शहरं
Join us  
Trending Stories
1
Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली
2
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
3
Conversion Law: राजस्थानात धर्मांतरण कायदा लागू, राज्यपाल हरीभाऊ बागडे यांची मंजुरी, उल्लंघन केल्यास किती शिक्षा होणार? जाणून घ्या
4
Tata Capital IPO Allotment: टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
5
रोहित शर्माने विकत घेतली नवीन आलिशान Tesla Model Y कार, त्याची खासियत काय आणि किंमत किती?
6
श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?
7
Saif Ali Khan : "चाकू हल्ल्यात जेह झालेला जखमी..."; ८ महिन्यांनी सैफने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
8
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
9
“योगेश कदमांनी अधिकाराचा गैरवापर करत गुंडाला अभय दिले, राजीनामा द्यावा”; ठाकरे गटाची मागणी
10
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
11
या एका कारणामुळे 'कांतारा चॅप्टर १' बनला ब्लॉकबस्टर; ऋषभ शेट्टीने सांगितलं सिनेमाच्या यशामागचं सीक्रेट
12
इराण युद्ध अमेरिकाच नाही, तर 'या' देशानेही इस्रायलला दिला होता मोठा पाठिंबा!४ महिन्यांनंतर झाला खुलासा
13
संकष्ट चतुर्थी: भारतातील एकमेव १८ हातांच्या गणपतीचे मंदिर पाहिले का? आपल्या महाराष्ट्रातच आहे!
14
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?
15
Cough Syrup : "पप्पा, मला मोबाईल द्या ना...", वेदांशचे शेवटचे शब्द; १२ लाख खर्च करूनही वाचला नाही जीव
16
मृत सासूला चितेवर ठेवताना शरीरावर दिसल्या जखमा; संशय येताच तपास झाला अन् समोर आलं विदारक सत्य!
17
"WhatsApp वर नोट आणि वरिष्ठांची नाव..."; IAS पत्नीने केले १५ कॉल, लेकीलाही पाठवलं पण...
18
Ratan Tata Death Anniversary: असे होते रतन टाटा... ज्या व्यवसायात हात घातला सोनं केलं, १० पॉईंट्समध्ये पाहा त्यांचा प्रवास
19
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: गणपतीसह लक्ष्मी देवीचेही करा पूजन, मंत्राचे जप ठरतील उपयुक्त!
20
शून्य बँक शिल्लक असतानाही होईल UPI पेमेंट? 'भीम ॲप'चं 'हे' खास फीचर जाणून घ्या!

नाफेडची तूर खरेदी अचानक बंद

By admin | Updated: February 4, 2016 02:13 IST

स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरू असलेली नाफेडची तूर खरेदी अचानक बंद करण्यात आली.

आर्वीत अधिकाऱ्यांना घेराव : देवळीत शेतकऱ्यांमध्ये असंतोषआर्वी : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरू असलेली नाफेडची तूर खरेदी अचानक बंद करण्यात आली. परिणामी, शेतकऱ्यांचा माल व्यापारी कमी भावात खरेदी करीत आहे. यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. परिणामी, नाफेडची तूर खरेदी सुरू करण्याच्या मागणीसाठी भाजपाचे बाळा जगताप व शेतकऱ्यांनी नाफेडच्या अधिकाऱ्यांना बुधवारी घेराव केला. तूर खरेदीचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.कृउबासमध्ये नाफेडची तूर खरेदी सुरू होती. यात तुरीला चांगला भाव असल्याने दूरवरून शेतकरी तूर बाजार समितीत घेऊन येत होते; पण गत पाच ते सहा दिवसांपासून नाफेडने अचानक तूर खरेदी बंद केली. परिणामी, शेतकऱ्यांना स्थानिक व्यापाऱ्यांना तूर विकावी लागत आहे. यात व्यापारी अल्प भाव देत असल्याने शेतकऱ्यांचे क्विंटलमागे सुमारे दोन ते तीन हजार रुपयांचे नुकसान होत आहे. कृउबास सभापती पंजाब राठोड व नाफेडचे अधिकारी सिंग यांना शेतकऱ्यांनी घेराव केल्याने एकच खळबळ उडाली. नाफेडची तूर खरेदी बंद का झाली, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित् केला. यावर अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यानंतर शुक्रवारपासून तूर खरेदी करा, अन्यथा आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका जगताप व शेतकऱ्यांनी घेतली. यामुळे सभापती व अधिकाऱ्याची कोंडी झाली होती. संबंधितांनी वरिष्ठांशी चर्चा करून शुक्रवारपासून तूर खरेदी सुरू करू, अशा आशयाचे लेखी पत्र दिले. यामुळे आंदोलन तुर्तास मागे घेण्यात आले. शुक्रवारपासून नाफेडची तूर खरेदी सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी दिला.यावेळी उपसभापती बाळा नांदुरकर, तालुकाध्यक्ष मिलिंद हिवाळे, शहराध्यक्ष विनू डोळे, अजय कट्टमवार, सागर निर्मळ, युवा मोर्चा तालुका प्रमुख राजेंद्र ठाकरे, सुधीर जाचक, अरसलान खान, संजू कुरील, प्रशांत क्षीरसागर, माणिक निमकर, प्रशांत रामटेके, सागर सोनटक्के, राहुल गोठाणे, ज्ञानदेव जगताप, बंडू, वाजीद शेख व शेतकरी उपस्थित होते.(तालुका/शहर प्रतिनिधी)एक हजार प्रती क्विंटल फरकाने शेतकऱ्यांची लूटदेवळी : स्थानिक बाजार समितीमध्ये नाफेडने तूर खरेदी सुरू केली. यानंतर एकाच दिवसात या केंद्रावरून काढता पाय घेतला. यामुळे तुरीची आवक मंदावली. अन्य मार्केटच्या तुलनेत प्रती क्विंटल एक हजार रुपये फरकाने तुरीची खरेदी होत असल्याने शेतकरी संतप्त आहे. खासगी व्यापाऱ्यांशी संगनमत करून येथील खरेदी नाफेडने बंद केल्याचा आरोप होत आहे. येथे २२ जानेवारी रोजी नाफेडच्या खरेदीचा शुभारंभ झाला. या दिवशी ११० पोत्यांची आवक होती. प्रती क्विंटल ७९०० ते ८६२५ दराने केवळ २४ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली. दुसऱ्याच दिवसापासून खरेदी बंद करण्यात आली. यामुळे खासगी व्यापाऱ्यांची मनमानी सुरू आहे. कमी भाव देत शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. तुरीची आवक ४० क्विंटलपर्यंत घसरली. हिंगणघाट येथे ८,३०० रुपये भाव असताना येथे ६,८०० ते ७,३७५ रुपये भाव देत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जात आहे. १५० ते २०० पोत्यांच्या घरात आवक नसल्याने खरेदी बंद केल्याचे नाफेडद्वारे सांगण्यात आले. शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे शासनाचे धोरण असल्याने येथे नाफेडची तूर खरेदी सुरू झाली; पण आवक नसल्याचे सांगून ती बंद केली. यामुळे हे सोंग कशासाठी, अशी संतप्त प्रतिक्रीया उमटत आहे. व्यापाऱ्यांना लाभ देण्यासाठी नाफेडच्या अधिकाऱ्यांचा हा डाव असल्याचा आरोपही होत आहे. सभापती मनोहर खडसे व पदाधिकाऱ्यांनी चौकशी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.(प्रतिनिधी)