शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

‘सोयाबीन’साठी पाऊस ठरतोय ‘खलनायक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 00:16 IST

यंदाच्या वर्षी सुरूवातील पावसाने दडी मारली. तर नंतर दोन महीने थांबून थांबून मुसळधार पाऊस पडला. तशी नोंदही महसूल विभागाने घेतली आहे. सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांना निंदण व खत देण्याच्या कामासह औषधी फवारणीचे काम करता आले नाही. शिवाय परिसरातील अनेक शेत शिवारांना तळ्याचे स्वरूप आले होते.

ठळक मुद्देपरतीच्या पावसाने लावली हजेरी : शेतकऱ्यांच्या अडचणीत भर

विनोद घोडे।लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : शेतकऱ्यांचे दिवाळी बोनस म्हणून ओळख असणाऱ्या सोयाबीन पिकांसाठी सध्या परतीचा पाऊस खलनायक ठरत असल्याचे चित्र चिकणी परिसरात बघावयास मिळत आहे. विशेष म्हणजे, रविवारी सकाळी या भागात परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.यंदाच्या वर्षी सुरूवातील पावसाने दडी मारली. तर नंतर दोन महीने थांबून थांबून मुसळधार पाऊस पडला. तशी नोंदही महसूल विभागाने घेतली आहे. सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांना निंदण व खत देण्याच्या कामासह औषधी फवारणीचे काम करता आले नाही. शिवाय परिसरातील अनेक शेत शिवारांना तळ्याचे स्वरूप आले होते. सततच्या पावसाचा फटकाच उभ्या सोयाबीन पिकावर दिसून आला. तर अजूनही काही शेतांमधील शेतजमिनीत मोठ्या प्रमाणात ओलावा आहे. या भागातील सोयाबीन उत्पादकांनी जीवाचे रान करून पिकाची निगा घेतल्याने पीक बहरले.सध्या १५ ते २० दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांनीही सोयाबीनची कापणी केली. तर काहींनी सोयाबीनची कापणी करून यंत्राच्या सहाय्याने सोयाबीनची मळणी केली. काही शेतकऱ्यांना एकरी ७ ते ८ तर काहींना ४ ते ५ पोती सोयाबीनचा उतारा आल्याचे शेतकरी सांगतात. असे असले तरी अजूनही अनेकांच्या शेतात कापलेले सोयाबीन पडून आले. अशातच रविवारी सकाळी परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.यंदा पाऊस सोयाबीन पिकासाठी खलनायक ठरत असल्याचे शेतकरी बोलत आहेत. शिवाय सोयाबीनच्या उत्पन्नातही बºयापैकी घट येत असल्याचे या भागातील शेतकरी सांगतात.सोयाबीन शेतातून थेट मार्केटमध्येज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकांची कापणी करीत मळणी केली, त्यापैकी बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या पदरी आलेले सोयाबीनचे उत्पादन थेट बाजारपेठेत विक्रीकरिता नेले. सध्या सोयाबीनला ३ हजार ते ३ हजार ३०० पर्यंत भाव मिळत आहे. दिवाळी सण तोंडावर असल्याने अनेक शेतकरी सोयाबीनची साठवण न करता थेट विक्रीवरच भर देत असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती