शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
3
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
4
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
5
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
6
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
7
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
8
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
9
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
10
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
11
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
12
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
13
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
14
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
15
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
16
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
17
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
18
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
19
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
20
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार

बेशरमचे झाड देऊन नोंदविला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 22:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : शेतकऱ्यांनी खरेदी केलेले एका नामांकित कंपनीचे सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर ...

ठळक मुद्देप्रहारचे आंदोलन : ‘त्या’ कंपनीवर कठोर कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांनी खरेदी केलेले एका नामांकित कंपनीचे सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली. कृषी विभागही त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करून प्रहारच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय गाठून येथील अधिकाऱ्यांना बेशरमाचे झाड देत शासनाच्या दुर्लक्षित धोरणाचा निषेध नोंदविला. शिवाय सदर कंपनीवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी अधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनातून केली आहे.जून महिन्यात अखेरच्या दोन दिवसात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पैशाची जुळवाजुळव करून बियाण्यांची तातडीने खरेदी केली. परंतु, एका नामांकित कंपनीचे सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे शेतकºयांची फसवणूकच या कंपनीने केल्याने त्या कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी निवेदन देऊन कृषी विभागाकडे केली होती. परंतु, त्या निवेदनाला केराची टोपलीच दाखविण्यात आली. कृषी विभागाकडून सध्या शेतकरी विरोधी धोरण राबविले जात असल्याचा आरोप करीत सुरुवातीला प्रहारच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयात अर्धातास ठिय्या आंदोलन केले. तर त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन आणि सोबत आणलेले बेशरमाचे झाड सहायक प्रशासन अधिकारी उमेश गजभिये व कृषी अधिकारी गजानन भोयर यांना देऊन आपला रोष व्यक्त केला. कृषी विभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने २५ हजारांची आर्थिक मदत करावी, तसेच सदर नामांकीत कंपनीविरुद्ध फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. येत्या आठ दिवसांत या मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. या आंदोलनाचे नेतृत्त्व प्रहारचे जिल्हा प्रमुख विकास दांडगे, रसुलाबादचे सरपंच राजेश सावरकर यांनी केले. आंदोलनात शेतकरी व प्रहारचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.