शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

बेशरमचे झाड देऊन नोंदविला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 22:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : शेतकऱ्यांनी खरेदी केलेले एका नामांकित कंपनीचे सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर ...

ठळक मुद्देप्रहारचे आंदोलन : ‘त्या’ कंपनीवर कठोर कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांनी खरेदी केलेले एका नामांकित कंपनीचे सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली. कृषी विभागही त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करून प्रहारच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय गाठून येथील अधिकाऱ्यांना बेशरमाचे झाड देत शासनाच्या दुर्लक्षित धोरणाचा निषेध नोंदविला. शिवाय सदर कंपनीवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी अधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनातून केली आहे.जून महिन्यात अखेरच्या दोन दिवसात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पैशाची जुळवाजुळव करून बियाण्यांची तातडीने खरेदी केली. परंतु, एका नामांकित कंपनीचे सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे शेतकºयांची फसवणूकच या कंपनीने केल्याने त्या कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी निवेदन देऊन कृषी विभागाकडे केली होती. परंतु, त्या निवेदनाला केराची टोपलीच दाखविण्यात आली. कृषी विभागाकडून सध्या शेतकरी विरोधी धोरण राबविले जात असल्याचा आरोप करीत सुरुवातीला प्रहारच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयात अर्धातास ठिय्या आंदोलन केले. तर त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन आणि सोबत आणलेले बेशरमाचे झाड सहायक प्रशासन अधिकारी उमेश गजभिये व कृषी अधिकारी गजानन भोयर यांना देऊन आपला रोष व्यक्त केला. कृषी विभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने २५ हजारांची आर्थिक मदत करावी, तसेच सदर नामांकीत कंपनीविरुद्ध फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. येत्या आठ दिवसांत या मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. या आंदोलनाचे नेतृत्त्व प्रहारचे जिल्हा प्रमुख विकास दांडगे, रसुलाबादचे सरपंच राजेश सावरकर यांनी केले. आंदोलनात शेतकरी व प्रहारचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.