शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

‘बोरीबाऱ्हा’च्या पुनर्वसनाचा प्रश्न खितपत

By admin | Updated: October 16, 2015 02:58 IST

तलाव फुटण्याच्या भीतीने लगतचे बोरीबाऱ्हा हे गाव विस्थापित झाले. येथील नागरिकांना गत दोन वर्षांपासून जंगलात झोपडीवजा घरे बांधून जीवन कंठावे लागत आहे.

जंगलातील झोपड्यांत राहतात ग्रामस्थ : वीज, पाणी, रस्ता आदी मूलभूत सुविधांचाही अभावसचिन देवतळे विरूळ (आ.)तलाव फुटण्याच्या भीतीने लगतचे बोरीबाऱ्हा हे गाव विस्थापित झाले. येथील नागरिकांना गत दोन वर्षांपासून जंगलात झोपडीवजा घरे बांधून जीवन कंठावे लागत आहे. सरपटणाऱ्या प्राण्यांसह वन्य जीवांच्या धास्तीत ही कुटुंबे राहत आहे. शासन, प्रशासनाकडे निवेदने देऊनही उपयोग होत नसल्याने न्याय कुणाकडे मागावा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देत ग्रामस्थांना मुलभूत सुविधा पुरवाव्या, अशी मागणी होत आहे. शासन, प्रशासनाच्या नजरेतून हरविलेले एक दुर्दैवी गाव म्हणूनच सध्या बोरीबाऱ्हा गावाचा उल्लेख होऊ लागला आहे. गत दोन वर्षांपासून येथील काही ग्रामस्थ जंगलात ठोकलेल्या झोपडीमध्येच वास्तव्यास आहे. या ग्रामस्थांना अधिकारी मुर्ख बनविण्याचा प्रयत्न करीत आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांनी आपले गाव सोडले. तेव्हापासून त्यांना शासनाची कुठलीही मदत प्राप्त झाली नाही. बाऱ्हा येथील कुटुंबाचे पुनर्वसन न केल्याने त्यांना अंधाऱ्या रात्री सरपटणाऱ्या प्राण्यांच्या सानिध्यात चिमुकल्यांसह जगावे लागत आहे. बोरीबाऱ्हा या गावात कोलाम आदिवासी बांधवांची वस्ती आहे. मोलमजुरी करून येथील नागरिक आपल्या संसाराचा गाडा हाकतात. बाऱ्हा गावाला लागून एक मोठा तलाव आहे. दोन-तीन वर्षांपूर्वी हा तलाव तुडूंब भरला होता. तलाव फुटण्याच्या भीतीने प्रशासनाने बाऱ्हा येथील कुटुंबांचे स्थलांतरन करून एका शेतात पाल टाकून त्यांची निवासाची तात्पुरती व्यवस्था केली; पण कुठल्याही मुलभूत सोयी, सुविधा उपलब्ध करून दिल्या नाही. यामुळे पावसाळ्यातही ग्रामस्थांना जंगलातच दिवस काढावे लागत आहे. या ठिकाणी कोणत्याही शासकीय योजना पोहोचल्या नाही. काही दिवसांनी काहीच व्यवस्था नसल्याने काही ग्रामस्था परत आपल्या गावी राहायला गेले; पण काही कुटुंब अजूनही या जंगलात पाल टाकून वास्तव्यास आहेत. दोन वर्षांपासून हे गाव पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहे. अद्याप साधी वीजही येथे पोहोचली नाही. पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. उर्वरित कुटुंबेही पावसाळा सुरू झाला की, याच शेतात राहायला येतात. सध्या हे गाव पूर्णपणे भकास झाले आहे. गावात कुठल्याही सुविधा नाहीत. कित्येक वर्षांपासून येथील ग्रामस्थांनी बोरीबाऱ्हा ते विरूळ या रस्त्याची मागणी केली; पण स्वातंत्र्यानंतरच्या काळात त्यांची रस्त्याची मागणीही पूर्ण होऊ शकली नाही. विरूळ हे बाजाराचे ठिकाण असल्याने त्यांना नेहमीच येथे ये-जा करावी लागते. पावसाळ्यात कंबरभर पाण्यातून दोन किमीचा प्रवास करावा लागतो. राहायला घर नाही, वहिवाटीसाठी रस्ता नाही, रोगराई पसरल्यावर डॉक्टर नाही. यामुळे विरूळ वा पुलगाव येथे बैलबंडीने दवाखान्यात न्यावे लागते. अतिवृष्टी झाल्यास घरांना ओल चढते. यामुळे आजार पसरतात व वैद्यकीय सेवेसाठी भटकंती करावी लागते. येथील नागरिकांच्या हाताला काम नाही. दोन वेळच्या जेवणाचा प्रश्नही गंभीर आहे. पीक नाही, घरी लग्नाच्या मुली आहे; पण प्रशासन त्याकडे लक्ष देण्यास तयार नसल्याचेच दिसते. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही उपाययोजना होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोष पसरला आहे.