शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

नाफेडची तूर खरेदी अचानक बंद

By admin | Updated: February 4, 2016 02:13 IST

स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरू असलेली नाफेडची तूर खरेदी अचानक बंद करण्यात आली.

आर्वीत अधिकाऱ्यांना घेराव : देवळीत शेतकऱ्यांमध्ये असंतोषआर्वी : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरू असलेली नाफेडची तूर खरेदी अचानक बंद करण्यात आली. परिणामी, शेतकऱ्यांचा माल व्यापारी कमी भावात खरेदी करीत आहे. यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. परिणामी, नाफेडची तूर खरेदी सुरू करण्याच्या मागणीसाठी भाजपाचे बाळा जगताप व शेतकऱ्यांनी नाफेडच्या अधिकाऱ्यांना बुधवारी घेराव केला. तूर खरेदीचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.कृउबासमध्ये नाफेडची तूर खरेदी सुरू होती. यात तुरीला चांगला भाव असल्याने दूरवरून शेतकरी तूर बाजार समितीत घेऊन येत होते; पण गत पाच ते सहा दिवसांपासून नाफेडने अचानक तूर खरेदी बंद केली. परिणामी, शेतकऱ्यांना स्थानिक व्यापाऱ्यांना तूर विकावी लागत आहे. यात व्यापारी अल्प भाव देत असल्याने शेतकऱ्यांचे क्विंटलमागे सुमारे दोन ते तीन हजार रुपयांचे नुकसान होत आहे. कृउबास सभापती पंजाब राठोड व नाफेडचे अधिकारी सिंग यांना शेतकऱ्यांनी घेराव केल्याने एकच खळबळ उडाली. नाफेडची तूर खरेदी बंद का झाली, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित् केला. यावर अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यानंतर शुक्रवारपासून तूर खरेदी करा, अन्यथा आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका जगताप व शेतकऱ्यांनी घेतली. यामुळे सभापती व अधिकाऱ्याची कोंडी झाली होती. संबंधितांनी वरिष्ठांशी चर्चा करून शुक्रवारपासून तूर खरेदी सुरू करू, अशा आशयाचे लेखी पत्र दिले. यामुळे आंदोलन तुर्तास मागे घेण्यात आले. शुक्रवारपासून नाफेडची तूर खरेदी सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी दिला.यावेळी उपसभापती बाळा नांदुरकर, तालुकाध्यक्ष मिलिंद हिवाळे, शहराध्यक्ष विनू डोळे, अजय कट्टमवार, सागर निर्मळ, युवा मोर्चा तालुका प्रमुख राजेंद्र ठाकरे, सुधीर जाचक, अरसलान खान, संजू कुरील, प्रशांत क्षीरसागर, माणिक निमकर, प्रशांत रामटेके, सागर सोनटक्के, राहुल गोठाणे, ज्ञानदेव जगताप, बंडू, वाजीद शेख व शेतकरी उपस्थित होते.(तालुका/शहर प्रतिनिधी)एक हजार प्रती क्विंटल फरकाने शेतकऱ्यांची लूटदेवळी : स्थानिक बाजार समितीमध्ये नाफेडने तूर खरेदी सुरू केली. यानंतर एकाच दिवसात या केंद्रावरून काढता पाय घेतला. यामुळे तुरीची आवक मंदावली. अन्य मार्केटच्या तुलनेत प्रती क्विंटल एक हजार रुपये फरकाने तुरीची खरेदी होत असल्याने शेतकरी संतप्त आहे. खासगी व्यापाऱ्यांशी संगनमत करून येथील खरेदी नाफेडने बंद केल्याचा आरोप होत आहे. येथे २२ जानेवारी रोजी नाफेडच्या खरेदीचा शुभारंभ झाला. या दिवशी ११० पोत्यांची आवक होती. प्रती क्विंटल ७९०० ते ८६२५ दराने केवळ २४ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली. दुसऱ्याच दिवसापासून खरेदी बंद करण्यात आली. यामुळे खासगी व्यापाऱ्यांची मनमानी सुरू आहे. कमी भाव देत शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. तुरीची आवक ४० क्विंटलपर्यंत घसरली. हिंगणघाट येथे ८,३०० रुपये भाव असताना येथे ६,८०० ते ७,३७५ रुपये भाव देत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जात आहे. १५० ते २०० पोत्यांच्या घरात आवक नसल्याने खरेदी बंद केल्याचे नाफेडद्वारे सांगण्यात आले. शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे शासनाचे धोरण असल्याने येथे नाफेडची तूर खरेदी सुरू झाली; पण आवक नसल्याचे सांगून ती बंद केली. यामुळे हे सोंग कशासाठी, अशी संतप्त प्रतिक्रीया उमटत आहे. व्यापाऱ्यांना लाभ देण्यासाठी नाफेडच्या अधिकाऱ्यांचा हा डाव असल्याचा आरोपही होत आहे. सभापती मनोहर खडसे व पदाधिकाऱ्यांनी चौकशी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.(प्रतिनिधी)