शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

आदर्श नगरवासीयांचा पाणी प्रश्न सुटणार

By admin | Updated: April 28, 2016 01:55 IST

पाण्यासाठी हाल सहन करणाऱ्या आदर्शनगरवासीयांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे पाणी मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

सेवाग्राम : पाण्यासाठी हाल सहन करणाऱ्या आदर्शनगरवासीयांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे पाणी मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. थकीत देयकामधील काही रक्कम भरल्याने ही अडचण तात्पुरती दूर झाली आहे. गत काही वर्षापासून आदर्शनगर वासीयांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. यंदा मार्च महिन्यापासूनच पाणीटंचाईच्या झळा पोहोचायला सुरूवात झाली. परिणामी जनक्षोम वाढला. येथील पाणीटंचाई बाबत ‘लोकमत’मध्ये वृत्तही प्रकाशित झाले. यानंतर जीवन प्राधिकरण आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभागाशी सरपंच, उपसरपंच, सचिव आणि सदस्यांनी उपाययोजनेबाबत चर्चा केली. नागरिकांना उद्रेक टाळण्यासाठी ग्रा.प. प्रशासनाला जीवन प्राधिकरणशिवाय पर्याय नव्हता. पण २०१० व २०११ मध्ये उन्हाळ्यात आदर्शनगरला दिलेल्या पाण्याचे थकीत साठ हजार रुपये ग्रा.प. ला देणे असल्याने आधी पैसे नंतर पाणी अशी भूमिका प्राधिकरणने घेतली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत सोमवारला ४० हजार रूपयाचा धनादेश प्राधिकरणला दिला. उर्वरीत रक्कम पंधरा दिवसात देणार असा करारनामा केल्यावरच पाणी पुरवठा सुरू होणार आहे. वरूड (रेल्वे) ग्रा.प. हद्दीत सेवाग्राम वर्धा मार्गाजवळच ग्रामीण पाणी पुरवठा जलकुंभ आहे. येथूनच पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.(वार्ताहर)