शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

कमी दाबाच्या वीजप्रवाहामुळे रबीतील सिंचन प्रभावित

By admin | Updated: October 26, 2015 02:11 IST

वीज वितरण कंपनीकडून होणाऱ्या कमी दाबाच्या वीजपुरवठ्याने शेतातील मोटरपंप सुरू होत नाहीत.

मोटारपंप निकामी : रबी हंगाम धोक्यात येण्याची शक्यतातळेगाव (श्या.पंत): वीज वितरण कंपनीकडून होणाऱ्या कमी दाबाच्या वीजपुरवठ्याने शेतातील मोटरपंप सुरू होत नाहीत. अनेकदा वीज पुरवठा खंडित होत असल्याने मोटारपंप सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांना शेतात चकरा माराव्या लागत आहे. खंडित वीज पुरवठा व सातत्याने होणाऱ्या विजेच्या लपंडावाने शेतकऱ्यांचा रबी हंगामही धोक्यात आला आहे. परिसरात तळेगाव वीज वितरण विभागांतर्गत अनेक गावातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. सध्या रबी हंगामाला शेतकऱ्यांनी सुरूवात केली आहे. दुरूस्तीच्या नावाखाली वीज वितरण कंपनी जनतेवर भारनियमनाचा बडगा उगारत आहे. या अघोषित भारनियमानाने नागरिक चांगलेच वैतागले आहेत. जुनोना, देवगाव, चिस्तूर, आनंदवाडी, भिष्णूर, खडका, बेलोरा, टेंभा परिसरातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. सध्या शेतातील पिकांना मोटारपंपपाच्या सहाय्याने पाणी घ्यायला शेतकऱ्यांनी सुरूवात केली आहे. मात्र कमी दाबाच्या वीज पुरवठ्याने घरातील विजेच्या उपाकरणांमध्ये वारंवार बिघाड येत आहे. वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने लाखो रूपये खर्च करून शेतात लावलेले मोटारपंप जळण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. विजेचा कमी प्रमाणात वापर होत असतानाही वीज वितरण कंपनीकडून क्षमतेपेक्षा जास्त वीज बिल पाठविले जात असल्याचा आरोप शेतकरी व नागरिकांमधून होत आहे. एकीकडे वीज नसल्याने नागरिक त्रस्त आहे तर दुसरीकडे जादा वीज बिलाचा भुर्र्दंड नागरिकांना सहन करावा लागत आहे. शेतपिकांना सध्या सिंचनाची आवश्यकता आहे. दिवस रात्र कष्ट करून फुलविलेली पिके पाण्याअभावी सुकायला लागली आहेत. शेतातील पिकांना पाणी देताना वीजपुरवठा कमी दाबामुळे केव्हाही खंडित होतो. कित्येक वेळानंतर तो सुरळीत होतो. वीज पुरवठा कधीही खंडित होत असल्याने शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागत आहेत. वीजपुरवठा कधी सुरळीत होईल याची वाट पाहात अनेकदा दिवस निघून जातो. वीज वितरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी आहे.(वार्ताहर)