शहरं
Join us  
Trending Stories
1
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
2
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
3
सौदी अरेबियानं लढवली शक्कल, पाकिस्तानला कळलंच नाही; 'डिफेन्स डील'मागची Inside Story काय?
4
आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'
5
'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य
6
भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? अभिनेत्याच्या पोस्टने चर्चेला उधाण
7
Video - "मी मुस्लिम, पण मला हा रंग आवडतो"; 'भगवा आयफोन' खरेदी केल्याचा प्रचंड आनंद
8
खळबळजनक! गोड बोलला, खांद्यावर हात ठेवला अन् गळा चिरला; नवऱ्याचा बायकोवर जीवघेणा हल्ला
9
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
10
iPhone 17: बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की!
11
‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी 
12
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
13
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
14
श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...
15
"फडणवीस साहेबांनी मला बोलावलं अन्...", समीर चौघुलेंनी सांगितला विमानातला किस्सा; म्हणाले...
16
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
17
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...
18
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
19
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
20
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले

गोरक्षकांच्या संरक्षणार्थ धरणे

By admin | Updated: November 7, 2015 02:08 IST

अवैधरीत्या होत असलेल्या गोहत्या रोखण्यासाठी विविध गो-प्रेमी संघटनाचे पदाधिकारी प्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालून गोमातेला कत्तलखान्यात....

जीविताला धोका : जिल्हाधिकारी यांना निवेदनातून साकडेवर्धा : अवैधरीत्या होत असलेल्या गोहत्या रोखण्यासाठी विविध गो-प्रेमी संघटनाचे पदाधिकारी प्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालून गोमातेला कत्तलखान्यात जाण्यापासून वाचवितात. मात्र गो-तस्करांकडून या कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ले करण्याचे प्रकार घडतात. या घटनात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. याकरिता गोरक्षकांना संरक्षण देऊन उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. याकरिता शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर कार्यकर्त्यांच्यावतीने धरणे देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनानुसार, कर्नाटक राज्यात बजरंग दलाचे कार्यकर्ते प्रशांत पुजारी यांची पशुवधगृह बंद पाडण्याच्या कारणावरुन निर्घृण हत्या करण्यात आली. हरियाणा येथील संदीप कटारिया, पुणे येथे गोरक्षक मिलिंद एकबोटे यांच्यावर आक्रमण करण्यात आले. पंजाब गोरक्षा दलाचे सतीशकुमार प्रधान यांच्यावर गोळीबार करण्यात आले. गो-तस्कर या प्रकारची गोतस्करी रोखणाऱ्या पोलिसांवर हल्ले केल्याच्या घटना घडत आहे. त्यामुळे रक्षकावर हल्ले होत असताना या गोरक्षकांना संरक्षण कोण देणार असा प्रश्न निर्माण होत आहे. यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. याप्रकारे आक्रमणे होत असताना गोरक्षकांचे रक्षण करण्यास पोलीस पुरेसे नसल्याची बाब समोर येत आहे. त्यामुळे कायद्यानुसार गोमातेच्या रक्षणासाठी जीव धोक्यात घालणाऱ्या या गोरक्षकांना किमान त्यांचे स्वत:चे रक्षण करता यावे, यासाठी स्वसंरक्षणार्थ उपाययोजना करण्याची मागणी केली. गोरक्षकांवर वाढती आक्रमणे रोखण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत, तसेच थोर पुरूष व देवतांची चित्रे छापून प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांवर बंदी आणावी, यातून अवमान होत आहे. या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय समोर राष्ट्रीय हिंदू जनजागृती समितीच्या कार्यकर्ते यांनी आंदोलन केले. धरणे दिल्यावर या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.(स्थानिक प्रतिनिधी) फटाक्याच्या उत्पादनावर बंदीची मागणी फटाक्यांच्या वेष्टनांवर लक्ष्मी, श्रीकृष्ण, श्रीविष्णू आदी देवतांची तसेच सुभाषचंद्र बोस, भगतसिंग अशा राष्ट्रपुरुषांची चित्रे छापण्यात येते. फटाके फोडताना या चित्रांची मोठ्या प्रमाणात विटंबना होते. त्यातून धार्मिक भावना दुखावून कायदा आणि सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होतो. फटाक्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रदूषणही होेते. प्रदुषण निर्माण करणाऱ्या आणि श्रद्धास्थानांचा अवमान करणाऱ्या या फटाक्यांवर उत्पादनावर कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी केली.