावसाअभावी आणि नंतर अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कपाशीच्या उत्पादनात घट होणार असल्याने भाव वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

दरवर्षी दसऱ्यापर्यंत कापूस निघायला सुरुवात व्हायची. गावात येणाऱ्या व्यापाऱ्याला थोडाफार कापूस विकून शेतकरी दिवाळी सण साजरा करायचे. परंतु, यावर्षी दिवाळी झाल्यानंतर कापूस निघायला सुरुवात झाली. बऱ्याच शेतकऱ्यांचा कापूस अद्यापही निघाला नाही. हल्ली कापसाला ९ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळायला लागला असून, बाजारपेठेत आवकच नाही. व्यापारीही आता गावागावांत जाऊन कापसाचा शोध घेत असून, शेतकरीही प्रतिसाद देत नसल्याने या व्यापाऱ्यांचा काटा बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कापूस वेचणीलाही वेग नाही...

आधी अतिवृष्टी, तर आता लाल्या रोगामुळे कापसाचे उत्पादन घटले आहे. अजूनही शेतकऱ्यांच्या घरी अपेक्षेप्रमाणे कापूस आलेला नाही. मागील वर्षी कापसाने जो भाव खाल्ला होता, तोच यावर्षीही मिळण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने कापसाला ब्रेक लागला असल्याचे बोलले जात आहे. कापूस निघायला उशिराने सुरुवात झाली असून, अजूनही वेचणीस गती मिळाली नाही. याचाही परिणाम बाजारपेठेतील आवकेवर झाला आहे.

अतिवृष्टीमुळे कापूस वेचणीस विलंब झाला. अन्य उत्पादनही कमी होत आहे; पण वर्तमानपत्रातील बातम्या आणि कापूस तज्ज्ञांनी भाववाढीचा वर्तविलेला अंदाज यामुळे कापूस उत्पादक भाववाढीच्या प्रतीक्षेत असावेत. यामुळेच व्यापारी लिलावात अजूनपर्यंत आले नाही. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापसाची आवक बाजारपेठ मंदावली आहे.

महेंद्र भांडारकर, प्रभारी सचिव, सिंदी कृषी उत्पन्न बाजार समिती, ता. सेलू

सोयाबीनचे पीक हातातून गेल्यामुळे आता कपाशीवर भिस्त आहे. भविष्यात कापसाचे भाव बारा ते चौदा हजारावर जातील, अशी आशा आहे. त्यामुळे गावखेड्यात कापूस खरेदी करणाऱ्यांना कापूस विकणे टाळत आहे. दिवाळीत खरी आर्थिक तंगी असते; पण आता सोयाबीन आणि कापूस दिवाळी झाल्यावर घरी आला आहे. आता शेतमाल वाढण्याची अपेक्षा आहे.

प्रवीण खोपडे, शेतकरी, घोराड

टॅग्स :cottonकापूसagricultureशेतीwardha-acवर्धाFarmerशेतकरी