शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

३१.९४ लाख क्विंटल कापसाची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 05:00 IST

खरीप हंगाम २०१९-२० या कालावधीत वर्धा जिल्ह्यात नेमक्या किती कापसाचे उत्पादन होईल याबाबतचा कृषी विभागाचा यंदा अंदाज चुकला. त्यातच कोरोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे काही दिवस कापूस खरेदी केंद्रही बंद होते. परंतु, नंतर शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेऊन लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यावर कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. शिवाय जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी वेळोवेळी कापूस खरेदी केंद्र गाठून तेथील व्यवस्थेची माहिती जाणून घेतली.

ठळक मुद्देनागपूर, अमरावती, यवतमाळातील शेतकऱ्यांच्या कापसाची आवक सुरू

महेश सायखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लॉकडाऊन मध्ये शिथिलता मिळाल्यानंतर राबविण्यात आलेल्या विशेष मोहीमेत टोकण धारक अनेक शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांना कापूस विक्री केल्याचे पुढे आले आहे. तर आतापर्यंत टोकण धारकांसह इतर १ लाख ७३ हजार ७१९ शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील एकूण ३१.९४ लाख क्विंटल कापूस सीसीआय आणि कापूस पणन महासंघ तसेच कृषी उत्पन्न बाजार समितींना विकल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. सध्यास्थितीत वर्धा जिल्ह्याच्या शेजारील तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कापूस वर्धा जिल्ह्यातील सीसीआय आणि कापूस पणन महासंघाच्या केंद्रांवर खरेदी केला जात आहे.खरीप हंगाम २०१९-२० या कालावधीत वर्धा जिल्ह्यात नेमक्या किती कापसाचे उत्पादन होईल याबाबतचा कृषी विभागाचा यंदा अंदाज चुकला. त्यातच कोरोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे काही दिवस कापूस खरेदी केंद्रही बंद होते. परंतु, नंतर शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेऊन लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यावर कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. शिवाय जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी वेळोवेळी कापूस खरेदी केंद्र गाठून तेथील व्यवस्थेची माहिती जाणून घेतली. तसेच संबंधितांना सूचना केल्या. परिणामी, अवघ्या काही दिवसांत शेतकऱ्यांच्या घरातील कापूस खरेदी केंद्रांपर्यंत पोहोचून त्याची विक्री झाली आहे. जिल्ह्यातील १ लाख ७३ हजार ७१९ शेतकऱ्यांचा ३१ लाख ९४ हजार ८६६.७० क्विंटल कापूस आतापर्यंत खरेदी करण्यात आला आहे. जिल्ह्यात सीसीआची खरेदी अंतिम टप्प्यात आहे.१२,६४३ शेतकऱ्यांचा कापूस खासगी व्यापाऱ्यांच्या घशातसीसीआय व कापूस पणन महासंघाकडे कापूस विक्रीसाठी तब्बल ५० हजार १३४ शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीचा वापर करून नोंदणी केली होती; पण लॉकडाऊननंतरही अनेक शेतकऱ्यांच्या घरी कापूस शिल्लक असल्याची ओरड झाल्याने अचूक माहिती घेण्यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्यावतीने विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान टोकण धारक तब्बल १२ हजार ६४३ शेतकऱ्यांनी त्यांचा कापूस खासगी व्यापाऱ्यांना विकल्याची बाब पुढे आल्याने त्यांचे टोकण रद्द करण्यात आले आहे. यावर्षी व्यापाऱ्यांचा कापसाचा भाव २ हजार ८०० ते ४ हजार ३०० होता. त्यामुळे अनेकांनी सीसीआयलाच कापूस देणे पसंत केले.पणनचे दोन तर सीसीआयचे दहा केंद्रकापूस पणन महासंघाच्या दोन तर सीसीआयच्या दहा केंद्रांवर कापूस खरेदी केला जात आहे. २,४५२ शेतकरी शिल्लक असून जिल्ह्यातील नोंदणीकृत शेतकऱ्यांनी कापूस विकल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. शिल्लक असलेल्या २ हजार ४५२ शेतकऱ्यांपैकी काहींनी खासगी व्यापाऱ्यांना कापूस विकल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.बाहेर जिल्ह्यातील ७३९ शेतकऱ्यांचा खरेदी होतोय कापूसअमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कापूस सीसीआयच्या पुलगाव आणि देवळी येथील केंद्रांवर तर नागपूर जिल्ह्यातील हिंगणा येथील शेतकऱ्यांचा कापूस सेलू येथील केंद्रावर सध्या खरेदी केला जात आहे. अमरावती जिल्ह्यातील २५५, यवतमाळ जिल्ह्यातील ३२९ तर नागपूर जिल्ह्यातील १५५ शेतकऱ्यांचा कापूस खरेदी होणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :cottonकापूस