शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मे महिन्यात ‘समृद्धी’चा श्रीगणेशा; नागपूर-शिर्डी करता येणार प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2022 05:00 IST

समृद्धी महामार्गासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान वापरण्यात आले असून मार्गाचे काम उत्तम दर्जाचे झाले आहे. पर्यावरणाचा समतोल राखून ईको फ्रेंडली काम करण्यात आले असून या संपूर्ण महामार्गावर ११.५० लाख झाडे लावण्यात येत आहे. वनसंपदेचे रक्षण होणे गरजेचे असून प्राण्यांसाठी रस्त्यावर खास उड्डाणपूल बांधण्यात आले. या पुलांमुळे प्राण्यांना जंगलांचा अनुभव येतील, अशी व्यवस्था या पुलांवर करण्यात आली असल्याचे ना. शिंदे यांनी स्पष्ट केले.

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : समृद्धी महामार्गामुळे विदर्भातील उद्योगधंद्यांना चालणा मिळणार असून,या महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे. नागपूर ते शिर्डी या टप्प्याचे उद्घाटन मे महिन्यात करण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे नागरिकांना लवकरच कमी वेळेत मुंबई गाठता येणार असल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. वर्धा जिल्ह्यातील आर्वी टोल प्लाझा येथे समृद्धी महामार्ग तसेच पुलगाव जवळ वन्यप्राण्यांच्या आवागमनासाठी बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाची पाहणी ना. शिंदे यांनी रविवारी केली. त्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, मुख्य अभियंता सुधाकर मुरादे,अधीक्षक अभियंता अश्विनी घुगे,कार्यकारी अभियंता हेमंत जगताप,भूषण मालखंडारे, उपविभागीय महसूल अधिकारी हरीश धार्मिक,तहसीलदार चव्हाण आदींची उपस्थिती होती.

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तंत्रज्ञानाचा वापर-    समृद्धी महामार्गासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान वापरण्यात आले असून मार्गाचे काम उत्तम दर्जाचे झाले आहे. पर्यावरणाचा समतोल राखून ईको फ्रेंडली काम करण्यात आले असून या संपूर्ण महामार्गावर ११.५० लाख झाडे लावण्यात येत आहे. वनसंपदेचे रक्षण होणे गरजेचे असून प्राण्यांसाठी रस्त्यावर खास उड्डाणपूल बांधण्यात आले. या पुलांमुळे प्राण्यांना जंगलांचा अनुभव येतील, अशी व्यवस्था या पुलांवर करण्यात आली असल्याचे ना. शिंदे यांनी स्पष्ट केले.

इलेक्ट्रिक कार चालवून प्रदूषणमुक्तीचा संदेश-    नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी समृद्धी महामार्गाची पाहणी करताना स्वत: इलेक्ट्रिक कार या महामार्गावर चालवून पूर्णत्त्वास गेलेल्या कामांची पाहणी करीत प्रदूषणमुक्तीचा संदेश दिला.

शेतमाल वाहतुकीसाठी महामार्ग फायद्याचाच-    समृद्धी महामार्गाचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे. नागपूर ते शिर्डी या टप्प्याचे उद्घाटन मे महिन्यात करण्याचे प्रस्तावित आहे. या महामार्गामुळे केवळ सहा ते सात तासांत मुंबई पोहोचता येईल. यामुळे वेळ, इंधनाची बचत होणार आहे. वाहन जेथे महामार्गावरून बाहेर पडेल तेथेच टोल लागतील. विदर्भातील उद्योग वाढीसह शेतकऱ्यांच्या मालाची वाहतूक करण्यासाठी हा मार्ग अतिशय महत्त्वाचा ठरणार असल्याचे ना. शिंदे म्हणाले.

जिल्ह्यात ५८ किमीचा महामार्ग पूर्ण

-    हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते मुंबई हे अंतर केवळ सहा ते सात तासांवर येणार आहे. समृद्धी महामार्गाची वर्धा जिल्ह्यातील लांबी ५८ कि.मी. इतकी आहे. जिल्ह्यातील मार्ग पूर्णपणे बांधून झाला आहे. रस्त्याची रुंदी १२० मीटर असून तो सहा पदरी आहे. -    वर्धा,सेलू व आर्वी या तीन तालुक्यातील ३४ गावांमधून एकून ७८२ हेक्टर इतकी जमीन महामार्गासाठी संपादित करण्यात आली आहे. जिल्ह्यात या मार्गावर २ हजार ७६२ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. जिल्ह्यात या मार्गावर विना अडथळा वाहतूक होण्यासाठी ५ मोठे, २७ लहान पुलांसह ९ उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत. -    येळाकेळी व विरुळ येथे इंटरचेंजेस देण्यात आले आहे. वन्यप्राण्यांच्या आवागमनासाठी दोन विशेष उड्डाणपुले बांधण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

 

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग