शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

मे महिन्यात ‘समृद्धी’चा श्रीगणेशा; नागपूर-शिर्डी करता येणार प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2022 05:00 IST

समृद्धी महामार्गासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान वापरण्यात आले असून मार्गाचे काम उत्तम दर्जाचे झाले आहे. पर्यावरणाचा समतोल राखून ईको फ्रेंडली काम करण्यात आले असून या संपूर्ण महामार्गावर ११.५० लाख झाडे लावण्यात येत आहे. वनसंपदेचे रक्षण होणे गरजेचे असून प्राण्यांसाठी रस्त्यावर खास उड्डाणपूल बांधण्यात आले. या पुलांमुळे प्राण्यांना जंगलांचा अनुभव येतील, अशी व्यवस्था या पुलांवर करण्यात आली असल्याचे ना. शिंदे यांनी स्पष्ट केले.

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : समृद्धी महामार्गामुळे विदर्भातील उद्योगधंद्यांना चालणा मिळणार असून,या महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे. नागपूर ते शिर्डी या टप्प्याचे उद्घाटन मे महिन्यात करण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे नागरिकांना लवकरच कमी वेळेत मुंबई गाठता येणार असल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. वर्धा जिल्ह्यातील आर्वी टोल प्लाझा येथे समृद्धी महामार्ग तसेच पुलगाव जवळ वन्यप्राण्यांच्या आवागमनासाठी बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाची पाहणी ना. शिंदे यांनी रविवारी केली. त्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, मुख्य अभियंता सुधाकर मुरादे,अधीक्षक अभियंता अश्विनी घुगे,कार्यकारी अभियंता हेमंत जगताप,भूषण मालखंडारे, उपविभागीय महसूल अधिकारी हरीश धार्मिक,तहसीलदार चव्हाण आदींची उपस्थिती होती.

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तंत्रज्ञानाचा वापर-    समृद्धी महामार्गासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान वापरण्यात आले असून मार्गाचे काम उत्तम दर्जाचे झाले आहे. पर्यावरणाचा समतोल राखून ईको फ्रेंडली काम करण्यात आले असून या संपूर्ण महामार्गावर ११.५० लाख झाडे लावण्यात येत आहे. वनसंपदेचे रक्षण होणे गरजेचे असून प्राण्यांसाठी रस्त्यावर खास उड्डाणपूल बांधण्यात आले. या पुलांमुळे प्राण्यांना जंगलांचा अनुभव येतील, अशी व्यवस्था या पुलांवर करण्यात आली असल्याचे ना. शिंदे यांनी स्पष्ट केले.

इलेक्ट्रिक कार चालवून प्रदूषणमुक्तीचा संदेश-    नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी समृद्धी महामार्गाची पाहणी करताना स्वत: इलेक्ट्रिक कार या महामार्गावर चालवून पूर्णत्त्वास गेलेल्या कामांची पाहणी करीत प्रदूषणमुक्तीचा संदेश दिला.

शेतमाल वाहतुकीसाठी महामार्ग फायद्याचाच-    समृद्धी महामार्गाचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे. नागपूर ते शिर्डी या टप्प्याचे उद्घाटन मे महिन्यात करण्याचे प्रस्तावित आहे. या महामार्गामुळे केवळ सहा ते सात तासांत मुंबई पोहोचता येईल. यामुळे वेळ, इंधनाची बचत होणार आहे. वाहन जेथे महामार्गावरून बाहेर पडेल तेथेच टोल लागतील. विदर्भातील उद्योग वाढीसह शेतकऱ्यांच्या मालाची वाहतूक करण्यासाठी हा मार्ग अतिशय महत्त्वाचा ठरणार असल्याचे ना. शिंदे म्हणाले.

जिल्ह्यात ५८ किमीचा महामार्ग पूर्ण

-    हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते मुंबई हे अंतर केवळ सहा ते सात तासांवर येणार आहे. समृद्धी महामार्गाची वर्धा जिल्ह्यातील लांबी ५८ कि.मी. इतकी आहे. जिल्ह्यातील मार्ग पूर्णपणे बांधून झाला आहे. रस्त्याची रुंदी १२० मीटर असून तो सहा पदरी आहे. -    वर्धा,सेलू व आर्वी या तीन तालुक्यातील ३४ गावांमधून एकून ७८२ हेक्टर इतकी जमीन महामार्गासाठी संपादित करण्यात आली आहे. जिल्ह्यात या मार्गावर २ हजार ७६२ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. जिल्ह्यात या मार्गावर विना अडथळा वाहतूक होण्यासाठी ५ मोठे, २७ लहान पुलांसह ९ उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत. -    येळाकेळी व विरुळ येथे इंटरचेंजेस देण्यात आले आहे. वन्यप्राण्यांच्या आवागमनासाठी दोन विशेष उड्डाणपुले बांधण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

 

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग