शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
5
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
6
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
7
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
8
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
9
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
10
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
11
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
12
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!

शेतकऱ्यांसाठी नव्या कृषी रोजगार योजनेचा लोकसभेत प्रस्ताव

By admin | Updated: August 7, 2015 02:06 IST

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेसारखीच शेती व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी रोजगार योजना सुरू करण्यात यावी, ...

वर्धा : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेसारखीच शेती व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी रोजगार योजना सुरू करण्यात यावी, असा प्रस्तावच वर्धेचे खासदार रामदास तडस यांनी बुधवारी लोकसभेपुढे शून्य काळात ठेवला. यावेळी विदर्भातील शेतकऱ्यांच्या व्यथांकडेही लक्ष वेधले.महाराष्ट्रात निसर्गाच्या अनियमिततेमुळे दुष्काळ निर्माण होण्याची स्थिती आहे. मागील दहा वर्षांपासून अतिवृष्टी, कोरडा दुष्काळ यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न बिकट झालेला आहे. अशाही स्थितीत बियाणे, खत यांच्या वाढत्या किमतीमुळे शेतकरी संकटात सापडलेला आहे. मे-जून महिन्यात पेरणी केल्यानंतर जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांना उत्पन्न निघण्याची वाट पहावी लागते, परंतु नैसर्गिक संकट आले तर, शेतकऱ्यांनी लावलेला खर्च निघणेसुद्धा कठिण जाते. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहे, याकडेही खा. तडस यांनी लक्ष वेधले. शून्य प्रहरात खा. तडस यांनी हा प्रश्न उपस्थित करताना शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी सरकारने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेसारखीच कृषी रोजगार योजना अंमलात आणली, तर शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होईल, याकडे लक्ष वेधले. ही योजना केंद्र शासनाने राबविल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई सोबतच उत्पन्नाचा लाभ मिळेल, परंतु अशी कोणतीही योजना नसल्यामुळे ४० टक्के शेतकरी घेतलेल्या कर्जाची परतफेड करू शकत नाही. फक्त शेतकऱ्यांचे २० टक्के पुनर्गठण झालेले आहे. ही कृषी रोजगार योजना सुरु केल्यास आत्महत्याग्रस्त विदर्भातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल, ही बाबही खा. तडस यांनी पटवून दिली.(जिल्हा प्रतिनिधी)