शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

अन्नत्यागातून नोंदविला जनसामान्य विरोधी धोरणांचा निषेध, प्रहार जनशक्तीचं आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2017 14:24 IST

शेतकरी, शेतमजूर, माजी सैनिकाच्या विधवा, दिव्यांग तसेच समाजातील दुर्बल घटकांच्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी शुक्रवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रहार जनशक्तीपक्षाच्यावतीने अन्नत्याग आंदोलन करण्यात आले.

वर्धा- शेतकरी, शेतमजूर, माजी सैनिकाच्या विधवा, दिव्यांग तसेच समाजातील दुर्बल घटकांच्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी शुक्रवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रहार जनशक्तीपक्षाच्यावतीने अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनात सहभागी दिव्यांग बांधवांनी एक दिवस उपवास करून केंद्र व राज्य सरकारच्या जनसामान्य विरोधी धोरणांचा निषेध नोंदविला. आंदोलनादरम्यान विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.

१९९५ च्या कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करून सर्व जि.प/मनपा/पं.स. यांना ३ टक्के दिव्यांग निधी तातडीने वितरीत करणे, दिव्यांग बांधवाची नोंदणी करणे, ३ टक्के गाळे वाटप करणे तसेच प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत दिव्यांगांना प्राधान्य क्रमाणे घरकुलाचा लाभ देणे तसेच शबरी घरकूल योजनेच्या धर्तीवर ओ.बी.सी. अल्पसंख्यांक व खुल्या प्रवर्गातील दिव्यांग बांधवांकरिता स्वतंत्र घरकूल योजना राबविण्यात यावी. दिव्यांग बांधवांना देण्यात येणाऱ्या ६०० रुपये मानधनात वाढ करून सदर मानधन १ हजार ५०० रुपये करण्यात यावे. मानधनाकरिता २१ हजार असणारी उत्पन्नाची अट शिथील करून ती १ लाख करण्यात यावी.

दिव्यांग कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी १३ विधीमंडळ सदस्यांची समिती गठीत करावी, दिव्यांग बांधवांना कर्जमाफी देऊन त्यांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ द्यावा, संजय गांधी निराधार योजनेकरिता त्यांच्या पाल्याची वयाची २५  वर्ष अट रद्द करावी, ० ते १८ वयोगटातील दिव्यांगांना संजय गांधी पेंशन योजनेचा लाभ द्यावा, माजी सैनिकांच्या पाल्यांना नोकरीमध्ये आरक्षण मिळत असून त्याच पाश्वभूमीवर दिव्यांगांनाही नोकरीत आरक्षण देण्यात यावे आदी मागण्यांसाठी सदर आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलनाचे नेतृत्त्व प्रहारचे विदर्भ प्रमुख तथा जिल्हा प्रमुख हनुमंत झोटींग, शहर प्रमुख विकास दांडगे यांनी केले. आंदोलनात जिल्ह्यातील दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.