शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
2
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
3
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
4
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
5
शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
6
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
7
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
8
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
9
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
10
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
11
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
12
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
13
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
14
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
15
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
16
झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन नजरकैदेत, नेमके प्रकरण काय? 
17
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
18
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
19
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
20
दिल्ली पोलिसांचे वॉरंट्स आता व्हॉट्सॲपद्वारे, पोलिस ठाण्यातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष 

सोयाबीन व कपाशीला परतीच्या पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 00:08 IST

शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न घटणार : पाणबसन शेती राहिली पडीत, शासकीय यंत्रणा अद्यापही साखर झोपेतच लोकमत न्यूज नेटवर्क पवनार : ...

ठळक मुद्देशेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न घटणार : पाणबसन शेती राहिली पडीत, शासकीय यंत्रणा अद्यापही साखर झोपेतच

शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न घटणार : पाणबसन शेती राहिली पडीत, शासकीय यंत्रणा अद्यापही साखर झोपेतचलोकमत न्यूज नेटवर्कपवनार : परतीच्या पावसाने जोर धरला नसला तरीही जेवढा बरसला तेवढ्यानेच सोयाबीन व उमललेल्या कापसाचे मोठे नुकसान झाले. आहे. कोरडवाहू शेतकºयाला काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी त्याची भिस्त आता कपाशी व तूर या पिकावर आहे. मात्र, याचा परिणाम शेतकऱ्यांच्या वार्षिक उत्पन्नावर होणार असून कर्जाचा डोंगर पुन्हा उभा ठाकणार आहे.कपाशीची फळ धरण्याची कालमर्यादा आता संपत आली आहे. परंतु अद्यापही कपाशीला बोंडच आलेले नाही. शिवाय पाने पिवळी पडून लाल्या यायला सुरूवात झाली आहे. त्यामुळे कपाशीवर लाल्या रोगाचे आक्रमण होऊ लागल्याने हळूहळू पाने लाल पडून गळायला लागली. त्यामुळे बोंडे सुद्धा परिपक्व होत नाही. परिणामी उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता बळावली आहे. खरीप हंगामात पावसाला उशीरा सुरूवात झाल्यामुळे शेतकºयांची दिवाळी अंधारातच गेली. काहीचे सोयाबीन विकण्यासाठी नेले असता ओलाव्याचे कारण सांगून त्यांना कवडीमोल भाव देण्यात आला. गतवर्षी वर्धा तालुक्यात शासनाची खरेदी केंद्रे उघडलीच नाही. यावर्षी सुद्धा काही हालचाली दिसत नाही. शेतकºयांवर येणारी संकटे पाहून कृषी विभाग सुद्धा हतबल झाला आहे. सुरूवातीला तोंड वर काढणाºया बोंडअळीवर नियंत्रण असले तरी अद्याप धोका टळलेला नाही. शितदही करून कापूस वेचणीला सुरूवात होणार एवढ्यातच आलेल्या पावसाने कापूस ओला झाला. आता तो वाळेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार.पीक विम्याचा लाभ नाही.पीक विम्याचे निकष मोठे क्लिष्ट असून भूस्सखलन,नाल्याच्या, नदीच्या पाण्यामुळे पीक खरवडून जाणे, वीज पडून नुकसान होणे किंवा महसूल मंडळात सलग ६५ मि.मी. च्या वर पाऊस पडल्यावरच शेतकरी भरपाईस पात्र ठरतो. किंवा पीक कापणीनंतर सलग १४ दिवस पाऊस पडल्यास नुकसानीस पात्र ठरविल्या जाते. यावरुन निकष तयार करणारे कुठला विचार करून निकष ठरवितात हे आता समजण्यापलीकडे आहे.पाणबसन क्षेत्र पूर्णत: नष्टपाणी धरून ठेवणाºया जमिनीतील कपाशीची वाढ तर झालीच नाही. शिवाय सोयाबीन सुद्धा जागेवरच जिरले. अशा जमिनीतील खरीपाचे पीक काढून कोरडवाहू चना घेण्याच्या तयारीला शेतकरी लागला आहे. अनुदानावर मिळणाºया महाबीजच्या सोयाबीनची माहिती शेतकºयांपर्यंत पोहोचलीच नाही. काही विक्रेत्यांकडे हे सोयाबीन अनुदानावर विक्रीला ठेवले जाते. तेही विशिष्ट लोकांनाच मिळते सर्व साधारण शेतकरी मात्र अनभिज्ञ असतो. त्याची कुठेतरी चौकशी व्हायला पाहिजे. कारण अनुदानावर मिळणारे बियाणे हे सर्वांसाठी खुले असायला पाहिजे. महाबिजच्यावतीने देण्यात येणाºया बियाण्यांवर कृषी विभागाचा कुठलाही अंकुश नसल्याचे दिसून येत आहे. कृषी विभागही अनुदानावर बियाणे उपलब्ध करतो. परंतु नेहमीप्रमाणेच हंगाम संपत आल्यावर वरातीमागून घोडे अशी परिस्थिती कृषी विभागाची झाली आहे.

टॅग्स :agricultureशेती