शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

रबी क्षेत्रात होणार घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 11:36 PM

यंदाच्यावर्षी जिल्ह्यात अल्प पाऊस झाल्याने जिल्ह्यातील छोट्या व मोठ्या जलाशयांमधील पाणी पातळीत पाहिजे तशी वाढ झालेली नाही. इतकेच नव्हे तर शेतातील विहिरींच्या पाणी पातळीत झपाट्याने घट होत आहे.

ठळक मुद्देकृषी तज्ज्ञांचा अंदाज : पाण्याचे नियोजन करून गहू, चन्याची लागवड करा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यंदाच्यावर्षी जिल्ह्यात अल्प पाऊस झाल्याने जिल्ह्यातील छोट्या व मोठ्या जलाशयांमधील पाणी पातळीत पाहिजे तशी वाढ झालेली नाही. इतकेच नव्हे तर शेतातील विहिरींच्या पाणी पातळीत झपाट्याने घट होत आहे. त्यामुळे यंदा मागील वर्षीच्या तूलनेत रबी पीक लागवडीच्या क्षेत्रात घट येण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे. शिवाय गहू व चना पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा विचार करून तसेच त्याचे योग्य नियोजन करूनच सदर पिकांची लागवड करावी, असा सल्ला सध्या त्यांच्याकडून दिल्या जात आहे.वर्धा जिल्ह्यात सुमारे ६२ हजार हेक्टरवर रबी पिकांची लागवड केली जाते. जलयुक्त शिवार तसेच गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार योजनांतर्गत झालेल्या विविध कामांमुळे समाधानकारक पाऊस झाल्यावर हे क्षेत्र ९५ हजार हेक्टर होईल असे बोलले जात होते. परंतु, यंदा पाहिजे तसा पाऊस जिल्ह्यात झाला नसल्याने जिल्ह्यातील अनेक जलाशये तळ दाखवत आहेत. शिवाय शेतातील विहिरीच्या पाणीपातळीत झपाट्याने घट होत आहे. त्यामुळे रबी पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांनी संभाव्य धोका लक्षात घेऊन काही उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे जानकारांचे म्हणणे आहे. ज्यांच्याकडे रबी पिकांना दोन पाणी देण्याची व्यवस्था होऊ शकते अशाच शेतकºयांनी चना पिकाची लागवड करावी. असे न केल्यास चना उत्पादक शेतकऱ्याला आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लाऊ शकते. तर ज्याच्याकडे पिकाला सहा वेळा पाणी देण्याची व्यवस्था होऊ शकते अशाच शेतकºयांनी यंदा गहू पिकाची लागवड करावी, असेही कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे. रबी हंगामाच्या तयारीत असणाºया शेतकºयांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनात यंदा शेती करावी.चन्याचे वाण कमी पाण्यात तग धरणारेज्यांच्याकडे दोन पाणी देण्याची व्यवस्था होऊ शकते अशा शेतकऱ्यांनी चना पिकाची लागवड करताना जॅकी ९२१८ या वाणाची निवड करणावी. चन्याचे हे वाण कमी पाण्यात तग धरणारे असल्याने उत्पन्न समाधानकारक होण्याची शक्यता असते. तर ज्यांच्याकडे पिकाला चार पाणी देण्याची व्यवस्था आहे त्या शेतकºयांनी विशाल व विजय या चन्याच्या वाणाची लागवडीसाठी निवड करावी, असे सांगण्यात आले.मुबलक पाणी नसेल तर गव्हाची लागवड धोक्याचीज्या शेतकऱ्यांकडे पिकाला सहा वेळा पाणी देता येईल अशाच शेतकऱ्यांनी यंदा रबी हंगामात गहू पिकाची लागवड करावी. ज्यांच्याकडे मुबलक पाण्याची व्यवस्था नाही अशा शेतकऱ्यांनी यंदा गव्हाची लागवड करण्याचे टाळले पाहिजे. अन्यथा त्यांना आर्थिक फटका सहन करावा लागेल असा अंदाज कृषी तज्ज्ञांकडून वर्तविला जात आहे.२० दिवसांच्या अंतराने पिकाला द्यावे पाणीजमिनीत ओलावा असेल तर पेरणीनंतर २० दिवसांनी पिकाला पाणी द्यावे. जॅकी वानाच्या चन्याची लागवडीसाठी निवड केल्यास पिकाला २० दिवसांनी पहिल्यांदा तर ६० दिवसांनी दुसऱ्यांना पाणी द्यावे. तर चन्याच्या विशाल व विजय वानाची निवड शेतकऱ्यांनी केली असल्यास त्यांनी पिकाला २०,६० व ८० दिवसानंतर पाणी द्यावे.तर गव्हाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी जमिनीत ओलावा नसल्यास पेरणीला पहिल्यांदा पाणी द्यावे. त्यानंतर २०-२० दिवसाच्या अंतराने सहा टप्प्यात गव्हाला सिंचन करावे. पाण्याचे योग्य नियोजन करून रबी पीक घेतल्यास शेतकºयांना संभाव्य धोका टाळता येत असल्याचे सांगण्यात आले.यंदाच्या वर्षी जिल्ह्यात पाऊस कमी पडला आहे. शिवाय जिल्ह्यातील जलायशांच्या पाणी पातळीतही पाहिजे तशी वाढ पावसाळ्यात झाली नाही. त्यामुळे रबी पीक घेण्याचे नियोजन करणाऱ्या शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून चना व गहू पिकाची लागवड करावी.- विद्या मानकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.