शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
3
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
4
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
5
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
6
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
7
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
8
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
9
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
10
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
11
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
12
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
13
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
14
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
15
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
16
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...
17
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
18
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
19
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
20
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीचा प्रस्ताव लालफीतशाहीत

By admin | Updated: January 17, 2015 23:03 IST

जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत जिर्णावस्थेत आहे. पावसाळ्यात या इमारतीला गळती लागते. याच अनुषंगाने नवीन इमारत बांधकामाचा सुमारे २० कोटींचा प्रस्ताव शासन दरबारी पाठविला.

वर्धा : जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत जिर्णावस्थेत आहे. पावसाळ्यात या इमारतीला गळती लागते. याच अनुषंगाने नवीन इमारत बांधकामाचा सुमारे २० कोटींचा प्रस्ताव शासन दरबारी पाठविला. या प्रस्तावालाही लालफितशाहीचा सामना करावा लागत आहे. मागील काही वर्षांपासून या प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरीच मिळाली नसल्याची बाब पुढे आली आहे. नागपूर आयुक्तांच्या पत्राच्या आधारे १७ सप्टेंबर २०१२ रोजी शासनाकडे सुधारित प्रस्ताव पाठविला आहे. यानंतर तब्बल दोन वर्षांनी म्हणजेच २२ जानेवारी २०१४ रोजी मुंबई येथील सचिव समितीच्या सभेमध्ये अकोला येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नमुना नकाशाच्या आधारे वर्धा येथील जिल्हाधिकारी कार्यालयाचा नवीन प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार अकोला येथील नकाशा व आराखडे मागविण्यात आले असून नव्या प्रस्तावाची प्रक्रिया जिल्हा प्रशासन करीत आहे.(जिल्हा प्रतिनिधी)आर्वी तहसील व एसडीएम कार्यालयाचा प्रस्तावही मंजुरीच्या प्रतीक्षेत जिल्हाधिकारी कार्यालयाप्रमाणेच आर्वी तहसील व उपविभागीय अधिकारी कार्यालयाचा प्रस्ताव २० जानेवारी २०१३ पासून शासन दरबारी धूळखात आहे. या प्रस्तावाची दुय्यम प्रत ३ डिसेंबर २०१३ रोजी खास दुतामार्फत शासनाला पाठविण्यात आला आहे. याउपरही या प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी मिळालेली नाही. या प्रस्तावाच्याही मंजुरी प्रतीक्षा जिल्हा प्रशासन करीत आहे.वर्धा, सेलू, हिंगणघाट तहसील कार्यालय बांधकाम प्रगतीपथावरवर्धा, सेलू व हिंगणघाट तहसील कार्यालयांच्या नवीन इमारतींना मात्र शासनाने मंजुरी दिली. यानंतर सदर इमारतींचे बांधकाम आजघडीला प्रगतीपथावर आहे. देवळी, कारंजा, आष्टी व समुद्रपूर तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम पूर्णत्वास गेले असून त्या ठिकाणी कार्यालयाचा कारभार देखील सुरू झालेला आहे.