शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

40 झोपड्यांवर सार्वजनिक बांधकाम विभागानं चालवला हातोडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2018 15:36 IST

बजाज चौकातील आचार्य विनोबा भावे उड्डाण पुलाच्या रुंदीकरणाचे काम जिल्हा प्रशासनाने हाती घेतले आहे. या रुंदीकरणाच्या कामात अतिक्रमण करून राहत असलेल्या सुमारे ४० कुटुंबीयांच्या झोपड्या अडथळा निर्माण करीत असल्याचे कारण पुढे करीत बुधवारी सा. बां. विभागाने विशेष अतिक्रमण हटाव मोहीम राबवून काही झोपड्या पाडल्या.

वर्धा : येथील बजाज चौकातील आचार्य विनोबा भावे उड्डाणपुलाच्या रुंदीकरणाचे काम जिल्हा प्रशासनाने हाती घेतले आहे. या रुंदीकरणाच्या कामात अतिक्रमण करून राहत असलेल्या सुमारे ४० कुटुंबीयांच्या झोपड्या अडथळा निर्माण करीत असल्याचे कारण पुढे करीत बुधवारी सा. बां. विभागाने विशेष अतिक्रमण हटाव मोहीम राबवून काही झोपड्या पाडल्या. अतिक्रमण धारकांनी स्वत:च आपले अतिक्रमण काढावे, अशी नोटीस यापूर्वी सा. बां. विभागाच्या वतीने सदर झोपडी मालकांना बजावला होता. पण त्याकडे दुर्लक्ष केल्याने ही मोहीम राबविण्यात आल्याचे सांगण्यात आले.सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता महेश मोकलकर यांच्या नेतृत्वात सा. बां. विभागाची चमू जेसीबीसह बजाज चौक भागातील आचार्य विनोबा भावे उड्डाण पूल परिसरात बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास पोहोचले. सुरुवातीला अतिक्रमण धारक नागरिकांकडून पहिले राहण्यासाठी जागा द्या नंतरच अतिक्रमण काढा, अशी विनंती करण्यात आली. त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांनी तुम्हाला न. प. ने स्मशानभूमी परिसरात जागा उपलब्ध करून दिली आहे. तेथे तुम्ही राहण्यासाठी जावे, असे सांगितले. त्यानंतर तणावपूर्ण शांततेत पोलीस बंदोबस्तात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांनी अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू केली. दुपारी २ वाजेपर्यंत अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या सुमारे २५ झोपड्या सा. बां. विभागाच्या अधिका-यांनी जेसीबीच्या सहाय्याने पाडल्या. दरम्यान जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यामुळे ही कारवाई दुपारी २ वाजताच्या सुमारास थांबविण्यात आली.संसार आला उघड्यावरअतिक्रमण हटाव मोहीम राबवित असताना सदर परिसरातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. पोलीस बंदोबस्तात सा.बां.वि.च्या अधिका-यांसह कर्मचा-यांनी जेसीबीच्या सहाय्याने दुपारी २ वाजेपर्यंत सुमारे २५ झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या. या प्रकारामुळे सदर २५ जणांचे कुटुंब उघड्यावर आले आहे. आचार्य विनोबा भावे उड्डणपूल परिसरात अतिक्रमण करून राहणा-यांना तात्काळ पक्के घरे बांधून देण्यात यावी, अशी मागणी अतिक्रमण धारकांची आहे.पाच दिवसात अतिक्रमण न काढल्यास पुन्हा राबविणार मोहीमजिल्हाधिका-यांच्या सूचनेवरून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांनी अतिक्रमण हटाव मोहीम थांबविली आहे. येत्या पाच दिवसांत अतिक्रमण धारकांनी स्वत:च अतिक्रमण न काढल्यास पाच दिवसानंतर सा.बां.विभागाच्या वतीने पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. अतिक्रमण मोहिमेदरम्यान आचार्य विनोबा भावे उड्डाणपूल परिसरात बघ्यांची एकच गर्दी झाली होती.जिल्हाधिका-यांच्या सूचनेवरून थांबली अतिक्रमण हटाव मोहीमअतिक्रमण हटाव मोहीम सुरू असताना अतिक्रमण धारकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी जिल्हाधिकारी व अतिक्रमण धारक यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. चर्चेअंती येत्या पाच दिवसांत अतिक्रमण धारकांनी स्वत:च अतिक्रमण काढावे यावर अतिक्रमण धारकांनी होकार दर्शविल्याने जिल्हाधिका-यांच्या सूचनेवरून बुधवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास अतिक्रमण हटाव मोहीम थांबविण्यात आली.स्मशानभूमी भागातील जागा पंतप्रधान आवास योजनेसाठीसार्वजनिक बांधकाम विभागाच्या विनंतीला मान देत स्मशानभूमी परिसरातील जागा अतिक्रमण धारकांना देण्यासाठी न.प.ने मौखिक होकार दर्शविला आहे. सदर जागेवर पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना पक्क घर बांधून देण्यासाठी न.प.ने ठराव घेतला असल्याचे न.प.तील एका अधिका-याने सांगितले.