शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीसाठी उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
2
“दोन शिवराज्याभिषेक सोहळे होताच कामा नयेत, तुम्हाला जनतेला एक होऊ द्यायचे नाही”: मनोज जरांगे
3
"माझी हत्या झालीय", भावाच्या स्वप्नात आला राजा; कुटुंबीयांनी केली CBI चौकशीची मागणी
4
आयफेल टॉवरपेक्षाही उंच, भव्यता पाहून विस्फारतील डोळे; चिनाब रेल्वे पूल पाहिलात का?
5
सिंधू पाणी कराराबाबत बिलावल भुट्टोंनी गरळ ओकली; भारताला पुन्हा दिली अणुयुद्धाची धमकी
6
RBI MPC Meeting : EMI चा भार आणखी कमी होणार, रिझर्व्ह बँकेचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; रेपो दरात केली कपात
7
चीनला धोबीपछाड, जगात सर्वाधिक पदवीधर भारतात; नव्या रिपोर्टमध्ये काय?
8
Nirjala Ekadashi 2025: निर्जला एकादशीला कुंभदान केल्याने धनराशीचा भरलेला राहतो घडा!
9
वासनेनं आंधळा झाला जीजू, मेहुणीवर टाकली वाईट नजर, नकार मिळताच केलं मोठं कांड!
10
संतोष देशमुख प्रकरणी आरोपींवरील मोक्का काढू देणार नाही, जरांगे-पाटलांचा निर्धार; मुख्यमंत्र्यांवर आरोप
11
Corona Virus : धक्कादायक! ३ वर्षांच्या मुलीचा कोरोनामुळे मृत्यू, चिमुकल्यांसाठी किती घातक आहे नवा व्हेरिएंट?
12
विजय मल्ल्याच्या मनात होती Mumbai Indians, पण घ्यावी लागली RCB, वाचा टीम खरेदीचा भन्नाट किस्सा
13
सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या गाडीचा भीषण अपघात! वडिलांचा जागीच मृत्यू, तर अभिनेता गंभीर जखमी
14
“आता फक्त न्यायाची अपेक्षा”; वैभवी देशमुख रायगडावर, छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक
15
रेपो दरात कपात, ५० आणि २० लाखांच्या लोनवर किती कमी होणार EMI? जाणून घ्या
16
परिस्थिती गंभीर! कोरोनापेक्षाही जीवघेणा 'हा' आजार; हृदयावरच आघात, दरवर्षी १८ मिलियन मृत्यू
17
९५ वर्षांचे आजोबा, ७० वर्ष राहत होते लिव्हइनमध्ये, आता झाली लग्न करायची इच्छा अन्...  
18
'स्पिरीट'नंतर दीपिका पादुकोण 'या' बिग बजेट सिनेमातूनही बाहेर? अभिनेत्रीच्या अटींमुळे मेकर्स विचारात
19
खळबळजनक! WhatsApp वर देवाचा फोटो DP; हनीट्रॅप, हेरगिरीसाठी पाकिस्तानचं 'देसी' प्लॅनिंग
20
"लग्न झालं की लाइफ सेट असंच वाटायचं, पण...", लग्नाबद्दल स्पष्टच बोलली मधुराणी, म्हणाली...

वादळी पावसामुळे रबीतील पिकांनाही फटका

By admin | Updated: February 13, 2015 00:33 IST

कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ, कधी मुसळधार पाऊस तर कधी पावसाची प्रतीक्षा या संकटातून सतत शेतकऱ्यांना जावे लागत आहे.

पुलगाव : कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ, कधी मुसळधार पाऊस तर कधी पावसाची प्रतीक्षा या संकटातून सतत शेतकऱ्यांना जावे लागत आहे. यामुळे उराशी बाळगलेल्या स्वप्नांचा चुराडा होताना दिसतो़ आता पुन्हा निसर्गाने शेतकऱ्यावर घाला घातला असून वादळी पावसामुळे चना, तूर, गहू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले़ मंगळवारी रात्री झालेल्या वादळी पावसाने शेतकरी हादरला आहे़शेतकऱ्यांच्या शेतात असलेले गहू, चना हे पीक वादळ व पावसामुळे भुईसपाट झाले असून कापूस ओला झाला़ शेतात ठेवलेल्या तुरीच्या गंज्यांचे अतोनात नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले़ गत दोन दिवसांपासून शहर व परिसरात ढगाळी वातावरण असले तरी पावसाचे चिन्ह दिसत नव्हते; पण मंगळवारी रात्री ३ वाजताच्या सुमारास शहर व परिसरात विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाने चांगलाच तडाखा दिला़ यामुळे शहर परिसरातील शेतातील गहू, चना या उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाल्याचे वाघोली (बिरे) येथील शेतकरी विनोद बिरे यांनी सांगितले. आपटी, वाघोली, दहेगाव (धांदे) या परिसरातील शेतातील गहू व चना ही उभी पिके वादळी पावसाने शेतात झोपली. यामुळे शेकडो एकरातील पिकांचे नुकसान झाले़ शहरात गजानन महाराज मंदिरातील भागवत सप्ताहाच्या मंडपाचे नुकसान झाले़ विजयगोपाल येथील पंचकल्याण महोत्सवासाठी उभारण्यात आलेल्या अयोध्यानगरी मंडपालाही वादळी पावसाचा फटका बसला़(लोकमत न्यूज नेटवर्क)चांगल्या दिवसाचे स्वप्न ठरतेय दिवास्वप्नघोराड - शासनाने बळीराजाला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविले असले तरी खरीपानंतर रबी हंगामावरही अस्मानी संकट कोसळल्याने हे स्वप्न दिवास्वप्नच ठरणार असल्याचे दिसते़खरीप हंगामातील आपत्तीचा गांजर निधीचे वाटप सुरू असताना मंगळवारी वादळी वाऱ्यासह आलेला पाऊस गहू, चना व तुरीचे नुकसान करण्यास कारणीभूत ठरला. पांढऱ्या सोन्याच्या भाववाढीकडे शासनाने पाठ फिरविली. सोयाबीनला अत्यल्प भाव, तुरीला समाधानकारक दर; पण उत्पादनात घट यामुळे लागलेला खर्चही निघाला नाही. तोच रबीच्या हंगामाला सामोरे गेलेल्या शेतकऱ्यांच्या हातात येणारा वर्षभरासाठी लागणारा गहू नेस्तनाबूत झाला असल्याने लागणारे अन्नच हातचे गेले. यामुळे हताश होण्याची वेळ आली. या नुकसानीचे सर्वेक्षण होणार आणि २०० ते ५०० रुपयांची तुटपुंजी मदत मिळणाऱ या प्रकाराने चांगले दिवस येतील काय, खिशात ५०० च्या हिरव्या नोटा दिसतील काय, हे कोडेच आहे़ या कोड्याची उकल शासन कशी करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत द्यामंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास वादळी पावसाने काही भागात शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले़ संपूर्ण जिल्ह्यात गहू, तूर, संत्रा पिकांचे नुकसान झाले असून नुकसानग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांच्यावतीने करण्यात येत आहे़यावर्षी खरीप हंगामात दुष्काळसदृश परिस्थिती होती तर रबी हंगामातील गहू, चना, तूर, संत्रा आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील नुकसान झालेल्या पिकांचा तातडीने सर्व्हे करावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी १० हजार रुपयांची मदत जाहीर करावी, अशी मागणी माजी जि़प़ सदस्य दिलीप अग्रवाल यांनी केली आहे़ याबाबत जिल्हाधिकारी एऩ नवीन सोना यांना निवेदनही सादर करण्यात आले आहे़सेवाग्राम - मध्यरात्रीनंतर झालेल्या वादळी पावसामुळे सेवाग्राम ते हमदापूर परिसरातील शेतीचे मोठे नुकसान झाले. प्रशासनाने याचा सर्व्हे करून अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी मनसेचे सेलू तालुका उपाध्यक्ष अतुल पन्नासे यांनी केली आहे.दिवसा लख्ख प्रकाश होता. आभाळाचे कुठलेच चिन्ह नव्हते. शेतात कापूस, चना, तुरीच्या पेट्या आणि गहू असे पीक होते़ अकस्मात वारा, पाऊस आणि विजेचा कडकडाट यामुळे नागरिकासह शेतकरी हादरले़ गहू झोपला, कापूस व तुरीच्या पेट्या ओल्या झाल्या. आधीच शेतकरी आर्थिक संकटात असताना यात अवकाळी वादळी पावसाची पर पडली़ बहुसंख्य शेतकऱ्यांचे तुरीचे कुटारही पावसात सापडल्याने नुकसान झाले. सेलू तालुक्यात चानकी, कोपरा, देऊळगाव, हमदापूर, वघाळा, तुळजापूर, खडका, जयपूर, हिंगणी, नानबर्डी, चारमंडळ आदी गावांत सर्वेक्षणाची मागणी होत आहे़ तातडीची मदत करण्याची मागणी पन्नासे यांनी केली आहे. शेतातील गहू झोपला असून जनावरांचा चारा ओला झाला़ आश्रम परिसरातील अशोक गिरी, पवन गणवार व सचिन हुडे यांचे दूरदर्शन संच बिघडले. पाहणी प्रसंगी राजेश बावणे, मोहन वाहुरकर, अमोल कडू, ढुमणे आदी उपस्थित होते.