शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

तूर खरेदीचे प्रमाण अल्प असल्याने शेतकऱ्यांसमोर प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 23:52 IST

खुल्या बाजारात कापूस, तूर, चणा व सोयाबीनचे भाव शासनाच्या हमीभावापेक्षा कमी झालेत. शासनाने हा शेतमाल हमीभावाने खरेदी करावा म्हणून शासकीय खरेदी केंद्रे सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. या मागणीच्या पूर्ततेचा देखावा करीत शासनाने काही ठिकाणी तूर खरेदी सुरू केली, पण या केंद्रावर एकरी केवळ २ क्विंटल ६० किलो एवढीच तूर स्वीकारली जाते.

ठळक मुद्देव्यापाऱ्यांकडून लूट : गतवर्षीप्रमाणेच खरेदी करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्करोहणा : खुल्या बाजारात कापूस, तूर, चणा व सोयाबीनचे भाव शासनाच्या हमीभावापेक्षा कमी झालेत. शासनाने हा शेतमाल हमीभावाने खरेदी करावा म्हणून शासकीय खरेदी केंद्रे सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. या मागणीच्या पूर्ततेचा देखावा करीत शासनाने काही ठिकाणी तूर खरेदी सुरू केली, पण या केंद्रावर एकरी केवळ २ क्विंटल ६० किलो एवढीच तूर स्वीकारली जाते. ही बाब अत्यंत अन्यायकारक असून शेतात पिकलेली सर्वच तूर शासनाने खरेदी करावी, अशी मागणी रोहणा परिसरातील शेतकरी करीत आहेत.कापूस हे पीक खर्चाला व मानवी श्रमाला न परवडणारे पीक असून आधी कापसाच्या पिकात मिश्रपीक म्हणून तुरीचे पीक घेणारा शेतकरी आता संपूर्ण शेतात तुरीचे एकमेव पीक घ्यायला लागला आहे. परिणामी, अनेक शेतकऱ्यांना एकरी पाच-सहा क्विंटल तुरीचे उत्पादन होते. जर शेतात कापसामध्ये मिश्र पीक म्हणून तुरीचे उत्पादन घेतले तरी साधारण चार एकर शेतात कमीत कमी चार ते पाच क्विंटल तुरी पिकतात. शेतात तुरीचे एकमेव पीक असेल तर तलाठी धुरा व काही जागा कमी करून शेतातील तुरीचा पेरा सात बारावर नोंदवून देतो. पण कापसामध्ये मिश्रपीक म्हणून तुरी असली तर तलाठी केवळ २० ते २५ टक्के आराजी तुरीचे असल्याची नोंद करतो. अशावेळी शासनाच्या धोरणानुसार एकमेव तुरीचेच पीक असेल तर त्या शेतकºयांच्या शासकीय केंद्रावर १० क्विंटल ४० किलो एवढ्याच स्वीकारल्या जातात. तर चार एकरात कापसासोबत मिश्र पीक म्हणून तुरी लावल्या असतील तर अशा शेतकºयांच्या केवळ २ क्विंटल ६० किलो तुरी शासन स्वीकारते. यामुळे काही तुरी शासकीय खरेदी केंद्रावर नेल्यावरही उरलेल्या तुरी शेतकºयांनी कुठे विकाव्यात, हा प्रश्न उभा राहतो. या परिस्थितीमुळे व्यापाºयांचे फावत असून व्यापारी शेतकºयांना हमीभावापेक्षा ६०० ते ७०० रुपयाचे क्विंटलमागे लुटत आहे. अधिक चौकशी केली असता शासकीय खरेदी केंद्रावरील अधिकारी यंदा दुष्काळ आहे, मग शेतकऱ्यांजवळ एवढ्या तुरी कशा आल्यात असा प्रश्न करतात. केंद्रावर येणाऱ्या तुरी ह्या सिंचनाची सोय असणाऱ्या शेतकऱ्यांच्याच आहे ओलिताची सोय असणाऱ्या शेतकऱ्यांना एकरी पाच क्विंटल व कापसात मिश्र पीक घेणाऱ्यांना चार एकरात १० क्विंटलपर्यंत तुरीचे उत्पादन झाले, ही परिस्थिती आहे. शासनाने मागील वर्षीप्रमाणे यंदाही एकरी पाच क्विंटल या प्रमाणात तुरी खरेदी कराव्यात, अशी मागणी रोहणा परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी