शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
4
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
5
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
6
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
7
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
8
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
9
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
10
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
11
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
12
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
13
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
14
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
15
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
18
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
19
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
20
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...

पथनाट्याद्वारे शेतकरी अन्यायावर जनजागृती

By admin | Updated: February 22, 2016 02:26 IST

सेलू येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कापूस व्यापारी सुनील टालाटुले याने शेकडो शेतकऱ्यांना कापूस खरेदी करुन गंडविले.

विद्यार्थ्यांचा सहभाग : शासनाचा निषेधवर्धा : सेलू येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कापूस व्यापारी सुनील टालाटुले याने शेकडो शेतकऱ्यांना कापूस खरेदी करुन गंडविले. मे २०१४ मध्ये २० हजार क्विंटल कापसाची खरेदी करून त्याचे पैसे न देता दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना आठ कोटी रूपयांनी गंडविले. या शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी किसान अधिकार अभियान आणि महात्मा गांधी हिंदी विद्यापीठातील विद्यार्थ्यांद्वारे शहरातील चौकाचौकात पथनाट्य, गीत व भाषणांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. सामान्यांना ही फसवेगिरी माहिती व्हावी यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून शहरातील शिवाजी चौक येथे जनजागरण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी किसान अधिकार अभियानचे अविनाश काकडे म्हणाले शेतकरी हितासाठीचा संघर्ष आपल्याला अधिक गतिमान करावा लागणार आहे. शेतकऱ्यांना आठ कोटींनी गंदवूनही सुनील टालाटुले हा समाजात राजरोसपणे फिरत आहे. राज्यशासन शेतकऱ्यांना कोणतीही मदत करण्याऐवजी शेतकऱ्यांचे घामाचे, हक्काचे पैसे ज्याने लुबाडले त्यालाच संरक्षण देत आहे. ही शेतकरी कष्टकरी, बहुजन समाजासाठी अत्यंत खेदजनक बाब असून राज्यशासनाचा जाहीर निषेध करीत असल्याचे काकडे यांनी भाषणात सांगितले.यावेळी सत्यशोधक महिला प्रबोधिनीच्या प्रा. नूतन माळवी म्हणाल्या, व्यापारी सुनील टालाटुले सारखे जातिवादी व्यापारी आपल्या देशात अजूनही आहेत ही दुर्दैैवाची बाब आहे. आर.एस.एस. व भाजपा सरकारच्या माध्यमातून विद्यार्थी, मजूर व शेतकरी यांच्यावर होणाऱ्या शोषणाची माहिती जनतेपर्यंत पोहचवण्याचे काम आम्ही करीत असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी प्रबोधनपर गाणी सादर करीत शेतकऱ्यांच्या हक्कावर जनजागृती केली. संयोजक रामायण पटेल, डॉ. नीरज, राकेश चिली, संदीप भगत, आरती दिवाकर यांनीही विचार व्यक्त केले. या कार्यक्रमात कपिल गोडघाटे, डिसेंट शाहू, सौरभ, श्रीनारायण, धिरज, मंगेश शेंडे, मयूर राऊत, पंकज सत्यकार यांचा सहभाग होता.(शहर प्रतिनिधी)