शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

राधिका अन् सिमरन जिल्ह्यातून प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 23:49 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या परीक्षेत जिल्ह्यातील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांपेक्षा वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरीच केली आहे.

ठळक मुद्देगो.से. वाणिज्यचे विद्यार्थी चमकले : दोघींनी मिळविले ९६.४७ टक्के गुण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या परीक्षेत जिल्ह्यातील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांपेक्षा वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरीच केली आहे. वर्धा शहरातील गो.से. वाणिज्य महाविद्यालयाच्या राधिका तापडिया व सिमरन थदानी यांनी समान टक्के गुण संपादीत करून जिल्ह्यातून प्रथम आल्या आहेत. त्यांनी ९६.४७ टक्के गुण संपादीत केले आहे. तर गो. से. वाणिज्य महाविद्यालयातीलच अभिषेक झोडे यांने ९५.६९ टक्के तर चित्रिका गेलानी हिने ९५.५४ टक्के गुण संपादित करून अनुक्रमे जिल्ह्यातून द्वितीय व तृतीय स्थानी राहिले.यंदाच्या वर्षी वर्धा जिल्ह्यातील विज्ञान शाखेच्या विविध कनिष्ठ महाविद्यालयातील एकूण ६ हजार ६४० विद्यार्थ्यांनी प्रथमच परीक्षेचे अर्ज भरले होते. शिवाय ६ हजार ६३६ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यापैकी ५ हजार ९११ विद्यार्थ्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली. त्याची टक्केवारी ८९.०७ इतकी आहे. तर कला शाखेच्या विविध कनिष्ठ महाविद्यालयातील एकूण ६ हजार ९३७ विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्ज भरले होते. तसेच ६ हजार ९२९ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यापैकी ४ हजार ८५० विद्यार्थ्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली. त्याची टक्केवारी ७० इतकी आहे. वाणिज्य शाखेच्या विविध कनिष्ठ महाविद्यालयातील एकूण २ हजार २३६ विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्ज भरले होते. शिवाय २ हजार २३५ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली.त्यापैकी १ हजार ९८० विद्यार्थ्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली. त्याची टक्केवारी ८८.५९ इतकी आहे. एमसीव्हीसी शाखेच्या विविध कनिष्ठ महाविद्यालयातील एकूण १ हजार २३३ विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्ज भरले होते. त्यापैकी १ हजार २३२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ९७४ विद्यार्थ्यांनी परीक्षेत घवघवीत यश संपादीत केले आहे. त्याची टक्केवारी ७९.०६ इतकी आहे.सात कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्केवर्धा जिल्ह्यातील सात कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. यात वर्धा येथील सुशिल हिंमतसिंगका ज्यु. कॉलेज, सरस्वती विद्या मंदिर ज्यु. कॉलेज, देवळी तालुक्यातील पुलगाव नजीकच्या हिवरा येथील इंडियन मिलिटरी स्कूल, सेलू तालुक्यातील सिंदी (रेल्वे) येथील विद्याविकास ज्यु. कॉलेज, सेलू येथील दीपचंद चौधरी सायन्स ज्यु. कॉलेज, समुद्रपूर तालुक्यातील वासी येथील जे.डी. चौधरी कनिष्ठ महाविद्यालय, संस्कार ज्ञानपीठ समुद्रपूर यांचा समावेश आहे.राधिकाला व्हायचंय सीएबारावीच्या परीक्षेत ९६.४७ टक्के गुण संपादित करणाऱ्या साधिका तापडिया हिला उत्कृष्ट सीए व्हायचे आहे. ती दररोज खूप अभ्यास करीत नव्हती. मात्र, ती दररोज दोन तास अभ्यास करायची. शिवाय शाळा आणि शिकवणीला ती नियमित उपस्थिती दर्शवित होती. राधिका हिचे वडिल प्रशांत हे व्यावसायिक तर आई स्मीता या गृहिणी आहेत. उल्लेखनीय म्हणजे राधिका ही संयुक्त कुटुंबात राहत असून तिच्या कुटुंबात आजी-आजोबा, काका-काकूंसह एकूण १२ सदस्य आहेत. बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करणाºया राधिका हिला चित्र रेखाटण्याचा छंद आहे. इतकेच नव्हे तर शाळेला सुट्ट्या लागल्यानंतर दोन महिन्यांच्या कालावधीत नियमित चित्रकलेची शिकवणी लावते. तिने घेतलेल्या चित्रकलेल्या प्रशिक्षणामुळे ती सध्या उत्कृष्ट चित्रकारही झाली असल्याचे सांगण्यात आले.विज्ञान शाखेतून ‘रोशनी’ चमकलीवर्धा जिल्ह्यातील विज्ञान, कला व वाणिज्य तसेच एमसीव्हीसी शाखेच्या एकूण महाविद्यालयांपैकी केवळ सात कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. असे असले तरी विज्ञान शाखेचा विचार केल्यास वर्धा शहरातील जे.बी. विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या रोशनी मिश्रा हिने ९५.४४ टक्के गुण घेऊन जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे. तर न्यू इंग्लिशच्या प्रणाली पखाले ९४.०० टक्के आणि सुमित तिवरे ९२.६२ टक्के गुण घेऊन अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थानी राहिले.

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकाल