शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्जाचे योग्य नियोजन करा

By admin | Updated: May 19, 2016 01:48 IST

जिल्ह्यातील सर्व पीक कर्जाला पात्र असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे. एकही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही, ..

शैलेश नवाल : जिल्हास्तरीय सल्लागार आढावा बैठकवर्धा : जिल्ह्यातील सर्व पीक कर्जाला पात्र असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे. एकही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही, या दृष्टीने सर्व बँकांनी नियोजन करावे. त्यासाठी मंडळस्तरावर पीक कर्ज मेळाव्यांचे आयोजन करून जनजागृती करावी. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला मॉन्सूनपूर्व हंगाम लक्षात घेऊन ३० मेपर्यंत पीक कर्जाचे वाटप करावे, अशा सूचना नव्याने रूजू झालेले जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी बँक अधिकाऱ्यांना बुधवारी दिल्यात.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित अग्रणी बँकेच्या जिल्हास्तरीय सल्लागार समिती आणि आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय जांगडा, रिझर्व्ह बँकेच्या सहायक महाव्यवस्थापक नीता गेडाम, जिल्हा कृषी विकास अधिकारी एस.एम. खळीकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डी.ए. भारती, जिल्हा उपनिबंधक अजय कडू, नाबार्डच्या स्रेहल बन्सोड, सर्व बँकांचे व्यवस्थापक, समन्वयक अधिकारी, सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी शैलेश नवाल पुढे म्हणाले की, मागील वर्षी सर्व बँकांनी चांगले काम केले. आता आपल्याला त्यापेक्षाही जोमाने काम करून अधिकाधिक शेतकऱ्यांना पीक कर्जाचा लाभ द्यावयाचा आहे. यासाठी लवकरच मंडळस्तरावर कर्ज मेळावे घेऊन पीक कर्जापासून वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांनाही मॉन्सून पूर्व हंगामात कर्ज उपलब्ध द्यावयाचे आहे. त्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन विशेष बाब म्हणून ३१ मे पर्यंत हस्तलिखित सातबारा उतारे देण्याची शासनाने मुभा दिलेली आहे. त्यानुसार सर्व तहसीलदारांना शेतकऱ्यांना कर्ज व अन्य शेतीविषयक कामांकरिता हस्तलिखित सातबारा उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी गतवर्षीच्या कर्ज वाटपाचा आढावाही घेण्यात आला.(कार्यालय प्रतिनिधी)७५ कोटींच्या पीक कर्जाचे वाटप२०१६-१७ अंतर्गत खरीपासाठी जिल्ह्यातील ६ हजार ७०० खातेदारांना सर्व बॅँकांनी मिळून ७५ कोटींचे पीक कर्ज वाटप करण्यात आल्याची माहिती प्रारंभी जिल्हा अग्रणी बॅँकेचे जिल्हा व्यवस्थापक विजय जांगडा यांनी दिली. शिवाय मे २०१६ पर्यंत उर्वरित पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट पूर्ण करण्यात येईल, असे प्रास्ताविकात सांगितले. यावेळी रिझर्व्ह बॅँकेच्या सहायक महाव्यवस्थापक नीता गेडाम यांनीही पीक कर्जाबाबत माहिती दिली. पुढील बैठकीत गावनिहाय बॅँकांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात येणार आहे. सर्व बॅँकांनी त्या पुरवित असलेल्या सेवा क्षेत्रातील खातेदारांच्या माहितीसह उपस्थित राहावे. येणाऱ्या अडचणींबाबत अग्रणी बॅँकेचे जिल्हा व्यवस्थापक यांच्याशी समन्वय ठेऊन अवगत करावे. केवळ उद्दीष्टावर आधारीत कामगिरी पार न पाडता उद्दीष्टाबाहेर जाऊन सामाजिक हिताच्या दृष्टीने पीक कर्जास पात्र शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिल्या.