शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
3
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
4
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
5
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
6
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
7
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
8
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
9
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
10
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
11
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
12
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
13
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
14
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
15
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
16
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
18
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
19
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
20
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?

बेशरमचे झाड देऊन नोंदविला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 22:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : शेतकऱ्यांनी खरेदी केलेले एका नामांकित कंपनीचे सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर ...

ठळक मुद्देप्रहारचे आंदोलन : ‘त्या’ कंपनीवर कठोर कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांनी खरेदी केलेले एका नामांकित कंपनीचे सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली. कृषी विभागही त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करून प्रहारच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय गाठून येथील अधिकाऱ्यांना बेशरमाचे झाड देत शासनाच्या दुर्लक्षित धोरणाचा निषेध नोंदविला. शिवाय सदर कंपनीवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी अधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनातून केली आहे.जून महिन्यात अखेरच्या दोन दिवसात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पैशाची जुळवाजुळव करून बियाण्यांची तातडीने खरेदी केली. परंतु, एका नामांकित कंपनीचे सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे शेतकºयांची फसवणूकच या कंपनीने केल्याने त्या कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी निवेदन देऊन कृषी विभागाकडे केली होती. परंतु, त्या निवेदनाला केराची टोपलीच दाखविण्यात आली. कृषी विभागाकडून सध्या शेतकरी विरोधी धोरण राबविले जात असल्याचा आरोप करीत सुरुवातीला प्रहारच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयात अर्धातास ठिय्या आंदोलन केले. तर त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन आणि सोबत आणलेले बेशरमाचे झाड सहायक प्रशासन अधिकारी उमेश गजभिये व कृषी अधिकारी गजानन भोयर यांना देऊन आपला रोष व्यक्त केला. कृषी विभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने २५ हजारांची आर्थिक मदत करावी, तसेच सदर नामांकीत कंपनीविरुद्ध फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. येत्या आठ दिवसांत या मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. या आंदोलनाचे नेतृत्त्व प्रहारचे जिल्हा प्रमुख विकास दांडगे, रसुलाबादचे सरपंच राजेश सावरकर यांनी केले. आंदोलनात शेतकरी व प्रहारचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.