शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

सोयाबीन व कपाशीला परतीच्या पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 00:08 IST

शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न घटणार : पाणबसन शेती राहिली पडीत, शासकीय यंत्रणा अद्यापही साखर झोपेतच लोकमत न्यूज नेटवर्क पवनार : ...

ठळक मुद्देशेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न घटणार : पाणबसन शेती राहिली पडीत, शासकीय यंत्रणा अद्यापही साखर झोपेतच

शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न घटणार : पाणबसन शेती राहिली पडीत, शासकीय यंत्रणा अद्यापही साखर झोपेतचलोकमत न्यूज नेटवर्कपवनार : परतीच्या पावसाने जोर धरला नसला तरीही जेवढा बरसला तेवढ्यानेच सोयाबीन व उमललेल्या कापसाचे मोठे नुकसान झाले. आहे. कोरडवाहू शेतकºयाला काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी त्याची भिस्त आता कपाशी व तूर या पिकावर आहे. मात्र, याचा परिणाम शेतकऱ्यांच्या वार्षिक उत्पन्नावर होणार असून कर्जाचा डोंगर पुन्हा उभा ठाकणार आहे.कपाशीची फळ धरण्याची कालमर्यादा आता संपत आली आहे. परंतु अद्यापही कपाशीला बोंडच आलेले नाही. शिवाय पाने पिवळी पडून लाल्या यायला सुरूवात झाली आहे. त्यामुळे कपाशीवर लाल्या रोगाचे आक्रमण होऊ लागल्याने हळूहळू पाने लाल पडून गळायला लागली. त्यामुळे बोंडे सुद्धा परिपक्व होत नाही. परिणामी उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता बळावली आहे. खरीप हंगामात पावसाला उशीरा सुरूवात झाल्यामुळे शेतकºयांची दिवाळी अंधारातच गेली. काहीचे सोयाबीन विकण्यासाठी नेले असता ओलाव्याचे कारण सांगून त्यांना कवडीमोल भाव देण्यात आला. गतवर्षी वर्धा तालुक्यात शासनाची खरेदी केंद्रे उघडलीच नाही. यावर्षी सुद्धा काही हालचाली दिसत नाही. शेतकºयांवर येणारी संकटे पाहून कृषी विभाग सुद्धा हतबल झाला आहे. सुरूवातीला तोंड वर काढणाºया बोंडअळीवर नियंत्रण असले तरी अद्याप धोका टळलेला नाही. शितदही करून कापूस वेचणीला सुरूवात होणार एवढ्यातच आलेल्या पावसाने कापूस ओला झाला. आता तो वाळेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार.पीक विम्याचा लाभ नाही.पीक विम्याचे निकष मोठे क्लिष्ट असून भूस्सखलन,नाल्याच्या, नदीच्या पाण्यामुळे पीक खरवडून जाणे, वीज पडून नुकसान होणे किंवा महसूल मंडळात सलग ६५ मि.मी. च्या वर पाऊस पडल्यावरच शेतकरी भरपाईस पात्र ठरतो. किंवा पीक कापणीनंतर सलग १४ दिवस पाऊस पडल्यास नुकसानीस पात्र ठरविल्या जाते. यावरुन निकष तयार करणारे कुठला विचार करून निकष ठरवितात हे आता समजण्यापलीकडे आहे.पाणबसन क्षेत्र पूर्णत: नष्टपाणी धरून ठेवणाºया जमिनीतील कपाशीची वाढ तर झालीच नाही. शिवाय सोयाबीन सुद्धा जागेवरच जिरले. अशा जमिनीतील खरीपाचे पीक काढून कोरडवाहू चना घेण्याच्या तयारीला शेतकरी लागला आहे. अनुदानावर मिळणाºया महाबीजच्या सोयाबीनची माहिती शेतकºयांपर्यंत पोहोचलीच नाही. काही विक्रेत्यांकडे हे सोयाबीन अनुदानावर विक्रीला ठेवले जाते. तेही विशिष्ट लोकांनाच मिळते सर्व साधारण शेतकरी मात्र अनभिज्ञ असतो. त्याची कुठेतरी चौकशी व्हायला पाहिजे. कारण अनुदानावर मिळणारे बियाणे हे सर्वांसाठी खुले असायला पाहिजे. महाबिजच्यावतीने देण्यात येणाºया बियाण्यांवर कृषी विभागाचा कुठलाही अंकुश नसल्याचे दिसून येत आहे. कृषी विभागही अनुदानावर बियाणे उपलब्ध करतो. परंतु नेहमीप्रमाणेच हंगाम संपत आल्यावर वरातीमागून घोडे अशी परिस्थिती कृषी विभागाची झाली आहे.

टॅग्स :agricultureशेती