शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

वाहत्या पाण्याला अडवून जिरविणे हाच उद्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 00:20 IST

पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांना जेसीबी व पोकलॅन्ड देऊन मोठ्या प्रमाणात जलसंवर्धनाची कामे जैन संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. ही कामे करताना आम्ही धावणाऱ्या पावसाच्या पाण्याला थांबविणे,

ठळक मुद्देसुदर्शन जैन : भारतीय जैन संघटनेची पत्रपरिषद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांना जेसीबी व पोकलॅन्ड देऊन मोठ्या प्रमाणात जलसंवर्धनाची कामे जैन संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. ही कामे करताना आम्ही धावणाऱ्या पावसाच्या पाण्याला थांबविणे, थांबलेल्या पाण्याला अडविणे व अडविलेल्या पाण्याला जमिनीत जिरविणे हा उद्देश केंद्रस्थानी ठेवल्याची माहिती भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुदर्शन जैन यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.या कामकरिता राज्यातील ७५ तालुक्यात दिलेल्या जेसीबी व पोकलॅन्डमुळे मोठ्या प्रमाणात कामे झाली आहेत. त्यामुळे सुमारे ५ हजार १०० कोटी लिटर पाणी साठवण क्षमता वाढणार असल्याची माहितीही जैन यांनी यावेळी दिली. जैन पुढे म्हणाले, भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शांतीलाल मुथा यांच्या मार्गदर्शनात गत दोन वर्षांपासून आम्ही वॉटरकप स्पर्धेत सहभागी गावांना पाणीदार करण्यासाठी जेसीबी व पोकलॅन्ड पुरवित आहोत. गत वर्षीच्या तुलनेत यंदा मोठ्या प्रमाणात जेसीबी व पोकलॅन्ड मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या. वर्धा जिल्ह्यातील ३१ गावांमध्ये ४० मशीनी १४ हजार ३२८ तास चालवून ९४ कोटी ८६ लाख ६६ हजार लिटर पाणी साठविता येईल इतके काम करण्यात आले आहे. संघटनेच्यावतीने गत २५ वर्षांपासून नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यामध्ये पुढाकार घेत कार्य केले जात आहे. आता दुष्काळमुक्त महाराष्ट्र अभियान हाती घेण्यात आल्याचे सांगितले. पत्रपरिषदेला भारतीय जैन संघटनेचे राज्य अध्यक्ष अमर गांधी, विदर्भ अध्यक्ष अनिल फरसोले, राज्य सदस्य प्रदीप जैन, योगेंद्र फत्तेपुरीया, अभिषेक बेद, आगरकर हजर होते.बुलढाणा जिल्हा होतोय सुजलाम-सुफलामसंपूर्ण राज्य दुष्काळमुक्त करण्याचे स्वप्न मोठे आहे. त्या दिशेने सध्या वाटचालही सुरू आहे. बुलढाणा जिल्हा दुष्काळमुक्त करण्याचा मानस उराशी बाळगत सध्या युद्धपातळीवर कामही सुरू आहे. या जिल्ह्यात १३४ पोकलॅन्ड व जेसीबीच्या सहाय्याने जलसंवर्धनाची विविध कामे केली जात आहे. तेथे केवळ तीन महिन्यात ४५ लाख क्युबिक मिटर गाळ विविध नद्या व नाल्या तसेच जलाशयांमधून काढण्यात आला आहे. हा गाळ जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. सध्या झालेल्या कामामुळे ४५० कोटी लिटर पाणी साठवण क्षमतेत वाढ होणार आहे.स्पर्धेनंतर मशीन जलयुक्त शिवारसाठी४५ दिवसांची वॉटर कप स्पर्धा संपल्यानंतर भारतीय जैन संघटनेच्यावतीने दुष्काळमुक्त महाराष्ट्र या हेतूने सदर जेसीबी व पोकलॅन्ड मशीन काही जिल्ह्यात जलयुक्त शिवारच्या कामासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याबाबतची विनंती काही जिल्ह्यातील जिल्हाधिकाºयांनी आमच्या संघटनेकडे केली होती असे यावेळी सांगण्यात आले.

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धा