शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

मे महिन्यात ‘समृद्धी’चा श्रीगणेशा; नागपूर-शिर्डी करता येणार प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2022 05:00 IST

समृद्धी महामार्गासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान वापरण्यात आले असून मार्गाचे काम उत्तम दर्जाचे झाले आहे. पर्यावरणाचा समतोल राखून ईको फ्रेंडली काम करण्यात आले असून या संपूर्ण महामार्गावर ११.५० लाख झाडे लावण्यात येत आहे. वनसंपदेचे रक्षण होणे गरजेचे असून प्राण्यांसाठी रस्त्यावर खास उड्डाणपूल बांधण्यात आले. या पुलांमुळे प्राण्यांना जंगलांचा अनुभव येतील, अशी व्यवस्था या पुलांवर करण्यात आली असल्याचे ना. शिंदे यांनी स्पष्ट केले.

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : समृद्धी महामार्गामुळे विदर्भातील उद्योगधंद्यांना चालणा मिळणार असून,या महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे. नागपूर ते शिर्डी या टप्प्याचे उद्घाटन मे महिन्यात करण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे नागरिकांना लवकरच कमी वेळेत मुंबई गाठता येणार असल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. वर्धा जिल्ह्यातील आर्वी टोल प्लाझा येथे समृद्धी महामार्ग तसेच पुलगाव जवळ वन्यप्राण्यांच्या आवागमनासाठी बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाची पाहणी ना. शिंदे यांनी रविवारी केली. त्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, मुख्य अभियंता सुधाकर मुरादे,अधीक्षक अभियंता अश्विनी घुगे,कार्यकारी अभियंता हेमंत जगताप,भूषण मालखंडारे, उपविभागीय महसूल अधिकारी हरीश धार्मिक,तहसीलदार चव्हाण आदींची उपस्थिती होती.

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तंत्रज्ञानाचा वापर-    समृद्धी महामार्गासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान वापरण्यात आले असून मार्गाचे काम उत्तम दर्जाचे झाले आहे. पर्यावरणाचा समतोल राखून ईको फ्रेंडली काम करण्यात आले असून या संपूर्ण महामार्गावर ११.५० लाख झाडे लावण्यात येत आहे. वनसंपदेचे रक्षण होणे गरजेचे असून प्राण्यांसाठी रस्त्यावर खास उड्डाणपूल बांधण्यात आले. या पुलांमुळे प्राण्यांना जंगलांचा अनुभव येतील, अशी व्यवस्था या पुलांवर करण्यात आली असल्याचे ना. शिंदे यांनी स्पष्ट केले.

इलेक्ट्रिक कार चालवून प्रदूषणमुक्तीचा संदेश-    नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी समृद्धी महामार्गाची पाहणी करताना स्वत: इलेक्ट्रिक कार या महामार्गावर चालवून पूर्णत्त्वास गेलेल्या कामांची पाहणी करीत प्रदूषणमुक्तीचा संदेश दिला.

शेतमाल वाहतुकीसाठी महामार्ग फायद्याचाच-    समृद्धी महामार्गाचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे. नागपूर ते शिर्डी या टप्प्याचे उद्घाटन मे महिन्यात करण्याचे प्रस्तावित आहे. या महामार्गामुळे केवळ सहा ते सात तासांत मुंबई पोहोचता येईल. यामुळे वेळ, इंधनाची बचत होणार आहे. वाहन जेथे महामार्गावरून बाहेर पडेल तेथेच टोल लागतील. विदर्भातील उद्योग वाढीसह शेतकऱ्यांच्या मालाची वाहतूक करण्यासाठी हा मार्ग अतिशय महत्त्वाचा ठरणार असल्याचे ना. शिंदे म्हणाले.

जिल्ह्यात ५८ किमीचा महामार्ग पूर्ण

-    हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते मुंबई हे अंतर केवळ सहा ते सात तासांवर येणार आहे. समृद्धी महामार्गाची वर्धा जिल्ह्यातील लांबी ५८ कि.मी. इतकी आहे. जिल्ह्यातील मार्ग पूर्णपणे बांधून झाला आहे. रस्त्याची रुंदी १२० मीटर असून तो सहा पदरी आहे. -    वर्धा,सेलू व आर्वी या तीन तालुक्यातील ३४ गावांमधून एकून ७८२ हेक्टर इतकी जमीन महामार्गासाठी संपादित करण्यात आली आहे. जिल्ह्यात या मार्गावर २ हजार ७६२ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. जिल्ह्यात या मार्गावर विना अडथळा वाहतूक होण्यासाठी ५ मोठे, २७ लहान पुलांसह ९ उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत. -    येळाकेळी व विरुळ येथे इंटरचेंजेस देण्यात आले आहे. वन्यप्राण्यांच्या आवागमनासाठी दोन विशेष उड्डाणपुले बांधण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

 

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग