शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

गोरक्षकांच्या संरक्षणार्थ धरणे

By admin | Updated: November 7, 2015 02:08 IST

अवैधरीत्या होत असलेल्या गोहत्या रोखण्यासाठी विविध गो-प्रेमी संघटनाचे पदाधिकारी प्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालून गोमातेला कत्तलखान्यात....

जीविताला धोका : जिल्हाधिकारी यांना निवेदनातून साकडेवर्धा : अवैधरीत्या होत असलेल्या गोहत्या रोखण्यासाठी विविध गो-प्रेमी संघटनाचे पदाधिकारी प्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालून गोमातेला कत्तलखान्यात जाण्यापासून वाचवितात. मात्र गो-तस्करांकडून या कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ले करण्याचे प्रकार घडतात. या घटनात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. याकरिता गोरक्षकांना संरक्षण देऊन उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. याकरिता शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर कार्यकर्त्यांच्यावतीने धरणे देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनानुसार, कर्नाटक राज्यात बजरंग दलाचे कार्यकर्ते प्रशांत पुजारी यांची पशुवधगृह बंद पाडण्याच्या कारणावरुन निर्घृण हत्या करण्यात आली. हरियाणा येथील संदीप कटारिया, पुणे येथे गोरक्षक मिलिंद एकबोटे यांच्यावर आक्रमण करण्यात आले. पंजाब गोरक्षा दलाचे सतीशकुमार प्रधान यांच्यावर गोळीबार करण्यात आले. गो-तस्कर या प्रकारची गोतस्करी रोखणाऱ्या पोलिसांवर हल्ले केल्याच्या घटना घडत आहे. त्यामुळे रक्षकावर हल्ले होत असताना या गोरक्षकांना संरक्षण कोण देणार असा प्रश्न निर्माण होत आहे. यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. याप्रकारे आक्रमणे होत असताना गोरक्षकांचे रक्षण करण्यास पोलीस पुरेसे नसल्याची बाब समोर येत आहे. त्यामुळे कायद्यानुसार गोमातेच्या रक्षणासाठी जीव धोक्यात घालणाऱ्या या गोरक्षकांना किमान त्यांचे स्वत:चे रक्षण करता यावे, यासाठी स्वसंरक्षणार्थ उपाययोजना करण्याची मागणी केली. गोरक्षकांवर वाढती आक्रमणे रोखण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत, तसेच थोर पुरूष व देवतांची चित्रे छापून प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांवर बंदी आणावी, यातून अवमान होत आहे. या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय समोर राष्ट्रीय हिंदू जनजागृती समितीच्या कार्यकर्ते यांनी आंदोलन केले. धरणे दिल्यावर या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.(स्थानिक प्रतिनिधी) फटाक्याच्या उत्पादनावर बंदीची मागणी फटाक्यांच्या वेष्टनांवर लक्ष्मी, श्रीकृष्ण, श्रीविष्णू आदी देवतांची तसेच सुभाषचंद्र बोस, भगतसिंग अशा राष्ट्रपुरुषांची चित्रे छापण्यात येते. फटाके फोडताना या चित्रांची मोठ्या प्रमाणात विटंबना होते. त्यातून धार्मिक भावना दुखावून कायदा आणि सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होतो. फटाक्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रदूषणही होेते. प्रदुषण निर्माण करणाऱ्या आणि श्रद्धास्थानांचा अवमान करणाऱ्या या फटाक्यांवर उत्पादनावर कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी केली.