शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगावमध्ये ठाकरेंच्या उमेदवाराची माघार अन् शिंदेसेनेचं खातं उघडलं! आमदार पुत्र गौरव सोनवणे बिनविरोध
2
भाजपाने केली मोठी खेळी, ठाकरेंचे बहुसंख्य उमेदवार ठरले असते बाद; पण ऐनवेळी डाव उलटला अन्...
3
गोव्याला विसरून जाल! भारतातील पाच जबरदस्त बीच, एक आहे कोकणातील, तुमची सुट्टी दुप्पट आनंददायी होईल
4
ना निष्ठा, ना विचारधारा ८ दिवसांत ३ पक्ष बदलले; कुख्यात गुंडाला ठाण्यात कुणी दिली उमेदवारी?
5
ठाण्यात शिंदेसेनेने जागा वाटपामध्ये भाजपचा केला ‘करेक्ट कार्यक्रम’; 'त्या' नऊ जागा बांधल्या भाजपच्या गळ्यात 
6
पदाचा गैरवापर केल्याचा ठाकरे गटाचा आरोप; राहुल नार्वेकर उत्तर देत म्हणाले, “संजय राऊत...”
7
किडनी रॅकेटचे केंद्र तामिळनाडूत; ८० लाखांपर्यंत सौदा, शेकडो लोकांच्या किडनी काढून करोडो जमवले; दोन नामांकित डॉक्टरांची नावे पुढे
8
"तर आम्ही कुठल्याही थराला जाऊ"; नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानच्या असीम मुनीरचा इशारा
9
मनसेच्या मुंबईतील उमेदवारांना राज ठाकरेंचा मोलाचा सल्ला, म्हणाले, ‘तुम्हाला ऑफर येतील, पण…’
10
'ऑपरेशन सिंदूर सुरूच...' लष्करप्रमुख जनरल द्विवेदी यांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानला करून दिली आठवण
11
"जितकी मिरची ठाकरे गटाला...", नितेश राणेंचा उद्धवसेनेवर हल्ला, 'उत्तर भारतीय महौपार' मुद्द्यावर काय बोलले?
12
Gold Silver Price Today: नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, चेक करा १८ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
13
टॅरिफमुळे US ची किती कमाई? "टीका करणारे मुर्ख" असं म्हणणारे ट्रम्प प्रत्येकाला $२००० देण्याचं वचन पूर्ण करणार का?
14
शिंदेसेनेला धक्का, पाच उमेदवारी अर्ज बाद; एबी फॉर्मवर खाडाखोड, झेरॉक्स जोडल्याने ठरले अवैध
15
बांगलादेशी खेळाडूंसाठी आयपीएलचे दरवाजे बंद होणार? मुस्तफिजुर रहमानसाठी शाहरुखच्या संघाने ९ कोटी मोजले...
16
२०२६ मध्ये या ५ राज्यात रंगणार सत्तेचा सारीपाट, बाजी कोण मारणार, NDA की ‘INDIA’?
17
ट्रम्प यांच्या निर्णयाचे पडसाद! 'या' दोन देशांनी अमेरिकन नागरिकांच्या प्रवेशावर घातली बंदी
18
जळगावात भाजपाला धक्का, माजी महापौरांचा अर्ज बाद; AB फॉर्ममधील त्रुटीचा उद्धवसेनेलाही फटका
19
Healthy Diet: अन्न तेच पण पद्धत वेगळी! जपानी लोक लठ्ठ का होत नाहीत? त्यामागे आहेत ५ सिक्रेट 
20
कोकण गाजवल्यावर शिंदेचा फायर ब्रँड नेता मुंबईत; ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात दिली मोठी जबाबदारी
Daily Top 2Weekly Top 5

मे महिन्यात ‘समृद्धी’चा श्रीगणेशा; नागपूर-शिर्डी करता येणार प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2022 05:00 IST

समृद्धी महामार्गासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान वापरण्यात आले असून मार्गाचे काम उत्तम दर्जाचे झाले आहे. पर्यावरणाचा समतोल राखून ईको फ्रेंडली काम करण्यात आले असून या संपूर्ण महामार्गावर ११.५० लाख झाडे लावण्यात येत आहे. वनसंपदेचे रक्षण होणे गरजेचे असून प्राण्यांसाठी रस्त्यावर खास उड्डाणपूल बांधण्यात आले. या पुलांमुळे प्राण्यांना जंगलांचा अनुभव येतील, अशी व्यवस्था या पुलांवर करण्यात आली असल्याचे ना. शिंदे यांनी स्पष्ट केले.

