शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

सायबर गुन्ह्याविषयी जनजागृती अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 00:00 IST

सायबर गुन्ह्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्याबाबत विद्यार्थ्यांसह नागरिकांना पुरेपूर माहिती देण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयातील हॉलमध्ये गुरूवारी विशेष मार्गदर्शनात्मक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आय. सी. आय.सी.आय. बँक.....

ठळक मुद्देसायबर गुन्ह्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून.....

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सायबर गुन्ह्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्याबाबत विद्यार्थ्यांसह नागरिकांना पुरेपूर माहिती देण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयातील हॉलमध्ये गुरूवारी विशेष मार्गदर्शनात्मक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आय. सी. आय.सी.आय. बँक नागपूरचे व्यवस्थापक कमलेश वालदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.इंटरनेट क्रांती ही आजवरीची सर्वात मोठी क्रांती मानली जाते. इंटरनेटने सर्वत्र क्षेत्रात प्रवेश केला आहे. आॅनलाईन बॅकींग, आॅनलाईन खरेदी, मेसेजींग, ई-गव्हर्नस, फेसबुक, व्हॉटस् अ‍ॅप, टिष्ट्वटर, व्हीडीओ कॉल इत्यादी गोष्टीमुळे देशाच्या सिमारेषाही पुसून गेल्या असून जगातले लोक खूप जवळ आले आहेत. वाढत्या इंटरनेटच्या वापराबरोबरच सायबर गुन्हेगारांनी गुन्हेगारीच्या नवनवीन पद्धती शोधून लोकांचा पैसा आणि खासगी गोपनियता याला मोठा धोका निर्माण केला आहे. इंटरनेटचे तंत्रज्ञान वारंवार बदलत असल्यामुळे सायबर गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आवाहन सध्या आहे. त्याचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ट्रान्सफोरमिंग महाराष्ट्र या कार्यक्रमांतर्गत पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती अभियान राबविण्याचे निश्चित केले असल्याचे यावेळी सांगण्यात आले. वालदे यांनी बॅक फ्रॉड, आॅनलाईन फ्रॉड, जॉब फ्रॉड, सोशल मिडीया फ्रॉड याबाबतची माहिती दिली. कार्यक्रमाला पराग पोटे, डी. बी.गुरव, बी.डी. मोहदुळे, संजय देवरकर, कुलदीप टांकसाळे, निलेश कट्टोजवार, दिनेश बोथकर, कावळे, अक्षय राऊत, अभिजीत वाघमारे आदींनी सहकार्य केले.