शहरं
Join us  
Trending Stories
1
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
5
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
6
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
7
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
8
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
9
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
10
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
11
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
12
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
13
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?
14
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
15
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
16
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
17
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
18
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
19
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
20
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली

डीबीटी विरोधात आक्रोश मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 00:39 IST

शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना जेवणासाठी मिळणारा निधी थेट बँक खात्यात (डीबीटी) जमा करण्याच्या विरोधात आदिवासी मुला-मुलींचे वसतिगृह, आदिवासी विद्यार्थी संघ व आॅल इंडिया इंडिजेनीयस स्टुडंट फेडरेशनच्यावतीने स्थानिक छत्रपती शिवाजी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत......

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : तरुण-तरुणींनी नोंदविला निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना जेवणासाठी मिळणारा निधी थेट बँक खात्यात (डीबीटी) जमा करण्याच्या विरोधात आदिवासी मुला-मुलींचे वसतिगृह, आदिवासी विद्यार्थी संघ व आॅल इंडिया इंडिजेनीयस स्टुडंट फेडरेशनच्यावतीने स्थानिक छत्रपती शिवाजी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.शासन निर्णय आदिवासी विद्यार्थ्यांसाठी हिताचे नसून हे निर्णय विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित करण्याचा प्रयत्न आहे. आदिवासी विभागाच्यावतीने डीबीटी अंतर्गत ५ एप्रिलला शासन निर्णय काढण्यात आला आहे. या निर्णयामध्ये पुढील सत्रापासून राज्यातील शासकीय आदिवासी वसतीगृहातील भोजन बंद करून पैसे देण्यात येणार आहे. मात्र पंडित दिनदयाल योजने प्रमाणे वसतीगृह प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना शासन थेट शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता व निवासाकरीता रक्कम देणार होते; पण या योजनेंतर्गत सरकारला वेळेवर कुठलेही पैसे पुरविता आले नाही. डीबीटी अंतर्गत वसतीगृहाची भोजन व्यवस्था बंद केल्यास विद्यार्थी शैक्षणिक सत्रामध्ये भोजन व निवासाची व्यवस्था कशी काय करून शकणार असा प्रश्न निवेदनातून उपस्थित करण्यात आला आहे.सदर शासन निर्णय हा विद्यार्थ्यांमध्ये रोष व संभ्रम निर्माण करणारा असल्याने तो तात्काळ मागे घेण्यात यावा, अशी मागणीही यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली. ५ एप्रिल २०१८ चा शासन निर्णय रद्द करून ११ जुलै २०११ चा शासन निर्णय लागू करीत कंत्राटदाराकडून जेवणामध्ये सुधारणा करण्यात यावी. २०१४-१५ पासूनचे आदिवासी मुला-मुलींचे शिष्यवृत्ती तात्काळ देण्यात यावी. वसतिगृहामधील विद्यार्थ्यांचे निर्वाह भत्यामध्ये वाढ करून महानगरपालिका स्तरावर १५०० रूपये, जिल्हास्तरावर १२०० रूपये, तालुकास्तरावर १००० रूपये करण्यात यावे. शैक्षणिक साहित्य डीबीटी या योजनेमध्ये वाढ करून अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना ८००० रूपये, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना १०,००० रूपये आणि वैद्यकीयशास्त्र, औषध निर्माणशास्त्र, कृषी शाखा व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांना १५,००० रूपये करण्यात यावे. वर्धा येथील तीन ही नवीन आदिवासी वसतीगृहाचे बांधकाम झाले. त्याचा शुभारंभ ना. सावरा यांनी केला आहे; पण तेथे अजूनपर्यंत आवश्यक साहित्य पुरविण्यात न आल्याने त्याचा पुरवठा तात्काळ करण्यात यावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.सदर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आला असता पोलिसांनी मोर्चा न्यायालयाच्या मुख्य प्रवेश द्वारासमोर अडविला. त्यानंतर आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने सदर विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना सादर केले. येत्या सात दिवसात मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार न झाल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. मोर्चाचे नेतृत्व सूरज कुसराम, गणेश मडावी, चंद्रशेखर मडावी, विजय जुगनाके यांनी केले. मोर्चात कविता अरके, पुनम कन्नाके, जोत्स्ना आडे, जया इवनाते, पवन टेकाम, मुकेश हनवते, पवन कंगाले, शुभम शेडमाके, ओमप्रकाश बर्डे, शुभम उइके, महेश कुमरे, निलेश पेंदाम, सचिन नराते, शंकर उईके तसेच आदिवासी मुलां-मुलींच्या वसतीगृहातील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.मागणीवर विचार न झाल्यास उपोषणडीबीटी प्रणाली ही विद्यार्थ्यांच्या अडचणीत भर टाकणारी ठरत आहे. नव्याने काढण्यात आलेला सदर शासन निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा यासह विविध मागण्या जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. निवेदनातून करण्यात आलेल्या मागण्यांवर येत्या सात दिवसात सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार न केल्यास बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.