शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

अफवेच्या बाजारात ग्राहकांची लुटमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 23:56 IST

पावसाअभावी जलाशयांनी तळ गाठल्याने भविष्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. याच भीतीने नागरिकांनी बोअरवेलकडे धाव घेतली; अशातच ३१ डिसेंबरनंतर बोअरवेल करण्यावर बंदी येणार असल्याची वावडी उठविण्यात आली.

ठळक मुद्देम्हणे, ३१ डिसेंबरनंतर बोअरवेल बंदी : भीतीपोटी बोअरवेल करण्यासाठी नागरिकांची धावपळ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पावसाअभावी जलाशयांनी तळ गाठल्याने भविष्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. याच भीतीने नागरिकांनी बोअरवेलकडे धाव घेतली; अशातच ३१ डिसेंबरनंतर बोअरवेल करण्यावर बंदी येणार असल्याची वावडी उठविण्यात आली. त्यामुळे नागरिकांनी वाढीव दर चुकवत बोअरवेल करण्यासाठी लगबग सुरु केली आहे. सध्या या अफवेमुळे ग्राहकांची चांगलीच लूट सुरुअसून ही अफवा कुणी पसरविली व का? हा संशोधनाचा विषय ठरत आहे.जिल्ह्यातील पाणीबाणी तीव्र होतांना दिसून येत असल्याचा फायदा आता काही मंडळी घेताना दिसून येत आहे. सध्या जलाशयात केवळ २७ टक्केच जलसाठा उपलब्ध असल्याने शहरासह ग्रामीण भागातही तीन ते चार दिवसाआड पाणी पुरवठा केल्या जात आहे. डिसेंबर महिन्यातच ही अवस्था असताना भविष्यात नागरिकांना आठ ते पंधरा दिवसानंतर पाणी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच नागरिकांनी बोअरवेल करण्याचा पर्याय निवडला आहे. बोअरवेलला मागणी वाढत असताना पाहून ३१ डिसेंबरनंतर बोअरवेल करण्यावर बंदी येणार असल्याची अफवा पसरविण्यात आली. त्यामुळे नागरिकांनी हातचे काम सोडून मशीन मिळविण्यासाठी बोअरवेल व्यावसायीक व एजंटकडे धाव घेतली आहे.सध्या तर बोअरवेलचे भावही वीस ते तीस रुपयाने वाढविण्यात आले आहे. नागरिकांची गरज लक्षात घेत अफवेचा दाखला देऊन आणखी जास्त पैसे कसे उकळता येईल, याचाच प्रयत्न काहींकडून सुरु आहे. परंतु संबधित विभागाकडे बोअरवेल करण्याच्या बंदीबाबत विचारणा केली असता कोणताही आदेश नसल्याचे सांगण्यात आल्याने ही केवळ अफवाच असल्याने उघडकीस आले आहे.एकीकडे दुष्काळाच्या झळा सोसत असताना त्यांना मानुसकीच्या नात्याने सहकार्य करण्याऐवजी दुष्काळी परिस्थितीचा फायदा उचलून आपले खिसे भरण्याचा लाजिरवाणा प्रकार काहींनी चालविल्याने दिसून येत आहे. याचा फटका सर्व सामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन ही लुटमार थांबवित यावी अशी मागणी आता सर्वत्र जोर धरतांना दिसून येत आहे.बोअरवेल व्यावसायिकांकडून शेतकऱ्यांची लूटशहरात सध्या बोअरवेल दर वाढले आहे. कमी दरात दुसरा बोरवेल व्यावसायिक बोरवेल करायला तयार असल्यास वर्ध्यातील बोअरवेल व्यवसायिक असोसिएशन त्याला वर्ध्यात काम करु देत नाही.अशा प्रकारे शहरातील नागरिक व शेतकऱ्यांची बोअरवेल व्यावसायिकांनी लुट चालविली आहे. असा आरोप किसान सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष राजू हिंगमोरे यांनी केला आहे. डिझलचे भाव कायम असतानाही बोअरवेलचे दर वाढविण्यात आल्याने यावर लक्ष देऊन कार्यवाही करण्याची मागणीही जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.३१ डिसेंबरनंतर बोअरवेल करण्यावर बंदी येणार असल्याबाबत कुठलाही आदेश किंवा पत्र आमच्या कार्यालयाला प्राप्त झाले नाही. तसे असते तर कार्यालयाकडून संबंधितांना आधीच सूचना दिल्या असत्या, असे भूजल सर्वेक्षण अधिकारी भुसारी यांनी सांगितले.वर्ध्यात आठ व्यवसायिक आहेत. एका दिवशी दोन बोरवेल केले जात आहे. सध्या डिझलचे भाव वाढल्याने आणि कामागांची मजूरी वाढल्याने बोरवेलचे दर वाढवावे लागले, असे बोअरवेल असोसिएशनचे अध्यक्ष अनिल जावंधिया यांनी सांगितले.बोरवेलनंतर आता जलपुनर्भरणाची गरजजगण्यासाठी पाण्याची आवश्यकता असून गरजेनुसार सर्वच नागरिक भूगर्भ पोखरायला लागले आहे. पाचशे मीटरच्या परिसरात दुसरे बोअरवेल करता येणार नाही, असे नियम असतानाही याला छेद दिला जात आहे. तसेच दीडशेपेक्षाही जास्त फुट खोलपर्यंत बोअरवेल केली जात आहे. यामुळे भविष्यात भूगर्भातील पाणीही नाहिसे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी ही धोक्याची घंटा लक्षात घेऊन प्रत्येकाने घरी व कार्यालयात जलपुनर्भरण करण्याची गरज व्यक्त होत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई