शहरं
Join us  
Trending Stories
1
निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन; हिमाचल प्रदेशात हाहाकार
2
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
3
FD-RD विसरून जा, हा आहे LIC चा ‘अमृत’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेनशन संपेल
4
गोगावलेंवर भाजप आमदार भडकले; विधानभवनात परिसरात झाली शाब्दिक चकमक
5
"माझी डॉक्टर पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर..."; व्यावसायिक पतीचा खळबळजनक दावा, तपास यंत्रणेकडे तक्रार
6
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
7
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
8
Navi Mumbai: धक्कादायक! नवजात बाळाला प्रवाशांकडे सोडून जन्मदात्री गेली पळून, गुन्हा दाखल
9
२० हून अधिक गर्लफ्रेंड, १० जणींसोबत शारीरिक संबंध; पोलिसांच्या जाळ्यात अडकला 'बोगस पोलीस'
10
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
11
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
12
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
13
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", 'त्या' अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
14
"ब्लड टेस्ट करायला गेल्यावर १० मिनिटांनी.."; अंशुमन विचारेच्या पत्नीने सांगितला धक्कादायक अनुभव, काय घडलं?
15
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
16
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
17
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
18
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
19
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
20
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या

वर्धेकरांना शुद्ध व नियमित पाणीपुरवठा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 21:57 IST

अपुऱ्या पावसामुळे वर्धेकरांना वर्षभर पाणी पुरविण्याकरिता दुरदृष्टी ठेऊन केलेली पाणी कपात स्वागतार्ह आहे. परंतू मागील तीन ते चार महिन्यांपासून चार ते पाच दिवसाआड पाणी पुरवठा होतो. तसेच नळाला येणारे पाणी दुषित असल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे वर्धेकरांना शुद्ध व नियमित पाणी पुरवठा करावा. अन्यथा जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा शहर काँग्रेस कमिटीने नगर पालिकेच्या मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांना निवेदनातून दिला आहे.

ठळक मुद्देशहर काँग्रेसची मागणी : नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन, जनआंदोलन उभारण्याचा दिला इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अपुऱ्या पावसामुळे वर्धेकरांना वर्षभर पाणी पुरविण्याकरिता दुरदृष्टी ठेऊन केलेली पाणी कपात स्वागतार्ह आहे. परंतू मागील तीन ते चार महिन्यांपासून चार ते पाच दिवसाआड पाणी पुरवठा होतो. तसेच नळाला येणारे पाणी दुषित असल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे वर्धेकरांना शुद्ध व नियमित पाणी पुरवठा करावा. अन्यथा जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा शहर काँग्रेस कमिटीने नगर पालिकेच्या मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांना निवेदनातून दिला आहे.एकीकडे जनतेला अशुद्ध व अनियमित पाणी पुरवठा केल्या जातो तर दुसरीकडे मात्र पाणी पुरवठ्याचा संपूर्ण कर वसुल केल्या जातो, ही जनतेची शुद्ध फसवणूक आहे. मागील वर्षभरापासून शहरामध्ये सिमेंटचे रस्ते, मोठे भूमीगत नाले तसेच शहराबाहेरुन जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे बेजबाबदारपणे काम सुरु आहे. ही स्थिती अशीच कायम राहिली तर वर्धेचा पाणी प्रश्न पेटल्याशिवाय राहणार नाही. या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन पालिका प्रशासाने नियोजन करावे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.नगर पालिकेच्या मुख्याधिकारी वाघमळे यांना निवेदन देताना काँग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष सुधीर पांगुळ, तालुका अध्यक्ष धैर्यशील जगताप, माजी नगरसेवक कमलाकर पिंपळे, प्रशांत झाडे, पंकज इंगोले, अजय भुजाडे, हातोडे, विवेक तळवेकर, श्याम बोटकुले, विवेक डेहनकर, पंकज अनकर आदींची उपस्थिती होती.