शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

प्रगतीसाठी समृद्धी महामार्ग महत्त्वाकांक्षीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 22:07 IST

नागपूर-मुंबई दरम्यान ७०० कि.मी. लांबीचा राज्य समृद्धी महामार्ग तयार करण्यात येत आहे. तो राज्यातील दहा जिल्ह्यांना जोडणारा आहे. तर प्रत्यक्ष १४ जिल्ह्याला या महामार्गाचा फायदा होणार आहे. त्यामुळे हा समृद्धी महामार्ग राज्याच्या प्रगतीसाठी महत्वाकांक्षीच प्रकल्प ठरणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सा.उ.) एकनाथ शिंदे यांनी केले.

ठळक मुद्देएकनाथ शिंदे । प्रगतिपथावरील कामाची केली पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नागपूर-मुंबई दरम्यान ७०० कि.मी. लांबीचा राज्य समृद्धी महामार्ग तयार करण्यात येत आहे. तो राज्यातील दहा जिल्ह्यांना जोडणारा आहे. तर प्रत्यक्ष १४ जिल्ह्याला या महामार्गाचा फायदा होणार आहे. त्यामुळे हा समृद्धी महामार्ग राज्याच्या प्रगतीसाठी महत्वाकांक्षीच प्रकल्प ठरणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सा.उ.) एकनाथ शिंदे यांनी केले.सेलू तालुक्यातील धानोली (मेघे) येथून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या पॅकेज क्र.२ च्या सुरू असलेल्या कामाची पाहणी ना. शिंदे यांनी केली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य अभियंता महाजन, उपअभियंता आश्विनी घुगे, होळकर, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे उपजिल्हाधिकारी निशिकांत सुके, जिल्हा समन्वयक प्रशांत दळवळकर, व्यवस्थापकिय संचालक गायकवाड, दिलीप बिल्डकॉन कंपनीचे संचालक गुप्ता, अनिलकुमार, प्रकाश झा व सेलूचे तहसीलदार महेंद्र सोनवणे यांची उपस्थिती होती. विकसीत महाराष्ट्रात मोलाचा वाटा देणाºया समृद्धी महार्गाचे काम एकूण १६ टप्प्यात करण्यात येत आहे. पॅकेज क्रमांक दोन मध्ये वर्धा जिल्ह्याचा समावेश आहे. यामध्ये ५८ कि.मी. लांबीचा महामार्ग जिल्ह्यातील तीन तालुक्यातून जाणार आहे. नागपूर ते मुबंई १२ तासाचे अंतर समृद्धी महामार्गामुळे ७ ते ८ तासात पूर्ण करता येणार आहे. नागरिकांसाठी तसेच विदर्भातील उद्योगांना बाजापेठेसाठी हा महामार्ग महत्वाकांक्षी ठरणार आहे. तसेच देशाच्या विकासात मोठी भर पडेल. डिसेंबर २०२० पर्यंत या महामार्गाचे काम पूर्ण करण्यात येईल, असेही यावेळी ना. शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग