शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

आदर्श नगरवासीयांचा पाणी प्रश्न सुटणार

By admin | Updated: April 28, 2016 01:55 IST

पाण्यासाठी हाल सहन करणाऱ्या आदर्शनगरवासीयांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे पाणी मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

सेवाग्राम : पाण्यासाठी हाल सहन करणाऱ्या आदर्शनगरवासीयांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे पाणी मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. थकीत देयकामधील काही रक्कम भरल्याने ही अडचण तात्पुरती दूर झाली आहे. गत काही वर्षापासून आदर्शनगर वासीयांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. यंदा मार्च महिन्यापासूनच पाणीटंचाईच्या झळा पोहोचायला सुरूवात झाली. परिणामी जनक्षोम वाढला. येथील पाणीटंचाई बाबत ‘लोकमत’मध्ये वृत्तही प्रकाशित झाले. यानंतर जीवन प्राधिकरण आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभागाशी सरपंच, उपसरपंच, सचिव आणि सदस्यांनी उपाययोजनेबाबत चर्चा केली. नागरिकांना उद्रेक टाळण्यासाठी ग्रा.प. प्रशासनाला जीवन प्राधिकरणशिवाय पर्याय नव्हता. पण २०१० व २०११ मध्ये उन्हाळ्यात आदर्शनगरला दिलेल्या पाण्याचे थकीत साठ हजार रुपये ग्रा.प. ला देणे असल्याने आधी पैसे नंतर पाणी अशी भूमिका प्राधिकरणने घेतली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत सोमवारला ४० हजार रूपयाचा धनादेश प्राधिकरणला दिला. उर्वरीत रक्कम पंधरा दिवसात देणार असा करारनामा केल्यावरच पाणी पुरवठा सुरू होणार आहे. वरूड (रेल्वे) ग्रा.प. हद्दीत सेवाग्राम वर्धा मार्गाजवळच ग्रामीण पाणी पुरवठा जलकुंभ आहे. येथूनच पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.(वार्ताहर)