शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

वर्ध्यात देशात सर्वांधिक पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 23:40 IST

शुक्रवारी हवामान खात्याच्या अंदाजानुसार वर्धेत बऱ्याच दांडीनंतर वरूण राजा बरसला. देशात सर्वाधिक पाऊस वर्धा जिल्ह्यात झाल्याची नोंद स्कायमेट व्हेदर यांनी घेतली आहे. त्यांनी ११७ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद घेतली. देशातील १० पावसाच्या ठिकाणावर ही माहिती गोळा करण्यात आली.

ठळक मुद्देएकाच दिवशी ६९४ मि.मी. पाऊस : सर्व तालुक्यात बरसला वरूणराजा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शुक्रवारी हवामान खात्याच्या अंदाजानुसार वर्धेत बऱ्याच दांडीनंतर वरूण राजा बरसला. देशात सर्वाधिक पाऊस वर्धा जिल्ह्यात झाल्याची नोंद स्कायमेट व्हेदर यांनी घेतली आहे. त्यांनी ११७ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद घेतली. देशातील १० पावसाच्या ठिकाणावर ही माहिती गोळा करण्यात आली. वर्धेत २२ सप्टेंबर सरासरी ६९७.९४ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली.२२ सप्टेंबर रोजी सेलू तालुक्यात सेलू येथे ९८ मि.मी., सिंदी (रेल्वे) ८७ मि.मी. , हिंंगणी ७२ मि.मी., झडशी ८१ मि.मी., केळझर ८६ मि.मी. असा एकूण ४२४ मि.मी. पाऊस ८४.०८ मि.मी. सरासरीने पडला. आष्टी तालुक्यात आष्टी येथे ४१.२ मि.मी., साहूर येथे ५४ मि.मी., तळेगाव ५०.२ मि.मी. पाऊस झाला. ४८.४६ च्या सरासरीने १४५.४ मि.मी. पाऊस झाला. आर्वी येथे ५१ मि.मी., वाटोडा येथे ५६ मि.मी., वाढोणा येथे ८ मि.मी., विरूळ येथे ७४ मि.मी., रोहणा येथे ६१मि.मी., खरांगणा येथे ४७.४ मि.मी. पाऊस ४९.५६ च्या सरासरीने झाला. या तालुक्यात २९७.४ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. समुद्रपूर येथे ९१ मि.मी., जाम येथे ५५ मि.मी., गिरड येथे ५५ मि.मी., नंदोरी येथे १०० मि.मी., कोरा येथे ५५ मि.मी., वायगाव (गों.) येथे ५९.२ मि.मी., कांढळी येथे १०० मि.मी., मांडगाव येथे ८८ मि.मी. पाऊस झाला. समुद्रपूर तालुक्यात ७५.४ मि.मी. च्या सरासरीने ६०३.२ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. हिंगणघाट तालुक्यात २२६. २४ मि.मी. पाऊस झाला आहे. हिंगणघाट येथे २३९.५ मि.मी., सावली (वाघ) २५२ मि.मी., वडनेर येथे १९७. ४ मि.मी., पोहणा येथे १९० मि.मी., सिरसगाव येथे २२० मि.मी., अल्लीपूर येथे २४० मि.मी., कानगाव येथे २४६ मि.मी., वाघोली २२५ मि.मी. पाऊस झाला. देवळी तालुक्यात देवळी येथे १४४.२ मि.मी., भिडी येथे १३० मि.मी., अंदोरी येथे ५५ मि.मी., गिरोली २०० मि.मी., पुलगाव येथे १६६ मि.मी., विजयगोपाल येथे ४० मि.मी. पाऊस झाला. देवळी तालुक्यात सरासरी १२२.५३ मि.मी. पावसाची नोंद घेण्यात आली. संपूर्ण वर्धा जिल्ह्यात ९९.३० मि.मी. सरासरीने ७८४.३६ मि.मी. पाऊस झाला. २२ सप्टेंबर या एकाच दिवशी वर्धा तालुक्यात १२१.८५ मिमी., सेलू येथे ७७७.५८, देवळी येथे ७०८.७६, हिंगणघाट येथे ९५५.३० मि.मी., समुद्रपूर येथे ६८७.२८ मि.मी., आर्वी येथे ६२२.१८, आष्टी येथे ५४४.०५ मि.मी., कारंजा येथे ५९१.६२ मि.मी. पाऊस झाला. जिल्ह्यात ५५८३.५१ मि.मी. पाऊस, ६९७.९४ च्या सरासरीने झालेला आहे. या पावसानंतर सोयाबीन पिकाला काही दिलासा मिळाला असला तरी जिल्ह्यावर दृष्काळाचे सावट आहे.

टॅग्स :Rainपाऊस