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : समृद्धी महामार्गामुळे विदर्भातील उद्योगधंद्यांना चालणा मिळणार असून,या महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे. नागपूर ते शिर्डी या टप्प्याचे उद्घाटन मे महिन्यात करण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे नागरिकांना लवकरच कमी वेळेत मुंबई गाठता येणार असल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. वर्धा जिल्ह्यातील आर्वी टोल प्लाझा येथे समृद्धी महामार्ग तसेच पुलगाव जवळ वन्यप्राण्यांच्या आवागमनासाठी बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाची पाहणी ना. शिंदे यांनी रविवारी केली. त्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, मुख्य अभियंता सुधाकर मुरादे,अधीक्षक अभियंता अश्विनी घुगे,कार्यकारी अभियंता हेमंत जगताप,भूषण मालखंडारे, उपविभागीय महसूल अधिकारी हरीश धार्मिक,तहसीलदार चव्हाण आदींची उपस्थिती होती.

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तंत्रज्ञानाचा वापर-    समृद्धी महामार्गासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान वापरण्यात आले असून मार्गाचे काम उत्तम दर्जाचे झाले आहे. पर्यावरणाचा समतोल राखून ईको फ्रेंडली काम करण्यात आले असून या संपूर्ण महामार्गावर ११.५० लाख झाडे लावण्यात येत आहे. वनसंपदेचे रक्षण होणे गरजेचे असून प्राण्यांसाठी रस्त्यावर खास उड्डाणपूल बांधण्यात आले. या पुलांमुळे प्राण्यांना जंगलांचा अनुभव येतील, अशी व्यवस्था या पुलांवर करण्यात आली असल्याचे ना. शिंदे यांनी स्पष्ट केले.

इलेक्ट्रिक कार चालवून प्रदूषणमुक्तीचा संदेश-    नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी समृद्धी महामार्गाची पाहणी करताना स्वत: इलेक्ट्रिक कार या महामार्गावर चालवून पूर्णत्त्वास गेलेल्या कामांची पाहणी करीत प्रदूषणमुक्तीचा संदेश दिला.

शेतमाल वाहतुकीसाठी महामार्ग फायद्याचाच-    समृद्धी महामार्गाचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे. नागपूर ते शिर्डी या टप्प्याचे उद्घाटन मे महिन्यात करण्याचे प्रस्तावित आहे. या महामार्गामुळे केवळ सहा ते सात तासांत मुंबई पोहोचता येईल. यामुळे वेळ, इंधनाची बचत होणार आहे. वाहन जेथे महामार्गावरून बाहेर पडेल तेथेच टोल लागतील. विदर्भातील उद्योग वाढीसह शेतकऱ्यांच्या मालाची वाहतूक करण्यासाठी हा मार्ग अतिशय महत्त्वाचा ठरणार असल्याचे ना. शिंदे म्हणाले.

जिल्ह्यात ५८ किमीचा महामार्ग पूर्ण

-    हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते मुंबई हे अंतर केवळ सहा ते सात तासांवर येणार आहे. समृद्धी महामार्गाची वर्धा जिल्ह्यातील लांबी ५८ कि.मी. इतकी आहे. जिल्ह्यातील मार्ग पूर्णपणे बांधून झाला आहे. रस्त्याची रुंदी १२० मीटर असून तो सहा पदरी आहे. -    वर्धा,सेलू व आर्वी या तीन तालुक्यातील ३४ गावांमधून एकून ७८२ हेक्टर इतकी जमीन महामार्गासाठी संपादित करण्यात आली आहे. जिल्ह्यात या मार्गावर २ हजार ७६२ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. जिल्ह्यात या मार्गावर विना अडथळा वाहतूक होण्यासाठी ५ मोठे, २७ लहान पुलांसह ९ उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत. -    येळाकेळी व विरुळ येथे इंटरचेंजेस देण्यात आले आहे. वन्यप्राण्यांच्या आवागमनासाठी दोन विशेष उड्डाणपुले बांधण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

 

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग