शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

पावसामुळे पुलगावचा गांधी चौक चिखलमय

By admin | Updated: June 18, 2017 00:37 IST

पुलगाव शहरातील अनेक रस्त्यांची, नाल्यांची कामे करण्यात आली. सुशोभिकरणासाठी रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात

नगर पालिकेचे दुर्लक्ष : संपूर्ण चौकच खड्ड्यात गेल्याचा भास, उपाययोजनांची गरज लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा/पुलगाव : पुलगाव शहरातील अनेक रस्त्यांची, नाल्यांची कामे करण्यात आली. सुशोभिकरणासाठी रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात ‘चेकर्स’ लावण्यात आलेत; पण शहरातील मुख्य चौक असलेल्या गांधी चौकाचा उद्धार करण्यात आला नाही. सर्व रस्ते उंच आणि गांधी चौक खड्ड्यात, अशी स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, चौकात पाऊस येताच चिखलाचे साम्राज्य असते. शुक्रवारी आलेल्या पावसामुळे गांधी चौकात चिखल, डबक्यांचे साम्राज्य पाहावयास मिळाले. आठ रस्ते मिळणारा शहरातील एकमेव चौक म्हणूण गांधी चौकाची ओळख आहे. पूर्वी या चौकात मघ्यभागी महात्मा गांधींचा पुतळा आणि आठही रस्त्यांवर दुकाने होती. कालांतराने पालिका प्रशासनाने या मुख्य चौकात उद्यान निर्माण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार उद्यानाची निर्मिती करण्यात आली; पण यात कुठेही नियोजन दिसून आले नाही. मध्यभागी उद्यानाची निर्मिती करून सभोवताल गाळे काढता आले असते; पण तसे झाले नाही. परिणामी, उद्यानाच्या सभोवताल अतिक्रमण वाढले आहे. शहरातील मुख्य चौक असल्याने कापडाच्या दुकानांसह भाजीपाला व अन्य वस्तूंची दुकानेही येथे आहेत. पालिकेने या जागेचे योग्य नियोजन करून उद्यान, दुकान गाळे काढून रस्ते, नाल्यांची निर्मिती केली असती तर शहराचे सौंदर्य खुलले असते; पण सध्या गांधी चौक खड्ड्यांत असल्याचा भास होतो. गांधी चौकाला मिळणारे तीन रस्ते सोडले तर उर्वरित रस्त्यांचे सिमेंटीकरण करण्यात आले आहे. यामुळे पाच रस्ते उंच झाले असून त्या रस्त्याचे पाणी गांधी चौकात येते. शिवाय गांधी चौकातील एकाही रस्त्याचे सिमेंटीकरण करण्यात आले नाही. शिवाय सिमेंट चबुतराही बांधण्यात आला नाही. परिणामी, गांधी चौकाला पाऊस येताच डबक्याचे स्वरूप प्राप्त होते. शुक्रवारी दुपारी व सायंकाळी आलेल्या पावसामुळे गांधी चौकात सर्वत्र डबके साचले आहेत. चिखलामुळे नागरिकांना चालणेही कठीण झाले आहे. गांधी चौकातील प्रत्येक दुकानासमोर डबके व चिखल साचल्याने व्यवस्थित उभेही राहता येत नाही. शिवाय भाजीविके्रते तसेच अन्य व्यावसायिकांना आपली दुकाने लावतानाही त्रास सहन करावा लागत आहे. डबके, चिखलाचे साम्राज्य आणि गुरांचा संचार यामुळे हा चौक शहराचेच विद्रुपिकरण करीत असल्याचा भास होतो. नगर पालिका प्रशासनाने याकडे लक्ष देत गांधी चौकाचे योग्य नियोजन करून सुशोभिकरण करावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. प्रकाश व्यवस्थाही तोकडीच शहराचा मुख्य चौक असलेल्या गांधी चौकात उद्यानामध्ये हायमास्ट लाईट लावणे गरजेचे होते; पण तसे झाले नाही. शहरात अनेक ठिकाणी हायमास्ट लावण्यात आले; पण गांधी चौकातील प्रकाश व्यवस्थेकडे कुणीही लक्ष दिल्याचे दिसत नाही. परिणामी, उद्यान व परिसरात अंधुक प्रकाश असतो. पथदिव्यांचीही व्यवस्था तोकडीच असल्याने नागरिक, व्यावसायिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नव्याने सत्तेत आलेली भाजपा शहरातील गांधी चौकाच्या विकासासाठी प्रस्ताव पाठविणार असल्याचे सांगण्यात येत आहे. गांधी चौकातील बालोद्यान हटवून दुकान गाळे होणार, अशी चर्चा होती; पण अद्याप हालचाली नाहीत. किंबहुना, उद्यान हटविण्यासही विरोध असल्याचे बोलले जाते. यातून मार्ग काढण्यासाठी पालिकेला उद्यानामध्ये सुधारणा करून सभोवताल दुकान गाळे काढता येऊ शकतात. तत्पूर्वी संपूर्ण परिसरात सिमेंटचा उंच चबुतरा निर्माण करणे व त्यानंतर विकास कामे करणे गरजेचे आहे. या दृष्टीने पालिका प्रशासन पावले उचलणार काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.