शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
संजय राऊतांना PM मोंदीचे नेतृत्व, क्षमतेवर शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही?”
3
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
4
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
5
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
6
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
7
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
8
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
9
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
10
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
11
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
12
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
13
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
14
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
15
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
16
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
17
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
18
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
19
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
20
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक

आर्थिक हतबलतेत रबीच्या पेरण्या

By admin | Updated: November 30, 2014 23:09 IST

खरीप हंगामात सातत्याने तीन वर्षांपासून शेतकऱ्यांच्या पदरी दुष्काळच येत आहे. कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळाचा त्याला सामना करावा लागत आहे. यंदाच्या खरीपात हतबल झालेला बळीराजा

बियाणेही महाग : नापिकीचे संकट कायमचघोराड : खरीप हंगामात सातत्याने तीन वर्षांपासून शेतकऱ्यांच्या पदरी दुष्काळच येत आहे. कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळाचा त्याला सामना करावा लागत आहे. यंदाच्या खरीपात हतबल झालेला बळीराजा कशीबशी आर्थिक जुळवाजुळव करून रबीच्या पेरणीत व्यस्त होतानाचे चित्र दिसू लागले आहे. आर्थिक दृष्ट्या हतबल झालेला शेतकरी रबीच्या पिकापासून आशा लावून आहे. ‘झाले गेले विसरूणी जावे, पुढे पुढे चालावे’ या उक्तीप्रमाणे बळीराजा उराशी असलेले आर्थिक दु:ख दूर सारत आशेचा किरण उगवेलच म्हणून गहू व चणा पेरणीच्या कामात व्यस्त झाल्याचे दिसून येत आहे. गहू पेरणीसाठी लागणारे बियाणे ५० रुपये किलोच्या दरात विकत घ्यावे लागत असून एका एकराला ४० किलो बियाणे लागते आहे. बियाण्याकरिता दोन हजाराचा खर्च, पेरणीसाठी एक हजार व ओलिताचा येणारा खर्च त्याला सोसावा लागत आहे. यातही थंडीचा पत्ता नसल्याने रबीवरही संकट येण्याचे चिन्ह आहे. रासायनिक खताचे भाव गगणाला भिडत आहेत. अशात पैशाची जुळवाजुळव करणे शक्य नसल्याने बहुतांश शेतकरी पेरणीच्या वेळी रासायनिक खताचा वापर करताना दिसत नाही़ गव्हाचे उत्पन्न हाती येण्यास मार्च-एप्रिल महिना येणार आहे़ ओलिताच्या वेळी युरीयाची मात्रा द्यावी असे शेतकऱ्यांनी ठरविले असून घरी असलेला कापूस विकूण हा खर्च करावा लागणार आहे़ यातही कापूस विकून उधारीचा पैसा द्यावा वा रबीच्या पेरणीचा खर्च करावा अशा विवंचनेत तो आहे. कापसाच्या उत्पन्नात घट झाली आहे़ त्यातही तो विक्रीस काढल्यास योग्य दर मिळण्याची शाश्वती नाही. यामुळे चिंता कामय आहे. सोयाबीन तर कसे उगविले कसे गेले हे कळलेच नाही. अशातच विजेचे बील, घरखर्च, मुलांचे शिक्षण आदी खर्च कसा करावा या विवंचनेतही बळीराजा आहे. शेती पडीक कशी ठेवणार वडिलोपार्जीत सुरू असलेल्या व्यवसायाला खिळ बसेल असे अनेक प्रश्न मनात घेवून पुन्हा बळीराजा कामाला लागला आहे.(वार्ताहर)