शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय खरेदीला मुहूर्तच साधेना

By admin | Updated: October 18, 2015 02:22 IST

साधारणत: कापूस खरेदीकरिता दसऱ्याचा मुहूर्त साधण्यात येतो. कापूस उत्पादकांचा कापूस निघणे सुरू झाले आहे.

पणन महासंघाला आदेशाची प्रतीक्षा : खासगीत ४,२०० रुपयांचा दर रूपेश खैरी वर्धासाधारणत: कापूस खरेदीकरिता दसऱ्याचा मुहूर्त साधण्यात येतो. कापूस उत्पादकांचा कापूस निघणे सुरू झाले आहे. याची माहिती मिळताच खासगी व्यापाऱ्यांनी खरेदी सुरू केली. शासकीय खरेदीसंदर्भात मात्र अद्याप कुठल्याही सूचना पणन महासंघाकडून येथील शाखेत आल्या नाहीत. खरेदीसंदर्भात निर्णय घेणारे अध्यक्ष व संचालक विदेश वारीवर असल्याने यंदा दसऱ्याचा मुहूर्त टळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खरेदीसंदर्भात उदासिनता व दरासंदर्भातील राजकारण कायम असल्याने कापूस उत्पादकांची कोंडी यंदाही होणार असल्याचे दिसते. कृषी मूल्य आयोगाची ६ हजार ५०० रुपयांची शिफारस झुगारत राज्य शासनाकडून ४ हजार १०० रुपये हमीभाव जाहीर झाला आहे. गत वर्षीच्या तुलनेत झालेली ही वाढ केवळ ५० रुपयांची ठरली. २०१४ च्या हंगामात कापसाला ४ हजार ५० रुपये हमीभाव जाहीर झाला होता. यामुळे दरवाढीसंदर्भातील मुस्कटदाबी सत्ताधारी बदलले तरी तशीच आहे. सोयाबीन हातचे गेल्यानंतर शेतकऱ्यांना कपाशीकडून अपेक्षा होती. मात्र नेहमीप्रमाणे तीही धुळीस मिळणार असल्याचे दिसत आहे. सत्ताधारी विरोधात असताना कापसाला ७ हजार रुपये दर देण्याची मागणी करीत होते. त्यांच्याकडून कृषी मूल्य आयोगाची शिफारस योग्य होती. आता त्यांच्याकडूनही कृषीमूल्य आयोगाची ६ हजार ५०० रुपयांची शिफारस फेटाळत ४ हजार १०० रुपये दर जाहीर करण्यात आला आहे. संचालक व अध्यक्ष विदेशवारीवरशेतकऱ्यांचा कापूस शेतातून निघण्याची वेळ आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना निदान हमीभाव मिळावा अशी अपेक्षा आहे. त्यांची ही अपेक्षा पूर्ण होण्याकरिता पणन महासंघाची किंवा सीसीआयची खरेदी सुरू होणे अपेक्षित आहे. या खरेदीचा निर्णय घेणारे पणन महासंघाचे अध्यक्ष तथा संचालक विदेश वारीवर गेल्यास सूत्रांनी सांगितले. यामुळे कापूस खरेदी संदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. यामुळे ती केव्हा सुरू होईल या बाबत संभ्रम निर्माण झाला आहे. शासकीय खरेदी नसल्याने शेतकऱ्यांना त्यांचा कापूस खासगी व्यापाऱ्यांना विकण्याची वेळ आली आहे. एकरी २० हजारांचा होतो खर्चकापूस केवळ खरीपच नाही तर रबी हंगामाचे पीक म्हणूनही ओळखले जाते. पेरणीपूर्व मशागत, बियाणे व खते, पेरणीचा खर्च, निंदन, डवरणी, फवारणी व वेचाई करून कापूस शेतकऱ्यांच्या घरापर्यंत येतो. येथून नंतर बाजारपेठेचा प्रवास. याचा एकंदर उत्पादन खर्च हा ओलिताच्या क्षेत्रात एकरी २० हजारांवर जात आहे. कापूस खरेदी केंद्र केव्हा उघडणारकापसाची वेचाई सुरू झालेली आहे. पणन महासंघाचे व सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र सुरू झालेले नाही. येत्या महिन्यात ही केंद्र सुरू होणार किंवा नाही या बाबतही साशंकता आहे. सण, उत्सव व दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आर्थिक अडचणीत खासगी व्यापाऱ्यांना कापूस विकत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.