शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
4
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
5
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
6
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
7
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
8
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
9
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
10
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
11
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
12
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
13
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
14
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
15
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
16
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
17
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
18
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
19
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
20
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर

तूर खरेदीचे प्रमाण अल्प असल्याने शेतकऱ्यांसमोर प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 23:52 IST

खुल्या बाजारात कापूस, तूर, चणा व सोयाबीनचे भाव शासनाच्या हमीभावापेक्षा कमी झालेत. शासनाने हा शेतमाल हमीभावाने खरेदी करावा म्हणून शासकीय खरेदी केंद्रे सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. या मागणीच्या पूर्ततेचा देखावा करीत शासनाने काही ठिकाणी तूर खरेदी सुरू केली, पण या केंद्रावर एकरी केवळ २ क्विंटल ६० किलो एवढीच तूर स्वीकारली जाते.

ठळक मुद्देव्यापाऱ्यांकडून लूट : गतवर्षीप्रमाणेच खरेदी करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्करोहणा : खुल्या बाजारात कापूस, तूर, चणा व सोयाबीनचे भाव शासनाच्या हमीभावापेक्षा कमी झालेत. शासनाने हा शेतमाल हमीभावाने खरेदी करावा म्हणून शासकीय खरेदी केंद्रे सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. या मागणीच्या पूर्ततेचा देखावा करीत शासनाने काही ठिकाणी तूर खरेदी सुरू केली, पण या केंद्रावर एकरी केवळ २ क्विंटल ६० किलो एवढीच तूर स्वीकारली जाते. ही बाब अत्यंत अन्यायकारक असून शेतात पिकलेली सर्वच तूर शासनाने खरेदी करावी, अशी मागणी रोहणा परिसरातील शेतकरी करीत आहेत.कापूस हे पीक खर्चाला व मानवी श्रमाला न परवडणारे पीक असून आधी कापसाच्या पिकात मिश्रपीक म्हणून तुरीचे पीक घेणारा शेतकरी आता संपूर्ण शेतात तुरीचे एकमेव पीक घ्यायला लागला आहे. परिणामी, अनेक शेतकऱ्यांना एकरी पाच-सहा क्विंटल तुरीचे उत्पादन होते. जर शेतात कापसामध्ये मिश्र पीक म्हणून तुरीचे उत्पादन घेतले तरी साधारण चार एकर शेतात कमीत कमी चार ते पाच क्विंटल तुरी पिकतात. शेतात तुरीचे एकमेव पीक असेल तर तलाठी धुरा व काही जागा कमी करून शेतातील तुरीचा पेरा सात बारावर नोंदवून देतो. पण कापसामध्ये मिश्रपीक म्हणून तुरी असली तर तलाठी केवळ २० ते २५ टक्के आराजी तुरीचे असल्याची नोंद करतो. अशावेळी शासनाच्या धोरणानुसार एकमेव तुरीचेच पीक असेल तर त्या शेतकºयांच्या शासकीय केंद्रावर १० क्विंटल ४० किलो एवढ्याच स्वीकारल्या जातात. तर चार एकरात कापसासोबत मिश्र पीक म्हणून तुरी लावल्या असतील तर अशा शेतकºयांच्या केवळ २ क्विंटल ६० किलो तुरी शासन स्वीकारते. यामुळे काही तुरी शासकीय खरेदी केंद्रावर नेल्यावरही उरलेल्या तुरी शेतकºयांनी कुठे विकाव्यात, हा प्रश्न उभा राहतो. या परिस्थितीमुळे व्यापाºयांचे फावत असून व्यापारी शेतकºयांना हमीभावापेक्षा ६०० ते ७०० रुपयाचे क्विंटलमागे लुटत आहे. अधिक चौकशी केली असता शासकीय खरेदी केंद्रावरील अधिकारी यंदा दुष्काळ आहे, मग शेतकऱ्यांजवळ एवढ्या तुरी कशा आल्यात असा प्रश्न करतात. केंद्रावर येणाऱ्या तुरी ह्या सिंचनाची सोय असणाऱ्या शेतकऱ्यांच्याच आहे ओलिताची सोय असणाऱ्या शेतकऱ्यांना एकरी पाच क्विंटल व कापसात मिश्र पीक घेणाऱ्यांना चार एकरात १० क्विंटलपर्यंत तुरीचे उत्पादन झाले, ही परिस्थिती आहे. शासनाने मागील वर्षीप्रमाणे यंदाही एकरी पाच क्विंटल या प्रमाणात तुरी खरेदी कराव्यात, अशी मागणी रोहणा परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी