शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
4
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
5
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
6
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
7
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
8
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन फेका
9
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
10
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
11
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
12
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
13
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
14
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
15
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
16
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
17
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
18
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
19
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
20
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण

वाहत्या पाण्याला अडवून जिरविणे हाच उद्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 00:20 IST

पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांना जेसीबी व पोकलॅन्ड देऊन मोठ्या प्रमाणात जलसंवर्धनाची कामे जैन संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. ही कामे करताना आम्ही धावणाऱ्या पावसाच्या पाण्याला थांबविणे,

ठळक मुद्देसुदर्शन जैन : भारतीय जैन संघटनेची पत्रपरिषद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांना जेसीबी व पोकलॅन्ड देऊन मोठ्या प्रमाणात जलसंवर्धनाची कामे जैन संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. ही कामे करताना आम्ही धावणाऱ्या पावसाच्या पाण्याला थांबविणे, थांबलेल्या पाण्याला अडविणे व अडविलेल्या पाण्याला जमिनीत जिरविणे हा उद्देश केंद्रस्थानी ठेवल्याची माहिती भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुदर्शन जैन यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.या कामकरिता राज्यातील ७५ तालुक्यात दिलेल्या जेसीबी व पोकलॅन्डमुळे मोठ्या प्रमाणात कामे झाली आहेत. त्यामुळे सुमारे ५ हजार १०० कोटी लिटर पाणी साठवण क्षमता वाढणार असल्याची माहितीही जैन यांनी यावेळी दिली. जैन पुढे म्हणाले, भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शांतीलाल मुथा यांच्या मार्गदर्शनात गत दोन वर्षांपासून आम्ही वॉटरकप स्पर्धेत सहभागी गावांना पाणीदार करण्यासाठी जेसीबी व पोकलॅन्ड पुरवित आहोत. गत वर्षीच्या तुलनेत यंदा मोठ्या प्रमाणात जेसीबी व पोकलॅन्ड मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या. वर्धा जिल्ह्यातील ३१ गावांमध्ये ४० मशीनी १४ हजार ३२८ तास चालवून ९४ कोटी ८६ लाख ६६ हजार लिटर पाणी साठविता येईल इतके काम करण्यात आले आहे. संघटनेच्यावतीने गत २५ वर्षांपासून नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यामध्ये पुढाकार घेत कार्य केले जात आहे. आता दुष्काळमुक्त महाराष्ट्र अभियान हाती घेण्यात आल्याचे सांगितले. पत्रपरिषदेला भारतीय जैन संघटनेचे राज्य अध्यक्ष अमर गांधी, विदर्भ अध्यक्ष अनिल फरसोले, राज्य सदस्य प्रदीप जैन, योगेंद्र फत्तेपुरीया, अभिषेक बेद, आगरकर हजर होते.बुलढाणा जिल्हा होतोय सुजलाम-सुफलामसंपूर्ण राज्य दुष्काळमुक्त करण्याचे स्वप्न मोठे आहे. त्या दिशेने सध्या वाटचालही सुरू आहे. बुलढाणा जिल्हा दुष्काळमुक्त करण्याचा मानस उराशी बाळगत सध्या युद्धपातळीवर कामही सुरू आहे. या जिल्ह्यात १३४ पोकलॅन्ड व जेसीबीच्या सहाय्याने जलसंवर्धनाची विविध कामे केली जात आहे. तेथे केवळ तीन महिन्यात ४५ लाख क्युबिक मिटर गाळ विविध नद्या व नाल्या तसेच जलाशयांमधून काढण्यात आला आहे. हा गाळ जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. सध्या झालेल्या कामामुळे ४५० कोटी लिटर पाणी साठवण क्षमतेत वाढ होणार आहे.स्पर्धेनंतर मशीन जलयुक्त शिवारसाठी४५ दिवसांची वॉटर कप स्पर्धा संपल्यानंतर भारतीय जैन संघटनेच्यावतीने दुष्काळमुक्त महाराष्ट्र या हेतूने सदर जेसीबी व पोकलॅन्ड मशीन काही जिल्ह्यात जलयुक्त शिवारच्या कामासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याबाबतची विनंती काही जिल्ह्यातील जिल्हाधिकाºयांनी आमच्या संघटनेकडे केली होती असे यावेळी सांगण्यात आले.

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धा