शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
2
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
3
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
4
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
5
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
6
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
7
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
8
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
9
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
10
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
11
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
12
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
13
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
14
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
15
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
16
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
17
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
18
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
19
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
20
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 

नाफेडची तूर खरेदी अचानक बंद

By admin | Updated: February 4, 2016 02:13 IST

स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरू असलेली नाफेडची तूर खरेदी अचानक बंद करण्यात आली.

आर्वीत अधिकाऱ्यांना घेराव : देवळीत शेतकऱ्यांमध्ये असंतोषआर्वी : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरू असलेली नाफेडची तूर खरेदी अचानक बंद करण्यात आली. परिणामी, शेतकऱ्यांचा माल व्यापारी कमी भावात खरेदी करीत आहे. यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. परिणामी, नाफेडची तूर खरेदी सुरू करण्याच्या मागणीसाठी भाजपाचे बाळा जगताप व शेतकऱ्यांनी नाफेडच्या अधिकाऱ्यांना बुधवारी घेराव केला. तूर खरेदीचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.कृउबासमध्ये नाफेडची तूर खरेदी सुरू होती. यात तुरीला चांगला भाव असल्याने दूरवरून शेतकरी तूर बाजार समितीत घेऊन येत होते; पण गत पाच ते सहा दिवसांपासून नाफेडने अचानक तूर खरेदी बंद केली. परिणामी, शेतकऱ्यांना स्थानिक व्यापाऱ्यांना तूर विकावी लागत आहे. यात व्यापारी अल्प भाव देत असल्याने शेतकऱ्यांचे क्विंटलमागे सुमारे दोन ते तीन हजार रुपयांचे नुकसान होत आहे. कृउबास सभापती पंजाब राठोड व नाफेडचे अधिकारी सिंग यांना शेतकऱ्यांनी घेराव केल्याने एकच खळबळ उडाली. नाफेडची तूर खरेदी बंद का झाली, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित् केला. यावर अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यानंतर शुक्रवारपासून तूर खरेदी करा, अन्यथा आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका जगताप व शेतकऱ्यांनी घेतली. यामुळे सभापती व अधिकाऱ्याची कोंडी झाली होती. संबंधितांनी वरिष्ठांशी चर्चा करून शुक्रवारपासून तूर खरेदी सुरू करू, अशा आशयाचे लेखी पत्र दिले. यामुळे आंदोलन तुर्तास मागे घेण्यात आले. शुक्रवारपासून नाफेडची तूर खरेदी सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी दिला.यावेळी उपसभापती बाळा नांदुरकर, तालुकाध्यक्ष मिलिंद हिवाळे, शहराध्यक्ष विनू डोळे, अजय कट्टमवार, सागर निर्मळ, युवा मोर्चा तालुका प्रमुख राजेंद्र ठाकरे, सुधीर जाचक, अरसलान खान, संजू कुरील, प्रशांत क्षीरसागर, माणिक निमकर, प्रशांत रामटेके, सागर सोनटक्के, राहुल गोठाणे, ज्ञानदेव जगताप, बंडू, वाजीद शेख व शेतकरी उपस्थित होते.(तालुका/शहर प्रतिनिधी)एक हजार प्रती क्विंटल फरकाने शेतकऱ्यांची लूटदेवळी : स्थानिक बाजार समितीमध्ये नाफेडने तूर खरेदी सुरू केली. यानंतर एकाच दिवसात या केंद्रावरून काढता पाय घेतला. यामुळे तुरीची आवक मंदावली. अन्य मार्केटच्या तुलनेत प्रती क्विंटल एक हजार रुपये फरकाने तुरीची खरेदी होत असल्याने शेतकरी संतप्त आहे. खासगी व्यापाऱ्यांशी संगनमत करून येथील खरेदी नाफेडने बंद केल्याचा आरोप होत आहे. येथे २२ जानेवारी रोजी नाफेडच्या खरेदीचा शुभारंभ झाला. या दिवशी ११० पोत्यांची आवक होती. प्रती क्विंटल ७९०० ते ८६२५ दराने केवळ २४ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली. दुसऱ्याच दिवसापासून खरेदी बंद करण्यात आली. यामुळे खासगी व्यापाऱ्यांची मनमानी सुरू आहे. कमी भाव देत शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. तुरीची आवक ४० क्विंटलपर्यंत घसरली. हिंगणघाट येथे ८,३०० रुपये भाव असताना येथे ६,८०० ते ७,३७५ रुपये भाव देत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जात आहे. १५० ते २०० पोत्यांच्या घरात आवक नसल्याने खरेदी बंद केल्याचे नाफेडद्वारे सांगण्यात आले. शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे शासनाचे धोरण असल्याने येथे नाफेडची तूर खरेदी सुरू झाली; पण आवक नसल्याचे सांगून ती बंद केली. यामुळे हे सोंग कशासाठी, अशी संतप्त प्रतिक्रीया उमटत आहे. व्यापाऱ्यांना लाभ देण्यासाठी नाफेडच्या अधिकाऱ्यांचा हा डाव असल्याचा आरोपही होत आहे. सभापती मनोहर खडसे व पदाधिकाऱ्यांनी चौकशी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.(प्रतिनिधी)