शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

आपत्तीकाळात प्रशासनाच्या तिजोरीत भरभराट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 16:23 IST

Wardha News सहा महिन्यांच्या आपत्तीकाळात प्रशासनाच्या तिजोरीमध्ये ५३ लाख २९ हजार ४९९ रुपयांची भरभराट झाली आहे.

ठळक मुद्देप्रतिबंधात्मक उपाययोजना५३ लाखांचा दंड केला वसूलसहा महिन्यांतील कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रभावी उपाययोजना राबविल्या जात आहेत. या उपाययोजना राबवित असताना नियमांचे काटेकोरपणे पालन न करणाऱ्यांवर कारवाईचाही दंडुका उगारला. परिणामी, सहा महिन्यांच्या आपत्तीकाळात प्रशासनाच्या तिजोरीमध्ये ५३ लाख २९ हजार ४९९ रुपयांची भरभराट झाली आहे.

कोरोनाचा शिरकाव होताच जिल्हा प्रशासनाने आठही तालुक्यांमध्ये संचारबंदी लागू करून नियमभंग करणाऱ्यांवर १८८ अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला. विनाकारण घराबाहेर पडणे, तोंडाला मास्क न लावणे, सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करणे तसेच सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी न घेता बाहेर जिल्ह्यातून प्रवास करणे आदींबाबत कारवाई करण्यात आली. २३ मार्च २०२० पासून २२ सप्टेंबरपर्यंतच्या कालावधीत महसूल, ग्रामविकास, पोलीस व नगर पालिका प्रशासनच्या माध्यमातून सहावेळा मोहीम राबवून ११ हजार ५१५ व्यक्ती, आस्थापनांवर कारवाई करीत ५३ लाख २९ हजार ४९९ रुपयांचा दंड वसूल केला. या कालावधीमध्ये विनाकरण घराबाहेर फिरणाऱ्यांचे तसेच विनापरवानगी जिल्ह्यात दाखल झालेल्यांची तब्बल ९४० वाहने जप्त करण्यात आली.

टॅग्स :MONEYपैसा