शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

गुंजखेडा वाळू घाटावर धाड, पाच तराफे केलेत नष्ट, जिल्हास्तरीय आकस्मिक पथकाची कारवाई

By आनंद इंगोले | Updated: March 2, 2023 17:29 IST

देवळी तालुक्यातील गुंजखेडा वाळू घाटावर राजरोसपणे तराफ्यांच्या माध्यमातून वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळताच जिल्हास्तरीय आकस्मिक

वर्धा :

देवळी तालुक्यातील गुंजखेडा वाळू घाटावर राजरोसपणे तराफ्यांच्या माध्यमातून वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळताच जिल्हास्तरीय आकस्मिक तपासणी पथकाने धाड टाकली. यावेळी पाच तराफांच्या साहाय्याने अवैधरीत्या वाळू उपसा होत असल्याचे निदर्शनास आले. सर्व तराफे जप्त करुन ते नष्ट करण्यात आले. ही कारवाई बुधवारी दुपारपासून गुरुवारी सकाळपर्यंत चालली.

वर्धा नदीपात्रावरील गुंजखेडा येथील वाळू घाटावर मोठ्या प्रमाणात वाळू उपासा चालतो. यापूर्वीही अनेकदा येथे कारवाई झाल्यानंतरही वाळू चोरट्यांचे ह्य पुन्हा येरे माझ्या मागल्या ह्ण असेच सुरु आहे. याची माहिती मिळताच जिल्हा स्तरीय आकस्मिक धाड तपासणी पथकातील जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. अतुल दोड यांनी आपल्या चमूसह बुधवारी दुपारी साडेचार वाजता गुजखेडा वाळू घाट गाठला. यावेळी घाटामध्ये आठ मजुर पाण्यातील वाळू अवैधरीत्या तराफ्याच्या साहाय्याने बाहेर काढत असल्याचे निदर्शनास आले. आणखी घाटामध्ये पाहणी केली असता पाचवा ही तराफा दिसून आला. हे पाचही तराफे जप्त करुन ते नष्ट करण्याचे काम दुसऱ्या दिवशीपर्यंत सुरुच होते. एका तराफ्याची किंमत ४० हजार रुपये असून एकूण २ लाख रुपयांचा मुद्देमाल महसूल विभागाच्या पथकाने नष्ट केला. या कारवाईमुळे वाळू चोरट्यांचे धाबे दणाणले आहे.पोलिस म्हणतात 'ऑल ईज वेल'पुलगाव पोलिस विविध कारणांमुळे चांगलेच वादात सापडत आहे. या पोलिस ठाण्यापासून काही अंतरावर असलेल्या गुंजखेडा वाळू घाटावर मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या वाळू उपसा सुरु होता. परंतु तरीही पुलगाव पोलिसांकडून सर्व काही  'ऑल ईज वेल' असल्याचे वरिष्ठांना सांगितले जात होते. परंतु या वाळू चोरीच्या माध्यमातून कुणाचे 'ऑल ईज वेल' होते, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

खनिकर्म अधिकाऱ्यांनी दुचाकीवरून गाठला घाटपोलिस आणि महसूल विभागाच्या वतीने वाळू चोरट्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे आता वाळू चोरटेही सजग झाले आहे. अधिकाऱ्यावर पाळत ठेवली जात आहे. कोणत्या अधिकाऱ्यांचे वाहन कोण्या दिशेने जातात, यावर लक्ष ठेवण्याकरिता खबऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या कारवाईवर ही परिणाम होतो. या सर्व बाबी लक्षात घेता जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. अतुल दोड यांनी चक्क दुचाकीवरून गुंजखेडा येथील वाळू घाट गाठत ही कारवाई केली. या कारवाईमध्ये देवळीचे तहसीलदार राजेश सरवदे, तुषार शिंदे, तलाठी भारत डेहनकर, अजय नागे व मनोहर हांडे यांचा समावेश होता. जिल्ह्यात कुणीही अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करु नये, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल,असा इशाराही देण्यात आला.