शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

भौगोलिक सुविधा असतानाही सहा दशकांपासून पुलगाव उपेक्षित

By admin | Updated: May 31, 2014 23:40 IST

जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाचे व कामगारांचे शहर म्हणून ओळखल्या जाणार्‍या पुलगाव शहर व परिसराच्या विकासाच्या दृष्टीने पाहिजे तशी ठोस पावले उचलल्या गेली नाहीत. त्यामुळे सर्व भौगोलिक सुविधा उपलब्ध

प्रभाकर शहाकार - पुलगावजिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाचे व कामगारांचे शहर म्हणून ओळखल्या जाणार्‍या पुलगाव शहर व परिसराच्या विकासाच्या दृष्टीने पाहिजे तशी ठोस पावले उचलल्या गेली नाहीत. त्यामुळे सर्व भौगोलिक सुविधा उपलब्ध असतानाही मागील सहा दशकात हा परिसर विकासाच्या दृष्टीने उपेक्षितच राहिला आहे. नव्या नेत्यांकडून तरी या शहराच्या विकासाकरिता कार्य केले जात काय, याकडे सर्वांचे लक्ष आहे. हा परिसर म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसचा बालेकिल्ला; परंतु गत कित्येक वर्षांपासून या क्षेत्रातील राजकारण म्हणजे राजकीय आखाडा झाला. या आखाड्यातील राजकीय नेत्यांच्या कुस्त्या पाहून टाळ्या वाजविण्याच्या पलिकडे या क्षेत्रातील कार्यकर्ते व मतदारही काहीच करू शकले नाही. या राजकीय कुस्त्याच्या राजकारणात शहर व परिसराकडे सार्‍यांचेच दुर्लक्ष झाले. राज्यातच नव्हे तर देशाच्या राजकारणात महत्वाचे स्थान मिळविणारे सक्षम नेतृत्व या क्षेत्राने दिले आहे. आमदार, खासदार नव्हे तर सत्तेत सहभागी असणारे मंत्रीही दिले; परंतु शहराच्या विकासाकडे मात्र सर्वच जनप्रतिनिधींनी पाठ फिरविली. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश राजवटीत १८८९ साली पुलगाव कॉटन मिल व १९४२ साली स्थापन झालेला केंद्रीय दारूगोळा भंडार जर सोडले तर या भागात सहा दशकात कुठलाही दुसरा मोठा उद्योग येऊ  शकला नाही.मुंबई-कलकत्ता या रेल्वे मार्गावर असणारे कवठा हे गाव इंग्रज राजवटीत जिल्ह्याचे मुख्यालय होते. या गावालगतच बारामाही वाहणारी वरदा (वर्धा) नदी आहे. परिसरातील भौगोलिक परिस्थिती पाहून इंग्रज शासनाने १८६५ साली या नदीवर रेल्वे पुलांची निर्मिती करीत या गावाला ‘ब्रीज टाऊन’ पुलगाव हे नाव दिले.पुढे येथील भोगोलिक परिस्थिती व दळणवळणाची व्यवस्था पाहून १८८९ साली नागपूरच्या बुटी परिवारानी येथे कापड गिरणी सुरू करून विकासाची मुहूर्तपेठ केली. पुढे हा उद्योग भरभराटीस येऊन ३५00 कामगारांना रोजगार मिळाला व गावाचे शहरात रूपांतर झाले. तेव्हापासून शहर आहे त्याच स्थितीत आहे. या शहराचे महत्त्व व उपलब्ध असलेली भौगोलिक परिस्थिती इंग्रजांना कळली व त्यांनी १९४२ साली या शहरात संरक्षण विभागाचा देशातील सर्वात मोठय़ा दारूगोळा भांडाराची स्थापना केली. यातून शहराच्या विकासाला काही प्रमाणात दिशी मिळाली. शहराचा विकास व्हावा म्हणून पुलगाव ते आर्वी           नॅरोगेज रेल्वे सुरू केली. आज या शहरातून नागपूर-मुंबई द्रुतगती मार्ग, हैदराबाद-भोपाळ मार्ग सुरू असताना ही पुलगाव कॉटन मील हा मोठा उद्योग, पुलगाव-आर्वी रेल्वे मार्ग बंद करण्यात आला.या शहरालगत असलेल्या विशाल जागेवर औद्योगिक वसाहत स्थापन व्हावी असा प्रयत्नही करण्यात आला; परंतु नेत्यांच्या उदासीन धोरणामुळे हेही होऊ शकले नाही. म्हणून की काय? नुकत्याच आलेल्या सत्ता परिवर्तनाच्या लाटेतून एखादा भगिरथ निर्माण होऊन या शहराच्या विकास करील, या प्रतीक्षेत शहर व परिसरातील सर्वसामान्य आहेत.