शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
6
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
7
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
8
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
9
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
10
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
11
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
12
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
13
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
14
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
15
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
16
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
17
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
18
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
19
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
20
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू

प्रगतीसाठी समृद्धी महामार्ग महत्त्वाकांक्षीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 22:07 IST

नागपूर-मुंबई दरम्यान ७०० कि.मी. लांबीचा राज्य समृद्धी महामार्ग तयार करण्यात येत आहे. तो राज्यातील दहा जिल्ह्यांना जोडणारा आहे. तर प्रत्यक्ष १४ जिल्ह्याला या महामार्गाचा फायदा होणार आहे. त्यामुळे हा समृद्धी महामार्ग राज्याच्या प्रगतीसाठी महत्वाकांक्षीच प्रकल्प ठरणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सा.उ.) एकनाथ शिंदे यांनी केले.

ठळक मुद्देएकनाथ शिंदे । प्रगतिपथावरील कामाची केली पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नागपूर-मुंबई दरम्यान ७०० कि.मी. लांबीचा राज्य समृद्धी महामार्ग तयार करण्यात येत आहे. तो राज्यातील दहा जिल्ह्यांना जोडणारा आहे. तर प्रत्यक्ष १४ जिल्ह्याला या महामार्गाचा फायदा होणार आहे. त्यामुळे हा समृद्धी महामार्ग राज्याच्या प्रगतीसाठी महत्वाकांक्षीच प्रकल्प ठरणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सा.उ.) एकनाथ शिंदे यांनी केले.सेलू तालुक्यातील धानोली (मेघे) येथून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या पॅकेज क्र.२ च्या सुरू असलेल्या कामाची पाहणी ना. शिंदे यांनी केली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य अभियंता महाजन, उपअभियंता आश्विनी घुगे, होळकर, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे उपजिल्हाधिकारी निशिकांत सुके, जिल्हा समन्वयक प्रशांत दळवळकर, व्यवस्थापकिय संचालक गायकवाड, दिलीप बिल्डकॉन कंपनीचे संचालक गुप्ता, अनिलकुमार, प्रकाश झा व सेलूचे तहसीलदार महेंद्र सोनवणे यांची उपस्थिती होती. विकसीत महाराष्ट्रात मोलाचा वाटा देणाºया समृद्धी महार्गाचे काम एकूण १६ टप्प्यात करण्यात येत आहे. पॅकेज क्रमांक दोन मध्ये वर्धा जिल्ह्याचा समावेश आहे. यामध्ये ५८ कि.मी. लांबीचा महामार्ग जिल्ह्यातील तीन तालुक्यातून जाणार आहे. नागपूर ते मुबंई १२ तासाचे अंतर समृद्धी महामार्गामुळे ७ ते ८ तासात पूर्ण करता येणार आहे. नागरिकांसाठी तसेच विदर्भातील उद्योगांना बाजापेठेसाठी हा महामार्ग महत्वाकांक्षी ठरणार आहे. तसेच देशाच्या विकासात मोठी भर पडेल. डिसेंबर २०२० पर्यंत या महामार्गाचे काम पूर्ण करण्यात येईल, असेही यावेळी ना. शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग