शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

गांधी आश्रमातील ऐतिहासिक स्मारकांना झांज्या अन् ताटव्यांचे संरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2022 05:00 IST

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी खेड्यांकडे चला, असा संदेश दिला. जमनलाल बजाज यांच्या विनंतीनंतर सन १९३६ मध्ये महात्मा गांधी वर्ध्याला आलेत. त्यांनी तत्कालीन सेगावात आश्रम करण्याचे निश्चित केले. याच ठिकाणाहून त्यांनी स्वातंत्र्य चळवळीला दिशा दिली. त्यामुळे स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र वर्धा राहिले. सेवाग्राम आश्रमात राहून महात्मा गांधी यांनी अनेक रचनात्मक कार्य केलेत. त्यामुळे या आश्रमातील विविध स्मारके महत्त्वपूर्ण असून, त्याचे संवर्धन आश्रम प्रतिष्ठानच्यावतीने केले जाते.

दिलीप चव्हाणलोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : येथील गांधी आश्रम जगासाठी प्रेरणादायक असल्याने येथील विविध ऐतिहासिक वास्तू बघण्यासह गांधी विचार जाणून घेण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक सेवाग्राम येथे येतात; पण सध्याच्या विज्ञान युगात गांधी आश्रमातील याच ऐतिहासिक स्मारकांचे पावसापासून संरक्षण करण्यासाठी झांज्या आणि ताटव्यांचा वापर होत आहे. त्यामुळे विज्ञान युगातही गांधी आश्रमात परंपरा जपली जात असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी खेड्यांकडे चला, असा संदेश दिला. जमनलाल बजाज यांच्या विनंतीनंतर सन १९३६ मध्ये महात्मा गांधी वर्ध्याला आलेत. त्यांनी तत्कालीन सेगावात आश्रम करण्याचे निश्चित केले. याच ठिकाणाहून त्यांनी स्वातंत्र्य चळवळीला दिशा दिली. त्यामुळे स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र वर्धा राहिले. सेवाग्राम आश्रमात राहून महात्मा गांधी यांनी अनेक रचनात्मक कार्य केलेत. त्यामुळे या आश्रमातील विविध स्मारके महत्त्वपूर्ण असून, त्याचे संवर्धन आश्रम प्रतिष्ठानच्यावतीने केले जाते. पावसाळ्याच्या दिवसांत याच मातीच्या स्मारकांना सर्वाधिक धोका राहत असल्याने त्यांचे संरक्षण करण्यासाठी झांज्या आणि ताटव्यांचा आधार घेतला जातो. ही परंपरा महात्मा गांधी हे सेवाग्राम आश्रमात असतानापासूनची असून, ती अजूनही जपली जात आहे. या आश्रमात कोविड संकट काळात पर्यटनांना बंदी घालण्यात आली होती. पण सध्या हे आश्रम खुले झाले आहे.

गांधी आश्रमातील ठेवा -    गांधीजींचे उपयोगातील साहित्य सेवाग्राम येथील आश्रमात पाहावयास मिळते. आश्रमाच्या परिसरातच आदी निवास, बापू कुटी, ‘बा’कुटी, आखरी निवास, महादेव कुटी, किशोर कुटी आदी ऐतिहासिक ठेवा जपण्याात आलेला आहे. या सर्वांची देखरेख सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान करते.- महात्मा गांधींच्या स्मरणार्थ सन १९४४ साली कस्तुरबा रुग्णालयाची स्थापनाही सेवाग्राम येथे करण्यात आली. त्याचबरोबर डॉ. सुशीला नायर यांनी सन १९६९ साली महात्मा गांधी वैद्यकीय महाविद्यालय सेवाग्राम येथे सुरू केले. हे रुग्णालय आजही वर्धासह वर्धा जिल्ह्याबाहेरील नागरिकांसाठी फायद्याचे ठरत आहे.

शिंदुल्यांच्या पानोळ्या झाल्या दुर्मीळ-    गांधी आश्रमातील विविध स्मारक मातीची आहेत. पावसाळ्यात ही स्मारके खराब होऊ नये, यासाठी दरवर्षी पावसाळ्या पूर्वी या स्मारकांना शिंदोल्यांच्या पानोळ्यांच्या झांज्या आणि बांबूचे ताटव्यांचे संरक्षण कवच चढविले जाते. सध्याच्या विज्ञान युगात विकासाच्या नावाखाली वृक्ष कत्तली केल्या जात असल्याने शिंदुल्यांच्या पानोळ्याही सहज मिळणे दुर्मीळ झाले आहे.

पुजई येथून आणल्या ५ हजार पानोळ्या-    सध्या शिंदोल्यांची झाडे दुर्मीळ झाली असून, यंदाच्या वर्षी आश्रम प्रतिष्ठानने पुजई या गावातून शिंदोल्याच्या ५ हजार पानोळ्या आणल्या आहेत. याचाच वापर सध्या स्मारकांना सरंक्षण कवच तयार करण्यासाठी केला जात आहे.

गांधी आश्रमातील विविध स्मारकांचे पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून स्मारकांना झांज्या आणि ताटव्यांचे कवच लावले जात आहे. यंदा पुजई येथून शिंदोल्यांच्या ५ हजार पानोळ्या आणण्यात आल्या असून, त्याचा वापर संरक्षण कवच तयार करण्यासाठी केला जात आहे.- टी. आर. एन. प्रभू, अध्यक्ष, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान, सेवाग्राम.

 

 

टॅग्स :Sewagramसेवाग्रामBapu Kutiबापू कुटी