शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
3
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
4
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
5
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
6
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
7
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
8
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
9
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
10
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
11
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
12
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
13
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
14
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
15
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
16
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
17
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
18
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
19
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

वर्ध्यातले पर्जन्यमान केंद्र दहा वर्षांपासून आजारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 14:26 IST

शासनाने तालुकास्थळी पावसाळ्यातील पाण्याची सरासरी मोजण्यासाठी पर्जन्यमान केंद्र निर्माण केले; पण याची देखभाल, दुरूस्ती करणारी यंत्रणाच नाही. यामुळे दहा वर्षापासून हे केंद्र आजारी अवस्थेत आहे.

ठळक मुद्देपावसाळ्यात पर्जन्यमानाचे मोजमाप नाही एक खराब झाल्यावर दुसरेही बसविले

अमोल सोटे।आॅनलाईन लोकमतवर्धा : शासनाने तालुकास्थळी पावसाळ्यातील पाण्याची सरासरी मोजण्यासाठी पर्जन्यमान केंद्र निर्माण केले; पण याची देखभाल, दुरूस्ती करणारी यंत्रणाच नाही. यामुळे दहा वर्षापासून हे केंद्र आजारी अवस्थेत आहे. परिणामी, शेतकरी तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत. यासाठी त्वरित यंत्रणा उभी करून पर्जन्यमान केंद्र सुरू करावे, अशी मागणी होत आहे.दहा वर्षांपूर्वी तहसील कार्यालयाच्या दर्शनी भागात पर्जन्यमान केंद्र निर्माण करण्यात आले होते. यासाठी पर्यायी अधिकारीही देण्यात आले होते. दोन वर्षे येथे अचूक आकडेवारी मिळत होती. यानंतर मात्र यातील यंत्र कुलूपबंदच असल्याचे दिसून येते. वर्षानुवर्षे देखभाल व दुरूस्ती करण्यात आली नसल्याने सदर केंद्र बंद पडले आहे. केंद्राच्या सभोवताल तयार केलेल्या कुंपणाला लोखंडी गेट लावले होते. त्याला असलेले बंद कुलूप पूर्णपणे जंगलेले आहे; पण त्याची दुरूस्ती व पाहणी कोणत्याही अधिकाऱ्याने आजपर्यंत केली नाही. शासनाच्या दुर्लक्षित धोरणाचा फटका येथे बसत आहे.यानंतर दुसरे पर्जन्यमान केंद्र त्याच्या शेजारीच उभारण्यात आले. त्याच्यासमोर असलेल्या फलकावर महावेध प्रकल्पांतर्गत स्वयंचलित हवामान केंद्र महाराष्ट्र शासन आणि स्कायमेट वेदर सर्व्हीसेस प्रा.लि. यांचा सार्वजनिक खासगी भागीदारी प्रकल्प, अशा पद्धतीचा मजकूर लिहिलेला आहे. याही गेटच्या कुलूपाला दोन वर्षांपासून जंग चढला आहे. यामुळे शासनाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. शेतकºयांना वेधशाळेची अचुक माहिती मिळाल्यास पाऊस कधी येणार, किती होणार या सर्व बाबींवर पीक परिस्थिती अवलंबून असते. यामुळे लाखो रुपये खर्च करून त्याचे फलित मिळणार नसेल तर उपयोग काय, हा प्रश्नच आहे. शासनाने हवामान व पर्जन्यमान केंद्राचे धोरण स्पष्ट केले. दोन्ही केंद्र एकाच ठिकाणी असल्याने तालुकानिहाय पावसाची आकडेवारी तंतोतंत मिळण्यास मोलाची मदत होते.दुसऱ्या केंद्राचेही दोन वर्षांपासून कुलूप बंदचतहसील कार्यालय परिसरात दहा वर्षांपूर्वी लावण्यात आलेले पर्जन्यमापक केंद्र बंद आहे. यामुळे त्यातील यंत्रही खराब झाले. परिणामी, दोन वर्षांपूर्वी दुसरी यंत्रणा उभारण्यात आली; पण दोन वर्षांपासून त्या यंत्रणेचेही कुलूप उघडण्यात आलेले नाही. यामुळे गेटवरील कुलूप गंजले असून पावसाचे मोजमापच घेतले जात असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांनाही अचुक पावसाचा अंदाज कळत नाही. परिणामी, पिकांचे नियोजन करता येत नाही. ही यंत्रणा सुधारण्यासाठी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.पाहणीही नाहीदहा वर्षांपासून बंद असलेल्या पर्जन्यमान केंद्राची साधी पाहणी करण्याचे सौजन्यही अधिकाऱ्यांनी दाखविले नाही. यामुळे खर्च व्यर्थ गेल्याचेच दिसून येत आहे.