शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
2
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
3
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
4
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
5
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
6
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
7
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
8
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
9
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
10
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
11
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
12
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
14
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
15
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
16
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
17
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
18
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
19
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
20
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले

बेशरमचे झाड देऊन नोंदविला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 22:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : शेतकऱ्यांनी खरेदी केलेले एका नामांकित कंपनीचे सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर ...

ठळक मुद्देप्रहारचे आंदोलन : ‘त्या’ कंपनीवर कठोर कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांनी खरेदी केलेले एका नामांकित कंपनीचे सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली. कृषी विभागही त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करून प्रहारच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय गाठून येथील अधिकाऱ्यांना बेशरमाचे झाड देत शासनाच्या दुर्लक्षित धोरणाचा निषेध नोंदविला. शिवाय सदर कंपनीवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी अधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनातून केली आहे.जून महिन्यात अखेरच्या दोन दिवसात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पैशाची जुळवाजुळव करून बियाण्यांची तातडीने खरेदी केली. परंतु, एका नामांकित कंपनीचे सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे शेतकºयांची फसवणूकच या कंपनीने केल्याने त्या कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी निवेदन देऊन कृषी विभागाकडे केली होती. परंतु, त्या निवेदनाला केराची टोपलीच दाखविण्यात आली. कृषी विभागाकडून सध्या शेतकरी विरोधी धोरण राबविले जात असल्याचा आरोप करीत सुरुवातीला प्रहारच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयात अर्धातास ठिय्या आंदोलन केले. तर त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन आणि सोबत आणलेले बेशरमाचे झाड सहायक प्रशासन अधिकारी उमेश गजभिये व कृषी अधिकारी गजानन भोयर यांना देऊन आपला रोष व्यक्त केला. कृषी विभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने २५ हजारांची आर्थिक मदत करावी, तसेच सदर नामांकीत कंपनीविरुद्ध फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. येत्या आठ दिवसांत या मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. या आंदोलनाचे नेतृत्त्व प्रहारचे जिल्हा प्रमुख विकास दांडगे, रसुलाबादचे सरपंच राजेश सावरकर यांनी केले. आंदोलनात शेतकरी व प्रहारचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.