शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

गोरक्षकांच्या संरक्षणार्थ धरणे

By admin | Updated: November 7, 2015 02:08 IST

अवैधरीत्या होत असलेल्या गोहत्या रोखण्यासाठी विविध गो-प्रेमी संघटनाचे पदाधिकारी प्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालून गोमातेला कत्तलखान्यात....

जीविताला धोका : जिल्हाधिकारी यांना निवेदनातून साकडेवर्धा : अवैधरीत्या होत असलेल्या गोहत्या रोखण्यासाठी विविध गो-प्रेमी संघटनाचे पदाधिकारी प्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालून गोमातेला कत्तलखान्यात जाण्यापासून वाचवितात. मात्र गो-तस्करांकडून या कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ले करण्याचे प्रकार घडतात. या घटनात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. याकरिता गोरक्षकांना संरक्षण देऊन उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. याकरिता शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर कार्यकर्त्यांच्यावतीने धरणे देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनानुसार, कर्नाटक राज्यात बजरंग दलाचे कार्यकर्ते प्रशांत पुजारी यांची पशुवधगृह बंद पाडण्याच्या कारणावरुन निर्घृण हत्या करण्यात आली. हरियाणा येथील संदीप कटारिया, पुणे येथे गोरक्षक मिलिंद एकबोटे यांच्यावर आक्रमण करण्यात आले. पंजाब गोरक्षा दलाचे सतीशकुमार प्रधान यांच्यावर गोळीबार करण्यात आले. गो-तस्कर या प्रकारची गोतस्करी रोखणाऱ्या पोलिसांवर हल्ले केल्याच्या घटना घडत आहे. त्यामुळे रक्षकावर हल्ले होत असताना या गोरक्षकांना संरक्षण कोण देणार असा प्रश्न निर्माण होत आहे. यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. याप्रकारे आक्रमणे होत असताना गोरक्षकांचे रक्षण करण्यास पोलीस पुरेसे नसल्याची बाब समोर येत आहे. त्यामुळे कायद्यानुसार गोमातेच्या रक्षणासाठी जीव धोक्यात घालणाऱ्या या गोरक्षकांना किमान त्यांचे स्वत:चे रक्षण करता यावे, यासाठी स्वसंरक्षणार्थ उपाययोजना करण्याची मागणी केली. गोरक्षकांवर वाढती आक्रमणे रोखण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत, तसेच थोर पुरूष व देवतांची चित्रे छापून प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांवर बंदी आणावी, यातून अवमान होत आहे. या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय समोर राष्ट्रीय हिंदू जनजागृती समितीच्या कार्यकर्ते यांनी आंदोलन केले. धरणे दिल्यावर या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.(स्थानिक प्रतिनिधी) फटाक्याच्या उत्पादनावर बंदीची मागणी फटाक्यांच्या वेष्टनांवर लक्ष्मी, श्रीकृष्ण, श्रीविष्णू आदी देवतांची तसेच सुभाषचंद्र बोस, भगतसिंग अशा राष्ट्रपुरुषांची चित्रे छापण्यात येते. फटाके फोडताना या चित्रांची मोठ्या प्रमाणात विटंबना होते. त्यातून धार्मिक भावना दुखावून कायदा आणि सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होतो. फटाक्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रदूषणही होेते. प्रदुषण निर्माण करणाऱ्या आणि श्रद्धास्थानांचा अवमान करणाऱ्या या फटाक्यांवर उत्पादनावर कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी केली.