शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गांधी आश्रमातील ऐतिहासिक स्मारकांना झांज्या अन् ताटव्यांचे संरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2022 05:00 IST

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी खेड्यांकडे चला, असा संदेश दिला. जमनलाल बजाज यांच्या विनंतीनंतर सन १९३६ मध्ये महात्मा गांधी वर्ध्याला आलेत. त्यांनी तत्कालीन सेगावात आश्रम करण्याचे निश्चित केले. याच ठिकाणाहून त्यांनी स्वातंत्र्य चळवळीला दिशा दिली. त्यामुळे स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र वर्धा राहिले. सेवाग्राम आश्रमात राहून महात्मा गांधी यांनी अनेक रचनात्मक कार्य केलेत. त्यामुळे या आश्रमातील विविध स्मारके महत्त्वपूर्ण असून, त्याचे संवर्धन आश्रम प्रतिष्ठानच्यावतीने केले जाते.

दिलीप चव्हाणलोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : येथील गांधी आश्रम जगासाठी प्रेरणादायक असल्याने येथील विविध ऐतिहासिक वास्तू बघण्यासह गांधी विचार जाणून घेण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक सेवाग्राम येथे येतात; पण सध्याच्या विज्ञान युगात गांधी आश्रमातील याच ऐतिहासिक स्मारकांचे पावसापासून संरक्षण करण्यासाठी झांज्या आणि ताटव्यांचा वापर होत आहे. त्यामुळे विज्ञान युगातही गांधी आश्रमात परंपरा जपली जात असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी खेड्यांकडे चला, असा संदेश दिला. जमनलाल बजाज यांच्या विनंतीनंतर सन १९३६ मध्ये महात्मा गांधी वर्ध्याला आलेत. त्यांनी तत्कालीन सेगावात आश्रम करण्याचे निश्चित केले. याच ठिकाणाहून त्यांनी स्वातंत्र्य चळवळीला दिशा दिली. त्यामुळे स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र वर्धा राहिले. सेवाग्राम आश्रमात राहून महात्मा गांधी यांनी अनेक रचनात्मक कार्य केलेत. त्यामुळे या आश्रमातील विविध स्मारके महत्त्वपूर्ण असून, त्याचे संवर्धन आश्रम प्रतिष्ठानच्यावतीने केले जाते. पावसाळ्याच्या दिवसांत याच मातीच्या स्मारकांना सर्वाधिक धोका राहत असल्याने त्यांचे संरक्षण करण्यासाठी झांज्या आणि ताटव्यांचा आधार घेतला जातो. ही परंपरा महात्मा गांधी हे सेवाग्राम आश्रमात असतानापासूनची असून, ती अजूनही जपली जात आहे. या आश्रमात कोविड संकट काळात पर्यटनांना बंदी घालण्यात आली होती. पण सध्या हे आश्रम खुले झाले आहे.

गांधी आश्रमातील ठेवा -    गांधीजींचे उपयोगातील साहित्य सेवाग्राम येथील आश्रमात पाहावयास मिळते. आश्रमाच्या परिसरातच आदी निवास, बापू कुटी, ‘बा’कुटी, आखरी निवास, महादेव कुटी, किशोर कुटी आदी ऐतिहासिक ठेवा जपण्याात आलेला आहे. या सर्वांची देखरेख सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान करते.- महात्मा गांधींच्या स्मरणार्थ सन १९४४ साली कस्तुरबा रुग्णालयाची स्थापनाही सेवाग्राम येथे करण्यात आली. त्याचबरोबर डॉ. सुशीला नायर यांनी सन १९६९ साली महात्मा गांधी वैद्यकीय महाविद्यालय सेवाग्राम येथे सुरू केले. हे रुग्णालय आजही वर्धासह वर्धा जिल्ह्याबाहेरील नागरिकांसाठी फायद्याचे ठरत आहे.

शिंदुल्यांच्या पानोळ्या झाल्या दुर्मीळ-    गांधी आश्रमातील विविध स्मारक मातीची आहेत. पावसाळ्यात ही स्मारके खराब होऊ नये, यासाठी दरवर्षी पावसाळ्या पूर्वी या स्मारकांना शिंदोल्यांच्या पानोळ्यांच्या झांज्या आणि बांबूचे ताटव्यांचे संरक्षण कवच चढविले जाते. सध्याच्या विज्ञान युगात विकासाच्या नावाखाली वृक्ष कत्तली केल्या जात असल्याने शिंदुल्यांच्या पानोळ्याही सहज मिळणे दुर्मीळ झाले आहे.

पुजई येथून आणल्या ५ हजार पानोळ्या-    सध्या शिंदोल्यांची झाडे दुर्मीळ झाली असून, यंदाच्या वर्षी आश्रम प्रतिष्ठानने पुजई या गावातून शिंदोल्याच्या ५ हजार पानोळ्या आणल्या आहेत. याचाच वापर सध्या स्मारकांना सरंक्षण कवच तयार करण्यासाठी केला जात आहे.

गांधी आश्रमातील विविध स्मारकांचे पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून स्मारकांना झांज्या आणि ताटव्यांचे कवच लावले जात आहे. यंदा पुजई येथून शिंदोल्यांच्या ५ हजार पानोळ्या आणण्यात आल्या असून, त्याचा वापर संरक्षण कवच तयार करण्यासाठी केला जात आहे.- टी. आर. एन. प्रभू, अध्यक्ष, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान, सेवाग्राम.

 

 

टॅग्स :Sewagramसेवाग्रामBapu Kutiबापू कुटी