शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

अफवेच्या बाजारात ग्राहकांची लुटमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 23:56 IST

पावसाअभावी जलाशयांनी तळ गाठल्याने भविष्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. याच भीतीने नागरिकांनी बोअरवेलकडे धाव घेतली; अशातच ३१ डिसेंबरनंतर बोअरवेल करण्यावर बंदी येणार असल्याची वावडी उठविण्यात आली.

ठळक मुद्देम्हणे, ३१ डिसेंबरनंतर बोअरवेल बंदी : भीतीपोटी बोअरवेल करण्यासाठी नागरिकांची धावपळ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पावसाअभावी जलाशयांनी तळ गाठल्याने भविष्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. याच भीतीने नागरिकांनी बोअरवेलकडे धाव घेतली; अशातच ३१ डिसेंबरनंतर बोअरवेल करण्यावर बंदी येणार असल्याची वावडी उठविण्यात आली. त्यामुळे नागरिकांनी वाढीव दर चुकवत बोअरवेल करण्यासाठी लगबग सुरु केली आहे. सध्या या अफवेमुळे ग्राहकांची चांगलीच लूट सुरुअसून ही अफवा कुणी पसरविली व का? हा संशोधनाचा विषय ठरत आहे.जिल्ह्यातील पाणीबाणी तीव्र होतांना दिसून येत असल्याचा फायदा आता काही मंडळी घेताना दिसून येत आहे. सध्या जलाशयात केवळ २७ टक्केच जलसाठा उपलब्ध असल्याने शहरासह ग्रामीण भागातही तीन ते चार दिवसाआड पाणी पुरवठा केल्या जात आहे. डिसेंबर महिन्यातच ही अवस्था असताना भविष्यात नागरिकांना आठ ते पंधरा दिवसानंतर पाणी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच नागरिकांनी बोअरवेल करण्याचा पर्याय निवडला आहे. बोअरवेलला मागणी वाढत असताना पाहून ३१ डिसेंबरनंतर बोअरवेल करण्यावर बंदी येणार असल्याची अफवा पसरविण्यात आली. त्यामुळे नागरिकांनी हातचे काम सोडून मशीन मिळविण्यासाठी बोअरवेल व्यावसायीक व एजंटकडे धाव घेतली आहे.सध्या तर बोअरवेलचे भावही वीस ते तीस रुपयाने वाढविण्यात आले आहे. नागरिकांची गरज लक्षात घेत अफवेचा दाखला देऊन आणखी जास्त पैसे कसे उकळता येईल, याचाच प्रयत्न काहींकडून सुरु आहे. परंतु संबधित विभागाकडे बोअरवेल करण्याच्या बंदीबाबत विचारणा केली असता कोणताही आदेश नसल्याचे सांगण्यात आल्याने ही केवळ अफवाच असल्याने उघडकीस आले आहे.एकीकडे दुष्काळाच्या झळा सोसत असताना त्यांना मानुसकीच्या नात्याने सहकार्य करण्याऐवजी दुष्काळी परिस्थितीचा फायदा उचलून आपले खिसे भरण्याचा लाजिरवाणा प्रकार काहींनी चालविल्याने दिसून येत आहे. याचा फटका सर्व सामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन ही लुटमार थांबवित यावी अशी मागणी आता सर्वत्र जोर धरतांना दिसून येत आहे.बोअरवेल व्यावसायिकांकडून शेतकऱ्यांची लूटशहरात सध्या बोअरवेल दर वाढले आहे. कमी दरात दुसरा बोरवेल व्यावसायिक बोरवेल करायला तयार असल्यास वर्ध्यातील बोअरवेल व्यवसायिक असोसिएशन त्याला वर्ध्यात काम करु देत नाही.अशा प्रकारे शहरातील नागरिक व शेतकऱ्यांची बोअरवेल व्यावसायिकांनी लुट चालविली आहे. असा आरोप किसान सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष राजू हिंगमोरे यांनी केला आहे. डिझलचे भाव कायम असतानाही बोअरवेलचे दर वाढविण्यात आल्याने यावर लक्ष देऊन कार्यवाही करण्याची मागणीही जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.३१ डिसेंबरनंतर बोअरवेल करण्यावर बंदी येणार असल्याबाबत कुठलाही आदेश किंवा पत्र आमच्या कार्यालयाला प्राप्त झाले नाही. तसे असते तर कार्यालयाकडून संबंधितांना आधीच सूचना दिल्या असत्या, असे भूजल सर्वेक्षण अधिकारी भुसारी यांनी सांगितले.वर्ध्यात आठ व्यवसायिक आहेत. एका दिवशी दोन बोरवेल केले जात आहे. सध्या डिझलचे भाव वाढल्याने आणि कामागांची मजूरी वाढल्याने बोरवेलचे दर वाढवावे लागले, असे बोअरवेल असोसिएशनचे अध्यक्ष अनिल जावंधिया यांनी सांगितले.बोरवेलनंतर आता जलपुनर्भरणाची गरजजगण्यासाठी पाण्याची आवश्यकता असून गरजेनुसार सर्वच नागरिक भूगर्भ पोखरायला लागले आहे. पाचशे मीटरच्या परिसरात दुसरे बोअरवेल करता येणार नाही, असे नियम असतानाही याला छेद दिला जात आहे. तसेच दीडशेपेक्षाही जास्त फुट खोलपर्यंत बोअरवेल केली जात आहे. यामुळे भविष्यात भूगर्भातील पाणीही नाहिसे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी ही धोक्याची घंटा लक्षात घेऊन प्रत्येकाने घरी व कार्यालयात जलपुनर्भरण करण्याची गरज व्यक्त होत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई